शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

Thane: रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली भर पावसात तोडली नागरिकांची घरे, भिवंडी मनपाचा अजब कारभार

By नितीन पंडित | Updated: June 28, 2024 18:40 IST

Bhiwandi News: उन्हाळ्याच्या दिवसात रस्ता रुंदीकरण व रस्ता दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष करत असलेल्या भिवंडी महापालिकेने भर पावसात रस्ता रुंदीकरणाच्या नावाने नागरिकांची ९ घरे तोडून टाकल्याचा अजब प्रकार घडला आहे.या ९ घरातील नऊ कुटुंबियांवर भर पावसात रस्त्यावर ताडपत्री टाकून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

- नितीन पंडित भिवंडी - उन्हाळ्याच्या दिवसात रस्ता रुंदीकरण व रस्ता दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष करत असलेल्या भिवंडी महापालिकेने भर पावसात रस्ता रुंदीकरणाच्या नावाने नागरिकांची ९ घरे तोडून टाकल्याचा अजब प्रकार घडला आहे.या ९ घरातील नऊ कुटुंबियांवर भर पावसात रस्त्यावर ताडपत्री टाकून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मात्र घरे तोडण्याआधी मनपा प्रशासनाने या नागरिकांसाठी कोणत्याही प्रकाराची निवाऱ्याची व्यवस्था केली नसल्याने येथील नागरिक मनपा प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या धोबी तलाव,रोशन बाग परिसरात रस्ता रुंदीकरणाचे हाती घेणार असल्याने या रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोहम्मद रमजान अब्दुल रहीम यांच्यासह इतर ८ अशा नऊ घरांना महापालिका प्रशासनाने २२ मे २०२४ रोजी नोटीस बजावत रस्ता रुंदीकरणात बाधित मिळकतीचा मोबदला निश्चित करण्यासाठी महापालिकेकडे कागदपत्र सादर करण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र अवघ्या एक महिन्यांच्या नोटीस कालावधीतच मनपाने मोहम्मद रमजान अब्दुल रहीम यांच्यासह इतर आठ नागरिकांची घरे भर पावसात तोडली आहेत.

या परिसरात रस्ता रुंदीकरणाचे कोणतेही काम सध्या सुरू नसतांना मनपा प्रशासनाने निश्चित केलेल्या बाधित क्षेत्रात पेक्षा अधिक क्षेत्रात मनपाने बुलडोझर लावत हि सर्व घरे तोडून टाकल्याने गरीब कुटुंब रस्त्यावर आली आहेत.शुक्रवारी भर पावसात दसऱ्या घराच्या आडोशाला ताडपत्री बांधून हे कुटुंबीय रहात आहेत.भर पावसात अशा प्रकारे नागरिकांच्या निवाऱ्याची सोया न करता व घरांचा मोबदला न देता मनपा प्रशासनाने आमची घरे का तोडली असं सवाल येथील बाधीत कुटुंब विचारात आहेत. मनपा प्रशासनाने जाणीवपूर्वक आमची घरे तोडून आम्हाला बेघर केले आहे,ना मोबदला दिला ना राहण्याची व्यवस्था केली आता आम्ही परिवारासह राहणार कुठे असा सवाल या बाधीत कुटुंबातील महिला विचारत आहेत.

रस्ता रुंदीकरणासाठी येथील घरे बाधित झाली होती,येथील नागरिकांना मनपा प्रशासनाने नोटीस बजावल्या होत्या, मात्र ही घरे मनपाच्या जागेत असल्याने कोणताही मोबदला न देता तोडण्यात आली आहेत. अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपा प्रभाग समिती चारचे प्रभाग अधिकारी सुनील भोईर यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे