शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध पाण्याकरिता ‘भगीरथ’ प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 03:51 IST

मुरबाडच्या कासगावातील लोकसहभाग; ५० पैशांत मिळतेय एक लीटर शुद्ध पाणी

- पंकज रोडेकर ठाणे : मुरबाड तालुक्यातील कासगावाने लोकसहभागातून शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभारला असून अवघ्या ५० पैशांमध्ये एक लीटर शुद्ध पाणी दिल्याने एक हजार लोकवस्तीच्या या गावातील साथीच्या आजारांवर नियंत्रण आले आहे.कामानिमित्त शहरी भागात राहताना येथील तरुणांनी शुद्ध पाण्याचे महत्त्व जाणले. गावाच्या मातीशी असलेले अतूट नाते जपून शहरी भागाप्रमाणे आपल्या गावकऱ्यांना शुद्ध पाणी पिता यावे, म्हणून गावातील ‘पाडवा मित्र मंडळा’ने शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभारला आहे.कासगावाने आजूबाजूच्या गावांना एक रुपयात एक लीटर शुद्ध पाणी उपलब्ध करून दिल्याने आजूबाजूच्या गावांमधील अनारोग्य दूर होण्यास हातभार लागला आहे. पाण्यावर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अशुद्ध पाणी वाया न घालवता ते ठिबक सिंचनाद्वारे ५० झाडांसाठी वापरून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा बहुमोल संदेश दिला आहे.मुरबाड शहरापासून २० किलोमीटर अंतरावर सरळगावनजीक कासगाव आहे. या गावाने ठाणे जिल्ह्याला तब्बल १९ तलाठी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना मुख्याध्यापक दिलेले आहेत. तसेच एसटी महामंडळातही या गावातील सुपुत्र कार्यरत आहेत. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी कधीच झालेली नाही. येथे ग्रामपंचायतीवर बिनविरोध सदस्य निवडून दिले जातात. कासगावात खालची, वरची आणि मधली आळी अशा तीन आळ्या आहेत. या गावातील तरुणवर्ग नोकरीनिमित्त मुंबई, ठाण्याकडे जातो. शेती हाच या गावकºयांचा मूळ व्यवसाय आहे. या गावाला ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा होतो. काही वर्षांपासून माजी सिडको संचालक प्रमोद हिंदुराव आणि समाजसेवक नानजीभाई ठक्कर यांच्या मदतीने गावकºयांनी लोकसहभागातून गावासाठी पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात पाण्याची पाइपलाइन पोहोचली. ते पाणी, अंघोळ, कपडे, लादी पुसणे आदी कामांसाठी वापरले जाते.पुरस्कारांचे १६ लाख शिल्लक : या गावाला नुकतेच स्मार्ट व्हिलेज म्हणून गौरवताना १० लाख रुपयांचा पुरस्कार जिल्हा परिषदेने दिला आहे. तालुकास्तरावर स्वच्छता अभियानांतर्गत एक लाख, तर जिल्हास्तरावर पाच लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर कोकण विभागीय स्तरावर निवड झाली आहे. तसेच तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला. त्या पुरस्कारातील काही रक्कम या प्रकल्पासाठी खर्च करता येईल का, यासाठी ग्रामसेवकांशी चर्चा करणार असल्याची माहिती गावाचे सरपंच टिकाराम पारध यांनी दिली.महिलांचा पुढाकारशुद्ध पाण्याच्या प्रकल्पामुळे गावकºयांना स्वच्छ पाण्याचे महत्त्व समजले आहे. गावाला ग्रामपंचायत, तसेच गावाने उभारलेल्या पाणपोईतून आणि शुद्ध पाण्याच्या प्रकल्पामुळे मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. पिण्याकरिता शुद्ध पाणी आणि इतर कामांसाठीही पाणी मिळत असल्याने आता ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी महिलावर्गाकडून होऊ लागलीआहे.रेल्वेस्थानकातील मशीनमुळे सुचली कल्पनाग्रामपंचायतीकडून मिळणाºया पाण्याचा जेथून पुरवठा होतो, त्या ठिकाणी विकास सुरेश यशवंतराव या तरुणाने जाऊन पाहिल्यावर त्याला धक्का बसला. हे पाणी पिणे आरोग्यास घातक असल्याचे त्यांनी सर्व गावकºयांच्या निदर्शनास आणले. ही गोष्ट साधारणत: मार्च महिन्यातील. त्यावर गावकºयांनी तत्काळ मीटिंग बोलवून ग्रामसेवकांशी चर्चा केली व नव्याने सरकारी पाणीयोजना आणण्याची मागणी केली. मात्र, नवी पाणीयोजना येण्यास वेळ लागेल, तोपर्यंत डागडुजी क रू, असे उत्तर ग्रामसेवकाने दिले.धीरज देशमुख नावाचा एक तरुण गावकºयांना शुद्ध पाण्याचे फिल्टर बसवण्यास वारंवार सांगत होता. पण, गावकºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. रेल्वेस्थानकावर माफक दरात मिळणाºया शुद्ध पाण्याच्या धर्तीवर गावासाठी काही करता येईल का, यावर गावकरी विचार करत होते. देशमुख याच्याकडे गावाकरिता शुद्ध पाणी पुरवण्याबाबत गावकºयांनी विचारणा केली. त्याच्या होकारानंतर, पैशांची अडचण उभी राहिली.गावकºयांच्या ‘पाडवा मित्र मंडळा’ने त्यांच्याकडे शिल्लक असलेले दोन लाख रुपये तत्काळ देण्याचा निर्णय घेतला. बाळाराम यशवंतराव यांनी तत्काळ पाण्याची मोटार दिली, तर कृष्णा रामचंद्र यशवंतराव यांनी बोअरवेल करून दिली. ही बोअरवेल गावाच्या सीमेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या मंदिरापर्यंत आणण्यासाठी गावकºयांनी ५०० मीटरची पाइपलाइन श्रमदानातून टाकली. त्यामुळे कासगावातील गावकरी आता लोकसहभागातून शुद्ध पाणी पित आहेत.हनुमान मंदिराजवळ शुद्ध पाण्याचे हे मशीन बसलेले आहे. गावकºयांमधील ताराचंद्र दत्तात्रेय चौधरी, मधुकर दाजी यशवंतराव, रमाकांत दत्तात्रेय यशवंतराव, शरद मोरेश्वर यशवंतराव, नंदकुमार विष्णू चौधरी, अशोक तुकाराम यशवंतराव, मनोहर रघुनाथ यशवंतराव, रमेश यशवंत यशवंतराव, अरविंद अनंत यशवंतराव, सुधीर जगन्नाथ चौधरी, मनोज दत्तात्रेय यशवंतराव, हनुमंत यशवंतराव आणि अनिल चौधरी आदी मंडळींनी याकरिता प्रयत्न केले.कॉइन आणि कार्डप्रणाली : गावकºयांच्या पुढाकाराने उभा राहिलेल्या प्रकल्पासाठी कॉइन आणि कार्डप्रणाली कार्यान्वित आहे. गावातील ५० कुटुंबांना कार्डवाटप केले असून ते कार्ड रिफील करावे लागते. त्यातील पैसे संपेपर्यंत ते कार्यान्वित राहणार आहे. या पैशांमधून लाइटबिल, देखभाल खर्च केला जाणार आहे. पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने पिण्यासाठी मोजकेच पाणी देण्याची सवय आता गावकºयांना लागल्याने त्यांना पाण्याचे महत्त्व कळू लागले आहे.सध्या दोन हजार लीटर मिळतेयया प्रकल्पांतर्गत, पाच हजार लीटरची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे, तर शुद्ध पाण्यासाठी दोन हजार लीटरची दुसरी टाकी बसवली आहे. साधारणत: गावकºयांना दिवसाला ५०० लीटर शुद्ध पाणी पिण्यासाठी पुरेसे पडते. त्यामुळे दीड हजार लीटर पाणी शिल्लक राहत असल्याने आजूबाजूच्या गावकºयांना एक रुपया लीटरने ते देण्यास सुरुवात केली आहे. तर, यातून वितरित होणाºया पाण्याचा हिशेबही एका नोंदवहीत ठेवला जात आहे.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे