शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

पत्रीपुलासाठी ‘भीख मांगो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:02 IST

पैसे सरकारला पाठवणार : आंदोलनास वाहनचालकांनी दिला पाठिंबा

कल्याण : पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीख मांगो’ आंदोलन छेडले. जुना धोकादायक अवस्थेतील पत्रीपूल तोडून सात महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही कामाने गती घेतलेली नाही. नागरिकांच्या आंदोलनाला वाहनचालकांनीही पाठिंबा दर्शवला.

धोकादायक अवस्थेतील ब्रिटिशकालीन रेल्वे पत्रीपूल नोव्हेंबरमध्ये पाडण्यात आला. या कामासाठी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० असा सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सद्य:स्थितीत बाजूकडील केडीएमसीच्या पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू असली, तरी हा पूल अरुंद असल्याने तासन्तास वाहतूककोंडीचा सामना येथून मार्गस्थ होणाºया वाहनचालकांना करावा लागत आहे. जुन्या पुलाचे पाडकाम झाल्यानंतर महिनाभराने म्हणजेच ३० डिसेंबरला या नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. हे काम वर्षभरात पूर्ण करू, असे आश्वासन एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा हातखंडा असल्याने पत्रीपुलाचे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केले होते. नवीन पत्रीपूल बांधण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने कोंडीच्या रोजच्या त्रासाने बेजार झालेल्या काही तरुणांनी मे महिन्यातही रस्त्यावर उतरत पत्रीपुलाचे काम कधी पूर्ण होणार? या आशयाचे बोर्ड घेत शांततेच्या मार्गाने संबंधित यंत्रणेला सवाल केला होता. रविवारी स्थानिक नागरिकांनी पत्रीपूल परिसरात ‘भीख मांगो’ आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जमा झालेले पैसे सरकारला पाठवणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते शकील खान यांनी दिली. कोंडीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांनी आंदोलनाला पाठिंबा देत, लोकप्रतिनिधी आणि सरकारविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.पाच महिन्यांत पाच टक्केही काम नाहीच्पाच महिने उलटूनही पत्रीपुलाचे पाच टक्केही काम होऊ शकलेले नाही. पर्यायी पुलावर उद्भवणारी कोंडी कल्याणकरांसाठी डोकेदुखी बनली आहे.च् नव्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी होत असताना संबंधित यंत्रणेचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. अर्धा ते पाऊण तास वाहने कोंडीत अडकून पडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे