शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भिवंडी-डोंबिवली रस्ता ३० मी. रुंद, खर्च वाचविण्यासाठी एमएमआरडीएचा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 01:30 IST

भिवंडीहून थेट डोंबिवलीला रस्ते मार्गाने जाता यावे यासाठी एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी खाडीमार्गे थेट माणकोली-मोठागाव मार्गे रस्ता करण्याचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला.

- नारायण जाधवठाणे  - भिवंडीहून थेट डोंबिवलीला रस्ते मार्गाने जाता यावे यासाठी एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी खाडीमार्गे थेट माणकोली-मोठागाव मार्गे रस्ता करण्याचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. भूसंपादनाअभावी तो रखडलेला असतानाच आता खर्च वाचविण्यासाठी त्याची रुंदीच तब्बल १५ मीटरने कमी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यामुळे हा रस्ता ४५ ऐवजी ३० मीटर रुंदीचाच बांधण्यात येणार असून शिवाय आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून बांधण्यात येणारा सेवा रस्ताही त्यातून वगळला आहे. यामुळे या रस्त्याचा खर्च ४५० कोटी ६० लाखावरून थेट १६० कोटी ९८ लाखांवर आला आहे. यामुळे एमएमआरडीएच्या तब्बल २८९ कोटी ६२ लाख रुपयांची बचत होणार आहे.सध्या भिवंडीहून थेट डोंबिवलीला जाण्यासाठी कल्याणमार्गे जावे लागते. यात वेळ, श्रम, पैसा तर खर्च होतोच शिवाय वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागते. आपत्कालिन परिस्थितीत तर अनेक अडचणी येतात. यामुळे भिवंडीहून माणकोली-मोठागाव दरम्यान खाडीत पूल बांधून थेट डोंबिवलीला जाण्यासाठी हा रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर म्हणजे सीआरझेडसह पर्यावरण खात्याची मंजुरी, भूसंपादनाचा होता. यासाठी मोठ्याप्रमाणात पैसा लागणार आहे. यामुळे खर्चात बचत करण्यासाठी एमएमआरडीएने सेवा रस्ता वगळण्यासह त्याची रुंदी कमी करण्याचा हा निर्णय घेतला आहे.हा पूल झाल्यानंतर डोंबिवलीहून थेट मुंबई-नाशिक महामार्ग जोडला जाणार आहे. यामुळे डोंबिवलीहून भिवंडीसह ठाणे, मुंबईसह वसई-विरार आणि नाशिक या महानगरांतील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. यात मोठ्याप्रमाणात इंधन बचत होईल. शिवाय कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.भिवंडीतील गोदामपट्टा हा मानकोली, काल्हेर परिसरात असल्याने डोंबिवली एमआयडीसी थेट या भागात जोडली जाऊन तेथील उद्योजकांच्या मालवाहतुकीवरील खर्चात बचत होणार आहे.भूसंपादनासाठी मोजणार सुमारे ७३ कोटी रूपयेमाणकोली ते उल्हासखाडीवरील ३० मीटर रुंद आणि ३.३० किमी लांबीचा पूल ४१ कोटीमुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली येथील इंटरचेंजची कामे (उजवे वळण वगळून) २० कोटीएक भूयारी मार्ग बांधण्यासाठीचा खर्च १५ कोटीसल्लागार शुल्क १.३८ कोटीआकस्मिक खर्च ३.४५ कोटीसेवा वाहिन्या स्थलांतरीत करणे ६.९० कोटीभूसंपादन खर्च ७३.२५ कोटीएकूण १६०.९८ कोटीनव्या निर्णयानुसार असा वाचेल खर्चतीनऐवजी एकच भूयारी मार्ग बांधण्यात येणार आहे.४५ ऐवजी ३० मीटर रुंदीचे भूसंपादन करून तेवढाच रस्ता बांधण्यात येईलदोन्ही बाजूच्या साडेसात मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे बांधकाम वगळण्यात आले आहे.माणकोली जंक्शनजवळील उजव्या वळण्यासाठी केलेली इंटरचेंजची तरतूद पूर्णपणे वगळली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीbhiwandiभिवंडी