शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भिवंडीत उड्डाणपुलाचा भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:36 IST

दुसऱ्यांदा घडली घटना : वाहतूक बंद ठेवल्याने झाली कोंडी

भिवंडी : कल्याण नाका येथील उड्डाणपुलाचा भाग मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहतूक पोलीस कार्यालयाजवळ कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रात्री हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने काही काळ कोंडी झाली होती.भिवंडी - कल्याण रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन वर्षांपासून एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे बांधकाम हाती घेतले आहे. या साडेतीन किलोमीटर लांबीच्या साईबाबा ते कल्याण नाका दरम्यानच्या उड्डाणपुलासाठी १८४ कोटी खर्च येणार आहे. या कंपनीच्या बांधकामाचे कंत्राट जेएमसी या कंपनीला दिले आहे.

मात्र कंत्राटदार कंपनीच्या भ्रष्ट व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मागीलवर्षीही उड्डाणपुलाच्या खांबाला तडा जाऊन स्लॅब कोसळण्याची घटना घडली होती. त्यामुळे खांबाला जॅक लाऊन काही महिने टांगून ठेवले होते. त्यातच मंगळवारी रात्रीच्या सुमारास या उड्डाणपुलाच्या खांबावरील दोन रॅम्पला जोडण्याचे काम सुरू असताना या पुलाचा काही भाग कोसळला. या पुलाचा भाग कोसळण्याची ही दुसरी घटना असल्याने वारंवार होणाºया या दुर्घटनांमुळे उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.दरम्यान, या पुलाच्या निकृष्ट कामाबाबत कल्याण रोड व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीच्या वतीने एमएमआरडीए व पालिका आयुक्तांकडे अनेकवेळा लेखी तक्र ारी केलेल्या आहेत.अहवाल देण्यास टाळाटाळमागीलवर्षी जेव्हा उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता त्यावेळी संघर्ष समितीच्या वतीने या घटनेची चौकशीची मागणी केली होती. या मागणीनंतर सरकारच्या वतीने यासंदर्भातील अहवाल तयार करून या उड्डाणपुलाचे काम आठ महिने थांबविण्यात आले होते. विशेष म्हणजे हा अहवाल एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याची खंत कल्याण रोड व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष शादाब उस्मानी यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेRainपाऊस