शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

भिवंडीत उड्डाणपुलाचा भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:36 IST

दुसऱ्यांदा घडली घटना : वाहतूक बंद ठेवल्याने झाली कोंडी

भिवंडी : कल्याण नाका येथील उड्डाणपुलाचा भाग मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहतूक पोलीस कार्यालयाजवळ कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रात्री हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने काही काळ कोंडी झाली होती.भिवंडी - कल्याण रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन वर्षांपासून एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे बांधकाम हाती घेतले आहे. या साडेतीन किलोमीटर लांबीच्या साईबाबा ते कल्याण नाका दरम्यानच्या उड्डाणपुलासाठी १८४ कोटी खर्च येणार आहे. या कंपनीच्या बांधकामाचे कंत्राट जेएमसी या कंपनीला दिले आहे.

मात्र कंत्राटदार कंपनीच्या भ्रष्ट व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मागीलवर्षीही उड्डाणपुलाच्या खांबाला तडा जाऊन स्लॅब कोसळण्याची घटना घडली होती. त्यामुळे खांबाला जॅक लाऊन काही महिने टांगून ठेवले होते. त्यातच मंगळवारी रात्रीच्या सुमारास या उड्डाणपुलाच्या खांबावरील दोन रॅम्पला जोडण्याचे काम सुरू असताना या पुलाचा काही भाग कोसळला. या पुलाचा भाग कोसळण्याची ही दुसरी घटना असल्याने वारंवार होणाºया या दुर्घटनांमुळे उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.दरम्यान, या पुलाच्या निकृष्ट कामाबाबत कल्याण रोड व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीच्या वतीने एमएमआरडीए व पालिका आयुक्तांकडे अनेकवेळा लेखी तक्र ारी केलेल्या आहेत.अहवाल देण्यास टाळाटाळमागीलवर्षी जेव्हा उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता त्यावेळी संघर्ष समितीच्या वतीने या घटनेची चौकशीची मागणी केली होती. या मागणीनंतर सरकारच्या वतीने यासंदर्भातील अहवाल तयार करून या उड्डाणपुलाचे काम आठ महिने थांबविण्यात आले होते. विशेष म्हणजे हा अहवाल एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याची खंत कल्याण रोड व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष शादाब उस्मानी यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेRainपाऊस