शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

भाजीपाला उत्पादनाचा कालावधी बदलल्याने फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:42 IST

विविध भाजीपाल्यांची लागवड; काकडी, मिरचीसोबतच कारल्याचेही घेतले उत्पादन

- जर्नादन भेरे भातसानगर : यंदा शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात काकडीचे उत्पादन आले होते. मात्र, भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेल्या काकडीच्या पिकावर अक्षरश: नांगर फिरवला होता. असे असले तरी तालुक्यातील सारमाळ येथील महिला शेतकरी मनीषा पाटील यांनी कालावधी बदलून काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या शेतात पिकणाºया काकडीला चांगला भाव मिळत आहे.पती मंगेश पाटील यांच्या साथीने मनीषा या सात एकर शेतजमिनीत भाजीपाला पीक घेत आहेत. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत.पाटील यांनी कारली, अंतरपीक मिरची व झेंडूची फुले आणि दोन एकरमध्ये सिमला मिरचीची लागवड केली आहे. दिवसाआड ९०० किलो मिरची बाजारात विक्रीसाठी जाते, तर ८०० ते ९०० किलो काकडी १२ ते १४ रु पये दराने बाजारात विकली जात आहे. हीच काकडी काही दिवसांपूर्वी दोन रु पये किलोने जात होती. दीड फुटांपर्यंतच्या कारल्याचे उत्पादन त्या घेत असून अंतरपीक मिर्चीतूनही त्यांना एक ते दीड लाखांचा नफा अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यात काकडीच्या अधिक उत्पादनामुळे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी काकडी उपटून फेकून देण्याची वेळ आली होती. मात्र, कालावधी बदलून घेतलेल्या काकडी आणि मिरचीच्या उत्पादनातून दोन ते अडीच लाखांपर्यंत नफा मिळण्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला आहे.सेंद्रिय खतांमुळे शेतातच उठावसर्वच शेतात ठिबकच्या सहाय्याने लागवड केली आहे. तसेच सेंद्रिय खतांची जोड दिल्याने या हिरव्यागार भाजीपाल्याला शेतातच मागणी मिळत असल्याचे मनीषा पाटील यांनी सांगितले. केवळ एकाच प्रकारच्या भाजीपाल्याच्या उत्पादनावर अवलंबून न राहता शेती केल्यास फायदेशीर ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाच्या उत्पादनामुळे एखाद्या पिकाला भाव मिळाला नाही तरी दुसºया पिकातून ते भरून काढण्याची संधी शेतकºयांना मिळत आहे.- विलास झुंजाराराव, कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरी