शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

भिवंडीतील समस्यांचा उपमुख्यमंत्र्यांपुढे वाचला पाढा; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:34 IST

शेतकरी, कामगार देशोधडीला लागण्याची व्यक्त केली भीती

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील विविध नागरी समस्यांकडे तत्कालीन भाजप सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. बुलेट ट्रेनसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. मुबलक प्रमाणात जमिनीचा मोबदला मिळणे आवश्यक आहे. असे असताना केंद्र सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने याप्रकरणी लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव चौघुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

चौघुले यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने पवार यांची नुकतीच भेट घेऊन विविध समस्यांचा पाढाच वाचला. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, ज्येष्ठ कार्यकर्ते कमलाकर टावरे यांचा समावेश होता.

तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यालगतच्या ३८ गावांना पर्यावरण संरक्षण क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या उद्योग, व्यवसायावर बंदी आली आहे. त्यामुळे या परिसरात बेरोजगारी वाढणार असल्याने स्थानिक नागरिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. तत्कालीन भाजप सरकारने यंत्रमाग व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याने हा व्यवसाय पूर्णत: डबघाईला आला असून कामगार देशोधडीला लागला आहे. भिवंडी शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. तुंगारेश्वर अभयारण्याजवळच्या ३८ गावांमधील वीटभट्टी, दगडखाण, स्टोन क्र शर ,डांबर प्लांट आदी व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे येथील स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यवसायासाठी बँकांकडून कर्जे घेतली आहेत. मात्र, उद्योग बंद झाल्याने बँकांचे हप्ते कसे फेडायचे, या विवंचनेत व्यावसायिक सापडले आहेत.उद्योग पुन्हा सुरू होण्याची आशाजिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा या ३८ गावांचे सर्वेक्षण करून उद्योग, व्यवसायाची एक किलोमीटरची मर्यादा १०० मीटरवर येण्याची शक्यता असल्याने लवकरच येथील उद्योग पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवित झाली आहे. येथील उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींच्या अधिकाºयांसमवेत बैठका सुरू आहे.स्थानिकांना विश्वासात घेतले नाहीपर्यावरण संरक्षण क्षेत्र लागू करताना स्थानिकांची बाजू समजून घेतलेली नाही. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी चौघुले यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खर्गे यांच्याशी संपर्कसाधून भिवंडीतील नागरी समस्या सोडवण्यासाठी निर्देश दिले. त्यानुसार, खर्गे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना लक्ष घालून मार्ग काढण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार