शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

तानशेत, उंबरमाळी रेल्वेस्थानकांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 05:51 IST

सहा हजार प्रवाशांचा त्रास दूर होणार : गुरवली, सावरोली स्थानकांच्या मागणीचाही पाठपुरावा

शहापूर : तानशेत आणि उंबरमाळी या दोन रेल्वेस्थानकांचा भूमिपूजन समारंभ रविवारी खा. कपिल पाटील आणि आ. पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते पार पडला. लवकरच या दोन स्थानकांचे बांधकाम होऊन ही स्थानके उभारली जाणार असल्याने सुमारे सहा हजार प्रवाशांचा त्रास दूर होणार आहे. काही वर्षांपासून शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ उंबरमाळी तसेच तानशेत रेल्वेस्थानके अधिकृत करण्याची मागणी करत होते. या स्थानकांवर प्लॅटफॉर्मसह अन्य सुविधा नव्हत्या. काही वेळेस गाडी न थांबल्याने स्थानिकांचे हाल होत होते. त्यामुळे रेल्वेस्थानकांना अधिकृत मान्यता देण्याची मागणी होत होती.

कल्याण-कसारा-कर्जत म्हणजे के-३ आणि कल्याण- कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन या दोन रेल्वे संघटनांनी निवेदने देऊन भेटीगाठी घेऊन आंदोलन तसेच धरणे यामार्फत प्रयत्न सुरू ठेवले होते. वरिष्ठ पातळीवर मंजुरीसाठी प्रयत्न झाल्याने अखेर हा प्रश्न मार्गी लागला. हजारो प्रवाशांची दैना दूर झाल्याने त्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे, आदिवासी प्रकल्पस्तरीय अध्यक्ष अशोक इरणक, भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, भाजपाच्या रंजन उघडा, शिरोळचे सरपंच संतोष आरे, उपसरपंच सचिन निचिते, राष्ट्रवादीचे नेते मनीष निचिते, लाहेगावचे उपसरपंच अरु ण खंबाळकर आणि उंबरमाळी, तानशेत पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. यामुळे येथील प्रवाशांचे हाल वाचणार आहेत.च्गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुरवली, सावरोली या रेल्वेस्थानकांच्या मागणीचादेखील पाठपुरावा करणार असल्याचे खासदार पाटील यांनी स्पष्ट केले.च्१९६५ पासून तत्कालीन खासदार सोनुभाऊ बसवंत यांनी केलेल्या पत्रव्यवहाराचा संदर्भ घेत आतात्या स्थानकांचीही मागणीलवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :railwayरेल्वेthaneठाणेpassengerप्रवासी