शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

भाईंदर-वसई रो-रो सेवा जून महिन्यात सुरू होणार; जुना रेल्वे पूल ठरला अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 21:10 IST

जलमार्गाद्वारे वसई, भाईंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण - डोंबिवली शहरांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी उभारणीचे काम सुरू आहे.

मीरारोड - भाईंदर येथील जेट्टीचे काम झालेले असून नायगाव-वसई येथील जेट्टीचे काम ६० टक्के झालेले आहे. येत्या जून महिन्यापर्यंत काम पूर्ण होऊन भाईंदर-वसई अशी रो रो बोट सेवा सुरू होईल अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी रविवारी पाहणी दौऱ्यादरम्यान दिली. तर खाडीवरील जुना रेल्वे पूल खाली असल्याने जलवाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे . 

जलमार्गाद्वारे वसई, भाईंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण - डोंबिवली शहरांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी उभारणीचे काम सुरू आहे. रविवारी भाईंदरच्या जेसलपार्क जेट्टी येथून बोटीने भाईंदर-नायगाव असा प्रवास करत नायगाव येथील जेट्टीची पाहणी केली. खासदार राजन विचारे व राजेंद्र गावित, आमदार गीता जैन, मेरीटाईम बोर्डाचे संजय शर्मा, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, पश्चिम रेल्वेचे अधिकारी प्रियेश अग्रवाल, मच्छीमार नेते बर्नड  डिमेलो,  नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेवक संदीप पाटील, लक्ष्मण जंगम,  जॉर्जी गोविंद आदी  उपस्थित होते.

भाईंदर पश्चिम येथील जेट्टीचे काम पूर्ण झाले असून नायगाव येथील जेट्टीचे काम ६० टक्के झाले आहे. येत्या ३१ मे पर्यंत जेट्टीचे काम पूर्ण होऊन जून महिन्यापासून रो रो बोट सेवा सुरू होईल. ह्या मार्गावर जलवाहतुकीची सेवा उपलब्ध होऊन वसई-विरार व मीरा-भाईंदरच्या नागरिकांना रो रो मार्गे त्यांचे वाहने नेता येतील. जेणे करून महामार्ग द्वारे लांबचा वळसा घालून जाणारा वेळ व इंधन खर्च वाचेल. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल अशी माहिती विचारे यांनी दिली. विरंगुळा व पर्यटनाचा आनंद नागरिकांना घेता येईल व रोजगाराची संधी निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.

भाईंदर नायगाव दरम्यानच्या जुन्या पुलावर पाणजू गावासाठीची जलवाहिनी असून सदरचा पूल हा खाली असल्याने जलवाहतूकला अडथळा ठरत आहे. पाणजू गावची जलवाहिनी नवीन रेल्वे पुलावर स्थलांतरित करण्यासाठी रेल्वेकडून बारा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. सदर रक्कम माफ करण्यासाठी रेल्वे मंत्री यांना भेटणार आहोत. त्यानंतर धोकादायक झालेला पूल निष्कासित करून भविष्यात मोठ्या जलवाहतुकीसाठी मार्ग मोकळा होणार असल्याचे गावित व विचारे म्हणाले. 

टॅग्स :bhayandarभाइंदर