शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

Bhiwandi Building Collapse: घरमालकांचा हव्यास महागात पडला अन् भिवंडीत अनर्थ घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 20:00 IST

पैशांच्या हव्यासापोटी घरमालकांनी घरं भाड्यानं दिली; कामगार पोहोचले मृत्यूच्या दाढेत

- नितिन पंडीत भिवंडी: शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाउंड येथे तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोसळलेल्या इमारतीच्या शेजारीच दुसरी इमारत असल्याने सुरुवातील बचाव कार्यात अडचणी आल्या. विशेष म्हणजे सुमारे 37 वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीला मनपा प्रशासनाने धोकादायक ठरवले होते. नोटीस देऊन जसे मनपा प्रशासनाने आपले हात झटकले त्याच पद्धतीने इमारत मालकाने सुरुवातीला सदनिका विकून आपले हात झटकले होते. नंतर इमारत धोकादायक ठरल्यानांतर सदनिका मालकांनी आपापल्या सदनिका रिकाम्या केल्या. मात्र त्या पुन्हा भाड्याने दिल्या होत्या. कमी भाड्याच्या लालसेपोटी शहरातील कामगारांनी या इमारतीत भाड्याने आपला संसार थाटला होता. मात्र भाड्याच्या लालसेने व पैशांच्या हव्यासाने इमारत मालकासह सदनिका मालकांनी गरीब भाडोत्री कुटुंबियांच्या जीवाची कोणतीही पर्वा केली नाही हे दुर्दैव. भिवंडीत तीन मजली धोकादायक इमारत कोसळली; 10 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरूचकमी घरभाडे असल्याने गरीब मजूर आपल्या कुटुंबांसह घरांमध्ये राहायला आले. मध्यरात्रीच्या सुमारास इमारत कोसळली आणि मोठा अनर्थ घडला. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून या दहा मृत व्यक्तींमध्ये दोन वर्षांपासून ते 14 वर्षांपर्यंत सात चिमुरड्यांचा समावेश आहे. त्यामुळे या निष्पाप जीवांना न्याय मिळणार का हाच खरा प्रश्न आहे. भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदतसर्वात महत्वाचे म्हणजे भिवंडीत अनेक धोकादायक इमारतींचा प्रश्न आजही ऐरणीवर आहे. ज्या ज्या वेळेस भिवंडीत एखादी इमारत दुर्घटना घडते त्या त्या वेळेस क्लस्टर योजना राबविण्याचा मुद्दा पुढे येतो मात्र त्यासाठी आवश्यक बाबींचा पाठपुरावा होताना दिसत नाही. त्यामुळेच आजही शहरात अनधिकृत बांधकाम व धोकादायक इमारतींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मनपा प्रशासन फक्त नोटीस बजावून आपले हात झटकण्याचा प्रयत्न करत असते. मात्र धोकादायक ठरवल्यानंतर घरांमध्ये राहणाऱ्यांची काय याचा विचार होत नसल्याने हजारो नागरिक आजही अशा प्रकारच्या धोकादायक इमारतींमध्ये भाड्याने राहत आहेत. त्यामुळे आता तरी मनपा प्रशासन जागे होणार का असा सवाल सामान्य नागरिक विचारात आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी