शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

भिवंडीत जिजाऊ संघटनेने साजरी केली कृतज्ञता भाऊबीज

By नितीन पंडित | Updated: October 28, 2022 16:54 IST

सरकार करेल तेव्हा करेल समाजाच्या विकासासाठी मदत करायला पुढे येणे गरजेचे आहे असेही निलेश सांबरे यांनी स्पष्ट केले.

भिवंडी  - आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका या खऱ्या समाजासाठी झटणाऱ्या रणरागिणी असून त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी केले आहे .शुक्रवारी ते भिवंडी पद्मानगर येथील पद्मशाली समाज सभागृह येथे आयोजित कृतज्ञता भाऊबीज कार्यक्रमात बोलत होते.याप्रसंगी पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचे प्राचार्य सुधीर घागस, शिवअंगणवाडी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा वैशाली मेस्त्री, शिवसेना बाळासाहेबांची गटाचे शहर उपाध्यक्ष संजय काबूकर,अखिल पद्मशाली समाज अध्यक्ष रामकृष्ण पोटाबत्तीनी, महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ बुशरा सय्यद,जिजाऊ संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षा मोनिका पानवे यांसह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

शैक्षणिक व राजकीय भ्रष्टाचार करणाऱ्यांना समजा बद्दल काही ही पडलेले नाही आशा परिस्थितीत जिजाऊ हा गरिबांचा कष्टकरी सर्वधर्मीय समाजाचे कुटुंब आहे ,या मातीतला प्रत्येक जण आपला आहे ,या भावनेतून निस्वार्थी भावनेतुन काम करण्याची गरज आहे आणि ते काम जिजाऊ करीत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगत समाजचे काम करणारी पिढी आपल्याला घडवायची आहे ,पीडिताला मदत करणे आपली जबाबदारी आहे, सरकार करेल तेव्हा करेल समाजाच्या विकासासाठी मदत करायला पुढे येणे गरजेचे आहे असेही निलेश सांबरे यांनी स्पष्ट केले.

तुटलेली नाती निस्वार्थ भावनेने कशी जोडावी यासाठी निलेश सांबरे हे काम निस्वार्थी भावनेतून करीत आहेत,करोना काळात लाखो रुपये पगार घेणारे वर्क फ्रॉम होम होते तर तीन चार हजार रुपयांच्या तुटपुंजा मानधना वर काम करणाऱ्या आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका यांचे काम धैर्याचे होते म्हणून हा कृतज्ञता भाऊबीज सोहळा आगळावेगळा आहे असे प्रतिपादन सुधीर घागस यांनी केले .या कार्यक्रमा दरम्यान भिवंडी शहर व भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात कार्यरत अंगणवाडी सेविका,मदतनीस आशा वर्कर्स अशा तब्बल एक हजार महिलांची पैठणी सह चांदीची जिजाऊ शिवबा ही प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्षा मोनिका पालवे यांच्या नेतृत्वाखाली  संघटनेचे पदाधिकारी पंकज पवार ,कैलास भोईर फराज शेख,कैलास भोईर, समृद्धी ठाकरे यांनी विशेष मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र मांजरेकर यांनी केले.