शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

भाईंदर-वसई रो-रो सेवा जून महिन्यात सुरू होणार; जुना रेल्वे पूल ठरला अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 21:10 IST

जलमार्गाद्वारे वसई, भाईंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण - डोंबिवली शहरांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी उभारणीचे काम सुरू आहे.

मीरारोड - भाईंदर येथील जेट्टीचे काम झालेले असून नायगाव-वसई येथील जेट्टीचे काम ६० टक्के झालेले आहे. येत्या जून महिन्यापर्यंत काम पूर्ण होऊन भाईंदर-वसई अशी रो रो बोट सेवा सुरू होईल अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी रविवारी पाहणी दौऱ्यादरम्यान दिली. तर खाडीवरील जुना रेल्वे पूल खाली असल्याने जलवाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे . 

जलमार्गाद्वारे वसई, भाईंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण - डोंबिवली शहरांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी उभारणीचे काम सुरू आहे. रविवारी भाईंदरच्या जेसलपार्क जेट्टी येथून बोटीने भाईंदर-नायगाव असा प्रवास करत नायगाव येथील जेट्टीची पाहणी केली. खासदार राजन विचारे व राजेंद्र गावित, आमदार गीता जैन, मेरीटाईम बोर्डाचे संजय शर्मा, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, पश्चिम रेल्वेचे अधिकारी प्रियेश अग्रवाल, मच्छीमार नेते बर्नड  डिमेलो,  नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेवक संदीप पाटील, लक्ष्मण जंगम,  जॉर्जी गोविंद आदी  उपस्थित होते.

भाईंदर पश्चिम येथील जेट्टीचे काम पूर्ण झाले असून नायगाव येथील जेट्टीचे काम ६० टक्के झाले आहे. येत्या ३१ मे पर्यंत जेट्टीचे काम पूर्ण होऊन जून महिन्यापासून रो रो बोट सेवा सुरू होईल. ह्या मार्गावर जलवाहतुकीची सेवा उपलब्ध होऊन वसई-विरार व मीरा-भाईंदरच्या नागरिकांना रो रो मार्गे त्यांचे वाहने नेता येतील. जेणे करून महामार्ग द्वारे लांबचा वळसा घालून जाणारा वेळ व इंधन खर्च वाचेल. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल अशी माहिती विचारे यांनी दिली. विरंगुळा व पर्यटनाचा आनंद नागरिकांना घेता येईल व रोजगाराची संधी निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.

भाईंदर नायगाव दरम्यानच्या जुन्या पुलावर पाणजू गावासाठीची जलवाहिनी असून सदरचा पूल हा खाली असल्याने जलवाहतूकला अडथळा ठरत आहे. पाणजू गावची जलवाहिनी नवीन रेल्वे पुलावर स्थलांतरित करण्यासाठी रेल्वेकडून बारा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. सदर रक्कम माफ करण्यासाठी रेल्वे मंत्री यांना भेटणार आहोत. त्यानंतर धोकादायक झालेला पूल निष्कासित करून भविष्यात मोठ्या जलवाहतुकीसाठी मार्ग मोकळा होणार असल्याचे गावित व विचारे म्हणाले. 

टॅग्स :bhayandarभाइंदर