शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांचे आदेश भाईंदर पालिकेने धुडकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:18 IST

बेकायदा बांधकामांवर कारवाई; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, भूमाफियांकडून अतिक्रमण

- धीरज परबभाईंदर: मीरा-भाईंदरमधील सरकारी जमिनींवर होणारे अतिक्रमण व बेकायदा बांधकामांवर कारवाईची जबाबदारी स्थानिक प्राधिकरण म्हणून मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. त्यामुळे पालिकेने कारवाई करावी, असे निर्देश तहसीलदारांनी पालिकेस दिले आहेत. परंतु, पालिकेने कारवाईबाबत टाळटाळ केली.सरकारी जमिनींपैकी अनेक जमिनींवर विकास आराखड्यातील आरक्षणे टाकली आहेत. या जमिनींवर राजकारणी, भूमाफियांनी अतिक्रमण चालवले आहे. सरकारी जागा वा त्यावर बांधकामे करून त्याची सर्रास विक्री केली जाते. लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून सरकारी जागेतील बेकायदा बांधकामांना पालिका पाणी, स्वच्छतागृह, दिवाबत्ती, रस्ते, पदपथ, गटारे आदी सुविधा पुरवते.सरकारी जमीन असताना त्यावर होणाºया बेकायदा बांधकामांवर महापालिका कारवाई करत नाही. महसूल विभागास तुमच्या जागेत झालेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी वेळ ठरवावी, अशी पत्रे देऊन हात झटकले जातात. यादरम्यान बेकायदा बांधकामे उरकली जातात. वास्तविक, महसूल आणि मीठ विभागाकडे अतिक्रमण हटवण्याची यंत्रणा आणि मनुष्यबळ नसल्याची कल्पना असूनही पालिका कागदी घोडे नाचवत सरकारचे पत्रक असल्याचा हवाला देत आली आहे. पालिका, लोकप्रतिनिधींसह तलाठी, मंडळ अधिकारी आणि मीठ विभागाचे अधिकारीही जबाबदार आहेत. कारण, बेकायदा बांधकामे करणारे वा त्यात वास्तव्य करणाऱ्यांविरोधात नियमितपणे गुन्हे दाखल करण्यास सातत्याने टाळटाळ करत आली आहे. कारवाईच्यावेळीही ते जागेवर येत नाहीत.पालिका नेहमीच सरकारी जमीन म्हणून बेकायदा बांधकामांवर कारवाईस टाळटाळ करत आल्याने तहसीलदार अधिक पाटील यांनी पालिका उपायुक्तांना पत्र देऊन नियोजन प्राधिकरण म्हणून सरकारी जमिनींवर बांधकाम परवानगी देणे तसेच बेकायदा बांधकामांवर कारवाईची मूलभूत जबाबदारी पालिकेची असल्याचे कळवले आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी प्रभाग अधिकाºयांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून कारवाईसाठी नियुक्त केले आहे. उच्च न्यायालयानेही सरकारी जमिनींवरील बेकायदा बांधकामांवर कारवाईची जबाबदारी पालिकेला ढकलता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे कारवाईची जबाबदारी महापालिकेची असल्याचे त्यांनी सांगत निर्देश दिले आहेत. परंतु, तहसीलदारांनी दिलेल्या पत्राला पालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवत सरकारी जमिनींवरील बेकायदा बांधकामांवर कारवाई न करण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे.सरकारी जागेतील बेकायदा बांधकामांवर कारवाईची जबाबदारी महसूल विभागाची आहे. त्यांच्या जमिनींचे संरक्षण त्यांनी केले पाहिजे. सरकारचे तसे पत्र असून अतिक्रमण करणाºयांवर त्यांनी गुन्हे दाखल केले पाहिजे. पण, त्यांच्याकडून काहीच कार्यवाही केली जात नाही. त्यांना जेव्हा कारवाई करायची असेल, तेव्हा आम्ही यंत्रणा आणि मनुष्यबळ पुरवू. - दीपक पुजारी, उपायुक्तबेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका अधिनियमच्या कलम २६०, २६७ तसेच एमआरटीपी कायद्यातही कोणत्याही जमिनीवरील बेकायदा बांधकाम त्वरित तोडण्याची जबाबदारी पालिकेवर निश्चित केलेली आहे. उच्च न्यायालयानेही जमीन जरी जिल्हाधिकारी यांची असली, तरी कारवाईची जबाबदारी पालिका ढकलू शकत नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.- अ‍ॅड. सुशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक