शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पत्रीपुलासाठी ‘भीख मांगो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:02 IST

पैसे सरकारला पाठवणार : आंदोलनास वाहनचालकांनी दिला पाठिंबा

कल्याण : पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीख मांगो’ आंदोलन छेडले. जुना धोकादायक अवस्थेतील पत्रीपूल तोडून सात महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही कामाने गती घेतलेली नाही. नागरिकांच्या आंदोलनाला वाहनचालकांनीही पाठिंबा दर्शवला.

धोकादायक अवस्थेतील ब्रिटिशकालीन रेल्वे पत्रीपूल नोव्हेंबरमध्ये पाडण्यात आला. या कामासाठी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० असा सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सद्य:स्थितीत बाजूकडील केडीएमसीच्या पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू असली, तरी हा पूल अरुंद असल्याने तासन्तास वाहतूककोंडीचा सामना येथून मार्गस्थ होणाºया वाहनचालकांना करावा लागत आहे. जुन्या पुलाचे पाडकाम झाल्यानंतर महिनाभराने म्हणजेच ३० डिसेंबरला या नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. हे काम वर्षभरात पूर्ण करू, असे आश्वासन एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा हातखंडा असल्याने पत्रीपुलाचे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केले होते. नवीन पत्रीपूल बांधण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने कोंडीच्या रोजच्या त्रासाने बेजार झालेल्या काही तरुणांनी मे महिन्यातही रस्त्यावर उतरत पत्रीपुलाचे काम कधी पूर्ण होणार? या आशयाचे बोर्ड घेत शांततेच्या मार्गाने संबंधित यंत्रणेला सवाल केला होता. रविवारी स्थानिक नागरिकांनी पत्रीपूल परिसरात ‘भीख मांगो’ आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जमा झालेले पैसे सरकारला पाठवणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते शकील खान यांनी दिली. कोंडीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांनी आंदोलनाला पाठिंबा देत, लोकप्रतिनिधी आणि सरकारविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.पाच महिन्यांत पाच टक्केही काम नाहीच्पाच महिने उलटूनही पत्रीपुलाचे पाच टक्केही काम होऊ शकलेले नाही. पर्यायी पुलावर उद्भवणारी कोंडी कल्याणकरांसाठी डोकेदुखी बनली आहे.च् नव्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी होत असताना संबंधित यंत्रणेचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. अर्धा ते पाऊण तास वाहने कोंडीत अडकून पडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे