शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

शुद्ध पाण्याकरिता ‘भगीरथ’ प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 03:51 IST

मुरबाडच्या कासगावातील लोकसहभाग; ५० पैशांत मिळतेय एक लीटर शुद्ध पाणी

- पंकज रोडेकर ठाणे : मुरबाड तालुक्यातील कासगावाने लोकसहभागातून शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभारला असून अवघ्या ५० पैशांमध्ये एक लीटर शुद्ध पाणी दिल्याने एक हजार लोकवस्तीच्या या गावातील साथीच्या आजारांवर नियंत्रण आले आहे.कामानिमित्त शहरी भागात राहताना येथील तरुणांनी शुद्ध पाण्याचे महत्त्व जाणले. गावाच्या मातीशी असलेले अतूट नाते जपून शहरी भागाप्रमाणे आपल्या गावकऱ्यांना शुद्ध पाणी पिता यावे, म्हणून गावातील ‘पाडवा मित्र मंडळा’ने शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभारला आहे.कासगावाने आजूबाजूच्या गावांना एक रुपयात एक लीटर शुद्ध पाणी उपलब्ध करून दिल्याने आजूबाजूच्या गावांमधील अनारोग्य दूर होण्यास हातभार लागला आहे. पाण्यावर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अशुद्ध पाणी वाया न घालवता ते ठिबक सिंचनाद्वारे ५० झाडांसाठी वापरून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा बहुमोल संदेश दिला आहे.मुरबाड शहरापासून २० किलोमीटर अंतरावर सरळगावनजीक कासगाव आहे. या गावाने ठाणे जिल्ह्याला तब्बल १९ तलाठी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना मुख्याध्यापक दिलेले आहेत. तसेच एसटी महामंडळातही या गावातील सुपुत्र कार्यरत आहेत. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी कधीच झालेली नाही. येथे ग्रामपंचायतीवर बिनविरोध सदस्य निवडून दिले जातात. कासगावात खालची, वरची आणि मधली आळी अशा तीन आळ्या आहेत. या गावातील तरुणवर्ग नोकरीनिमित्त मुंबई, ठाण्याकडे जातो. शेती हाच या गावकºयांचा मूळ व्यवसाय आहे. या गावाला ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा होतो. काही वर्षांपासून माजी सिडको संचालक प्रमोद हिंदुराव आणि समाजसेवक नानजीभाई ठक्कर यांच्या मदतीने गावकºयांनी लोकसहभागातून गावासाठी पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात पाण्याची पाइपलाइन पोहोचली. ते पाणी, अंघोळ, कपडे, लादी पुसणे आदी कामांसाठी वापरले जाते.पुरस्कारांचे १६ लाख शिल्लक : या गावाला नुकतेच स्मार्ट व्हिलेज म्हणून गौरवताना १० लाख रुपयांचा पुरस्कार जिल्हा परिषदेने दिला आहे. तालुकास्तरावर स्वच्छता अभियानांतर्गत एक लाख, तर जिल्हास्तरावर पाच लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर कोकण विभागीय स्तरावर निवड झाली आहे. तसेच तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला. त्या पुरस्कारातील काही रक्कम या प्रकल्पासाठी खर्च करता येईल का, यासाठी ग्रामसेवकांशी चर्चा करणार असल्याची माहिती गावाचे सरपंच टिकाराम पारध यांनी दिली.महिलांचा पुढाकारशुद्ध पाण्याच्या प्रकल्पामुळे गावकºयांना स्वच्छ पाण्याचे महत्त्व समजले आहे. गावाला ग्रामपंचायत, तसेच गावाने उभारलेल्या पाणपोईतून आणि शुद्ध पाण्याच्या प्रकल्पामुळे मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. पिण्याकरिता शुद्ध पाणी आणि इतर कामांसाठीही पाणी मिळत असल्याने आता ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी महिलावर्गाकडून होऊ लागलीआहे.रेल्वेस्थानकातील मशीनमुळे सुचली कल्पनाग्रामपंचायतीकडून मिळणाºया पाण्याचा जेथून पुरवठा होतो, त्या ठिकाणी विकास सुरेश यशवंतराव या तरुणाने जाऊन पाहिल्यावर त्याला धक्का बसला. हे पाणी पिणे आरोग्यास घातक असल्याचे त्यांनी सर्व गावकºयांच्या निदर्शनास आणले. ही गोष्ट साधारणत: मार्च महिन्यातील. त्यावर गावकºयांनी तत्काळ मीटिंग बोलवून ग्रामसेवकांशी चर्चा केली व नव्याने सरकारी पाणीयोजना आणण्याची मागणी केली. मात्र, नवी पाणीयोजना येण्यास वेळ लागेल, तोपर्यंत डागडुजी क रू, असे उत्तर ग्रामसेवकाने दिले.धीरज देशमुख नावाचा एक तरुण गावकºयांना शुद्ध पाण्याचे फिल्टर बसवण्यास वारंवार सांगत होता. पण, गावकºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. रेल्वेस्थानकावर माफक दरात मिळणाºया शुद्ध पाण्याच्या धर्तीवर गावासाठी काही करता येईल का, यावर गावकरी विचार करत होते. देशमुख याच्याकडे गावाकरिता शुद्ध पाणी पुरवण्याबाबत गावकºयांनी विचारणा केली. त्याच्या होकारानंतर, पैशांची अडचण उभी राहिली.गावकºयांच्या ‘पाडवा मित्र मंडळा’ने त्यांच्याकडे शिल्लक असलेले दोन लाख रुपये तत्काळ देण्याचा निर्णय घेतला. बाळाराम यशवंतराव यांनी तत्काळ पाण्याची मोटार दिली, तर कृष्णा रामचंद्र यशवंतराव यांनी बोअरवेल करून दिली. ही बोअरवेल गावाच्या सीमेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या मंदिरापर्यंत आणण्यासाठी गावकºयांनी ५०० मीटरची पाइपलाइन श्रमदानातून टाकली. त्यामुळे कासगावातील गावकरी आता लोकसहभागातून शुद्ध पाणी पित आहेत.हनुमान मंदिराजवळ शुद्ध पाण्याचे हे मशीन बसलेले आहे. गावकºयांमधील ताराचंद्र दत्तात्रेय चौधरी, मधुकर दाजी यशवंतराव, रमाकांत दत्तात्रेय यशवंतराव, शरद मोरेश्वर यशवंतराव, नंदकुमार विष्णू चौधरी, अशोक तुकाराम यशवंतराव, मनोहर रघुनाथ यशवंतराव, रमेश यशवंत यशवंतराव, अरविंद अनंत यशवंतराव, सुधीर जगन्नाथ चौधरी, मनोज दत्तात्रेय यशवंतराव, हनुमंत यशवंतराव आणि अनिल चौधरी आदी मंडळींनी याकरिता प्रयत्न केले.कॉइन आणि कार्डप्रणाली : गावकºयांच्या पुढाकाराने उभा राहिलेल्या प्रकल्पासाठी कॉइन आणि कार्डप्रणाली कार्यान्वित आहे. गावातील ५० कुटुंबांना कार्डवाटप केले असून ते कार्ड रिफील करावे लागते. त्यातील पैसे संपेपर्यंत ते कार्यान्वित राहणार आहे. या पैशांमधून लाइटबिल, देखभाल खर्च केला जाणार आहे. पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने पिण्यासाठी मोजकेच पाणी देण्याची सवय आता गावकºयांना लागल्याने त्यांना पाण्याचे महत्त्व कळू लागले आहे.सध्या दोन हजार लीटर मिळतेयया प्रकल्पांतर्गत, पाच हजार लीटरची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे, तर शुद्ध पाण्यासाठी दोन हजार लीटरची दुसरी टाकी बसवली आहे. साधारणत: गावकºयांना दिवसाला ५०० लीटर शुद्ध पाणी पिण्यासाठी पुरेसे पडते. त्यामुळे दीड हजार लीटर पाणी शिल्लक राहत असल्याने आजूबाजूच्या गावकºयांना एक रुपया लीटरने ते देण्यास सुरुवात केली आहे. तर, यातून वितरित होणाºया पाण्याचा हिशेबही एका नोंदवहीत ठेवला जात आहे.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे