शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

भाजीपाला उत्पादनाचा कालावधी बदलल्याने फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:42 IST

विविध भाजीपाल्यांची लागवड; काकडी, मिरचीसोबतच कारल्याचेही घेतले उत्पादन

- जर्नादन भेरे भातसानगर : यंदा शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात काकडीचे उत्पादन आले होते. मात्र, भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेल्या काकडीच्या पिकावर अक्षरश: नांगर फिरवला होता. असे असले तरी तालुक्यातील सारमाळ येथील महिला शेतकरी मनीषा पाटील यांनी कालावधी बदलून काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या शेतात पिकणाºया काकडीला चांगला भाव मिळत आहे.पती मंगेश पाटील यांच्या साथीने मनीषा या सात एकर शेतजमिनीत भाजीपाला पीक घेत आहेत. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत.पाटील यांनी कारली, अंतरपीक मिरची व झेंडूची फुले आणि दोन एकरमध्ये सिमला मिरचीची लागवड केली आहे. दिवसाआड ९०० किलो मिरची बाजारात विक्रीसाठी जाते, तर ८०० ते ९०० किलो काकडी १२ ते १४ रु पये दराने बाजारात विकली जात आहे. हीच काकडी काही दिवसांपूर्वी दोन रु पये किलोने जात होती. दीड फुटांपर्यंतच्या कारल्याचे उत्पादन त्या घेत असून अंतरपीक मिर्चीतूनही त्यांना एक ते दीड लाखांचा नफा अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यात काकडीच्या अधिक उत्पादनामुळे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी काकडी उपटून फेकून देण्याची वेळ आली होती. मात्र, कालावधी बदलून घेतलेल्या काकडी आणि मिरचीच्या उत्पादनातून दोन ते अडीच लाखांपर्यंत नफा मिळण्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला आहे.सेंद्रिय खतांमुळे शेतातच उठावसर्वच शेतात ठिबकच्या सहाय्याने लागवड केली आहे. तसेच सेंद्रिय खतांची जोड दिल्याने या हिरव्यागार भाजीपाल्याला शेतातच मागणी मिळत असल्याचे मनीषा पाटील यांनी सांगितले. केवळ एकाच प्रकारच्या भाजीपाल्याच्या उत्पादनावर अवलंबून न राहता शेती केल्यास फायदेशीर ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाच्या उत्पादनामुळे एखाद्या पिकाला भाव मिळाला नाही तरी दुसºया पिकातून ते भरून काढण्याची संधी शेतकºयांना मिळत आहे.- विलास झुंजाराराव, कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरी