शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हेही नसे थोडके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 08:59 IST

काही गोष्टी मनाला फार हुरहूर लावून जातात. काल झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीनंतरही मनाला अशीच हुरहुर लागली आहे.

बाळकृष्ण परब/ ऑनलाइन लोकमत    
 काही गोष्टी मनाला फार हुरहूर लावून जातात. काल झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीनंतरही मनाला अशीच हुरहुर लागली आहे. स्वप्नवत कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारणाऱ्या भारताच्या रणरागिणी  इंग्लंडमधून विश्वचषक आणतील, अशी अपेक्षा होती. त्यांनी यजमान इंग्लंडविरुद्ध झालेल्या फायनलमध्येही कामगिरीत सातत्य राखत जवळपास विश्वविजेतेपद खेचून आणले होते. पण शेवटी जे घडू नये तेच झाले. नशिबाने दगा दिला. खेळाडूंचा संयम सुटला आणि हातात आलेला विश्वचषक निसटला. गेल्या महिनाभरापासून घेतलेल्या कष्टाचे चीज नाही झाले. ज्यांनी ज्यांनी हा सामना पाहिला त्यांचे डोळे पाणावले. देश हळहळला. पण पराभूत होऊनही सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी आणि ज्यांचे क्रिकेटशी फार सौख्य नाही अशा मंडळींकडून महिला संघाने जे प्रेम मिळवले त्याला तोड नाही. हा अनेक वर्षे उपेक्षित राहिलेल्या भारतीय महिला क्रिकेटसाठी विश्वचषकापेक्षाही मोठा विजय आहे. 
 खरंतर विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी भारतीय संघाला कुणीही विजेतेपदाचा दावेदार मानत नव्हते. अगदी महिला क्रिकेट वर्षानूवर्षे पाहणारेही या संघाकडे संभाव्य विजेता म्हणून पाहत नव्हते. त्यामुळे सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना त्यांच्याकडून अपेक्षा असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण मिताली राजच्या धाकड गर्ल्सनी विश्वचषकात जो कारनामा केला तो स्वप्नवत होता. पात्रता फेरीचे दिव्य पार करून मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवल्यानंतर त्यांनी पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडला दणका दिला. येथूनच वुमेन्स इन ब्ल्यू चर्चेत आली. मग महिनाभरात काय झाले त्याचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही. 
कधी नव्हे ते भारतीय महिला क्रिकेट चर्चेत आले. तसे ते आधीही होते. पण त्यावेळी पुरुष संघाच्या तुलनेत महिला क्रिकेटची चर्चा नगण्यच व्हायची. पण यंदाच्या विश्वचषकाने हे चित्र बदलले. मिताली राज आणि झूलन गोस्वामी वगळता बाकीच्या महिला क्रिकेटपटूं प्रसिद्धीच्या झोतात नव्हत्या. यावेळी मात्र स्मृती मंधाना, पूनम राऊत, हरमनप्रीत, वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडे चर्चेत आल्या. कॉलेजचे कट्टे असोत की लोकलमधील ग्रुप महिला क्रिकेटची कधी नव्हे तितकी चर्चा झाली.  थेट प्रक्षेपित झालेले सामनेही मोठ्या प्रमाणावर पाहिले गेले. सोशल मीडियावरही महिला क्रिकेट ट्रेंडमध्ये होते. चर्चा इतकी झाली की महिला क्रिकेटपटूंच्या दमदार कामगिरीच्या झंझावातात पुरुष संघात प्रशिक्षक पदावरून रंगलेले मानापमान नाट्य झाकोळले गेले.  
 एकूणच संघाने केलेली जबरदस्त कामगिरी आणि त्यांना मिळत असलेला पाठिंबा यामुळे लॉर्ड्सवर नवा इतिहास लिहिला जाणार. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मिताली राज विश्वचषक उचलणार असेच वाटत होते. पण शेवटच्या क्षणी निराशा झाली. असो. पण महिला संघ ज्याप्रमाणे खेळला. जो लढाऊ बाणा त्यांनी आपल्या खेळात दाखवला. त्यामुळे सर्वांच्या मनात घर करण्यात त्या यशस्वी ठरल्यात. भारताच्या संदर्भात बघायचे झाले तर क्रिकेट हा पुरुषी खेळ. क्रिकेट खेळणाऱ्या महिला, मुली यांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत नगण्यच. तरीही भारतीय महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठतात हे कौतुकास्पद म्हटले पाहिजे. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय महिला क्रिकेटसाठी नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. क्रिकेट भारतात लोकप्रिय आहेच, पण त्यात महिला क्रिकेटपटूंनीही अशीच कामगिरी सातत्याने केल्यास भारतात महिला क्रिकेटही जबरदस्त लोकप्रियता मिळवेल. त्यामुळे मिताली राज आणि तिच्या सहकारी विश्वचषक जिंकूण आणण्यात अपयशी ठरल्या असल्या तरी त्यांनी महिला क्रिकेटमध्ये केलेली क्रांती भारतीय क्रिकेट आणि एकूणच क्रीडाक्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.