शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

अर्थसंकल्पात मिळेल सर्वसामान्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:52 IST

लोकसभेची निवडणूक २०१९ मध्ये होणार आहे. त्यामुळे भाजपाप्रणीत केंद्र सरकारचा यंदाच्या वर्षीचा हा तसा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे

कल्याण : लोकसभेची निवडणूक २०१९ मध्ये होणार आहे. त्यामुळे भाजपाप्रणीत केंद्र सरकारचा यंदाच्या वर्षीचा हा तसा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. त्यात सामान्यांचा विचार केला जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा अर्थविषयक सल्लागार मंगेश घाणेकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे ‘नियोजन गुंतवणुकी’चे या विषयांतर्गत घाणेकर यांनी ‘अर्थनियोजन आणि प्राप्तिकर’, तर अर्थविश्लेषक तेजस्विता चौधरी यांनी ‘शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड’ यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी घाणेकर बोलत होते. या वेळी कल्याण जनता बँकेचे सुरेश पटवर्धन, पोलीस उपायुक्त संजय शिंदे उपस्थित होते. पत्रकार वीरेंद्र तळेगावकर यांनी मान्यवरांशी संवाद साधला.घाणेकर म्हणाले की, पाच लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना यंदाच्या अर्थसंकल्पात सूट दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा गरिबाभिमुख असेल. मात्र, १० लाख वार्षिक उत्पन्न असणाºयांना यंदाच्या अर्थसंकल्पात सवलती मिळण्याची शक्यता कमी आहे. पैशाने पैसा वाढतो. त्यामुळे आपली गुंतवणूकही नियमित असली पाहिजे. एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केल्यावर त्यातून मिळणारा लाभ हा उशिरा मिळेल, त्यासाठी संयम हवा. गुंतवणूक करताना अभ्यासपूर्ण करा. फिक्स डिपॉझिटव्यतिरिक्त अन्य पर्याय काय आहेत, हे पाहून गुंतवणूक करा. आपण पारंपरिक पद्धतीने फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवतो. वर्षाला त्यावर केवळ ६.५० ते ७ टक्के व्याज मिळते. महागाईचा दरच ५ टक्के आहे. त्यामुळे फिक्स डिपॉझिटमधून मिळालेले व्याज जर महागाई खात असेल, तर वर्षाला तुम्हाला एक ते दीड टक्काच व्याजाचा फायदा झाला. आपण कर भरणार असलो, तरी त्याचा परतावा आहे की नाही. आपण न चुकता कर भरला पाहिजे, तसे न केल्यास सरकार बाजारातून पैसा उचलते. बाजारातील उद्योगधंद्यांना पैसा कमी पडतो. त्यांना जास्त व्याज भरून पैसा उभारावा लागतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि पर्यायाने महागाई वाढते. महागाई वाढली की, पैसा हाती राहत नाही. परिणामी, बचत कमी होते. बचत झाली नाही की, गुंतवणूक करता येत नाही. हे दुष्टचक्र कर चुकवल्याने होते. योग्य तो कर भरलाच पाहिजे, असे घाणेकर यांनी सांगितले. करप्रणाली एकदोन वर्षांत बदलता येत नाही. करप्रणाली बदलणे ही प्रक्रिया मोठी आहे. त्यासाठी किमान १० ते १५ वर्षे कालावधी लागू शकतो, असे मत घाणेकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८