शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

भिवंडीत बाप्पांच्या आगमनात खड्ड्यांबरोबरच कचऱ्याचेही विघ्न

By नितीन पंडित | Updated: September 18, 2023 16:10 IST

गणेश भक्तांमध्ये मनपा प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: मंगळवारी गणेशाचे आगमन होत असून गणपती बाप्पांच्या आगमनासाठी इतर शहरांमध्ये रस्त्यावरील खड्डे व स्वच्छता याकडे विशेष लक्ष दिले जात असतानाच भिवंडीत मात्र रस्त्यावरील खड्डे व कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे यंदा शहरातील बाप्पांच्या अगमानात रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच कचऱ्याचेही विघ्न आले आहे.शहरात ठिकठिकाणी कचरा साचला असून मुख्य रस्त्यांवर देखील कचऱ्याचे ढिग साचले आहेत.मात्र त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गणेश भक्तांमध्ये मनपा प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे.

भिवंडी मनपाने शहरातील कचरा उचलण्यासाठी खासगी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे.या ठेकेदारावर महिन्याला सुमारे दोन कोटींची उधळण प्रशासन करत आहे.मात्र सध्या ठेकेदाराचे कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात कचरा समस्यां गंभीर बनली आहे. भिवंडीतील निजामपुरा,गैबी नगर,शांतीनगर,बाबला कंपाउंड,नवी वस्ती,कामतघर आदी भागात कचऱ्याचे ढिग ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत.तर भिवंडी कल्याण या मुख्य रस्त्यावर नवी वस्ती येथील वेलकम हॉटेलसमोर कचऱ्याचे मोठे ढिग साचले आहेत.मंगळवारी गणेशोत्सव असल्याने याच मार्गावरून गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पांना घेऊन जात आहेत.मात्र रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे रस्त्यांसह परिसरात दुर्गंधी पसरत असून या दुर्गंधी रस्त्यावरूनच बाप्पांचे आगमन होत आहे.विशेष म्हणजे या साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या बाजूलाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप असून या कचऱ्याच्या ढिगांमुळे गणेशभक्तांमध्ये मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप पसरला आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीBhiwandiभिवंडी