शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सायकलवर भेळ विकून कुटुंबाचा प्रपंच, नोकरी गेल्यावर व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 01:42 IST

ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता अनेक वर्षे सायकलवर भेळ विकणारे विश्वास शिंगोटे यांची भेळ लोकप्रिय झाली आहे.

पंकज पाटील अंबरनाथ : ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता अनेक वर्षे सायकलवर भेळ विकणारे विश्वास शिंगोटे यांची भेळ लोकप्रिय झाली आहे. शिंगोटे हे सरकारी कार्यालयात येताच त्यांच्याकडून भेळ घेण्यासाठी गर्दी होते. फिरती देशी भेळ म्हणून ते नावारूपाला आले आहेत. दिवसभर भेळ विकून शिंगोटे हे आपला प्रपंच सांभाळत आहेत. नोकरी गमावल्यावर न डगमगता त्यांनी सुरू केलेला व्यवसाय आजही ते जिद्दीने सांभाळत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील बदगी येथील शिंगोटे १९६६ च्या सुमारास मुंबईत नोकरीच्या शोधात आले आणि स्थायिक झाले. त्याकाळी अंबरनाथमध्ये स्वस्तिक कंपनी नावारूपाला आली होती. तेथे कुणालाही रोजगार मिळत असे. शिंगोटे यांच्या भावाने विश्वास यांना त्या कंपनीत नोकरी मिळवून दिली. मात्र, १९८७ मध्ये कंपनी बंद पडली. आता पुढे काय करायचे, असा यक्षप्रश्न उभा ठाकला. कपाळावर गंधाचा टिळा, गळ्यात तुळशीच्या माळा, असा साधा पेहराव असणाऱ्या शिंगोटे यांनी नोकरी मिळत नाही म्हणून न डगमगता एखादा परवडणारा व्यवसाय का करू नये, असा विचार केला. त्यांनी भेळीचा व्यवसाय करण्याचा निर्धार केला. त्यावेळी जवळ जास्त पैसे नसल्याने जागा कशी घ्यायची आणि व्यवसाय कसा करायचा, हा प्रश्न होताच. तरीही, प्राप्त परिस्थितीवर मात करून शिंगोटे यांनी सायकलीचा तोडगा काढला आणि सायकलवर भेळविक्रीचा व्यवसाय सुरू केला.हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी असा व्यवसाय करणाऱ्यांना त्याबाबत विचारणा केली, पण माहिती द्यायला कुणीही तयार होईना, याची खंत शिंगोटे यांना सतावू लागली. याचवेळी हातगाडीवर चुरमुरे, शेव, कांदा, मिरचीची भेळ विकण्यास प्रारंभ केला. नंतर, सायकलला पिशव्या अडकवून भेळीचा व्यवसाय सुरू केला. टेस्टी भेळीमध्ये साधे चुरमुरे, शेव, शेंगदाणे, टोमॅटो आणि कुरकरीतपणा येण्यासाठी शिंगोटे फोडणीचे चुरमुरे वापरतात. नगरपालिका, तहसीलदार कार्यालयांबाहेर सायकल उभी केली की, भेळ खाण्यासाठी खवय्यांची रांग लागते. व्यवसायातून जास्त कमाई होत नसली, तरी दोनवेळचे पोटभर जेवण मिळते, असे त्यांनी सांगितले. शिंगोटे यांची मुलेही हा व्यवसाय करतात.