शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात मिळेल सर्वसामान्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:52 IST

लोकसभेची निवडणूक २०१९ मध्ये होणार आहे. त्यामुळे भाजपाप्रणीत केंद्र सरकारचा यंदाच्या वर्षीचा हा तसा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे

कल्याण : लोकसभेची निवडणूक २०१९ मध्ये होणार आहे. त्यामुळे भाजपाप्रणीत केंद्र सरकारचा यंदाच्या वर्षीचा हा तसा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. त्यात सामान्यांचा विचार केला जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा अर्थविषयक सल्लागार मंगेश घाणेकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे ‘नियोजन गुंतवणुकी’चे या विषयांतर्गत घाणेकर यांनी ‘अर्थनियोजन आणि प्राप्तिकर’, तर अर्थविश्लेषक तेजस्विता चौधरी यांनी ‘शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड’ यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी घाणेकर बोलत होते. या वेळी कल्याण जनता बँकेचे सुरेश पटवर्धन, पोलीस उपायुक्त संजय शिंदे उपस्थित होते. पत्रकार वीरेंद्र तळेगावकर यांनी मान्यवरांशी संवाद साधला.घाणेकर म्हणाले की, पाच लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना यंदाच्या अर्थसंकल्पात सूट दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा गरिबाभिमुख असेल. मात्र, १० लाख वार्षिक उत्पन्न असणाºयांना यंदाच्या अर्थसंकल्पात सवलती मिळण्याची शक्यता कमी आहे. पैशाने पैसा वाढतो. त्यामुळे आपली गुंतवणूकही नियमित असली पाहिजे. एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केल्यावर त्यातून मिळणारा लाभ हा उशिरा मिळेल, त्यासाठी संयम हवा. गुंतवणूक करताना अभ्यासपूर्ण करा. फिक्स डिपॉझिटव्यतिरिक्त अन्य पर्याय काय आहेत, हे पाहून गुंतवणूक करा. आपण पारंपरिक पद्धतीने फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवतो. वर्षाला त्यावर केवळ ६.५० ते ७ टक्के व्याज मिळते. महागाईचा दरच ५ टक्के आहे. त्यामुळे फिक्स डिपॉझिटमधून मिळालेले व्याज जर महागाई खात असेल, तर वर्षाला तुम्हाला एक ते दीड टक्काच व्याजाचा फायदा झाला. आपण कर भरणार असलो, तरी त्याचा परतावा आहे की नाही. आपण न चुकता कर भरला पाहिजे, तसे न केल्यास सरकार बाजारातून पैसा उचलते. बाजारातील उद्योगधंद्यांना पैसा कमी पडतो. त्यांना जास्त व्याज भरून पैसा उभारावा लागतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि पर्यायाने महागाई वाढते. महागाई वाढली की, पैसा हाती राहत नाही. परिणामी, बचत कमी होते. बचत झाली नाही की, गुंतवणूक करता येत नाही. हे दुष्टचक्र कर चुकवल्याने होते. योग्य तो कर भरलाच पाहिजे, असे घाणेकर यांनी सांगितले. करप्रणाली एकदोन वर्षांत बदलता येत नाही. करप्रणाली बदलणे ही प्रक्रिया मोठी आहे. त्यासाठी किमान १० ते १५ वर्षे कालावधी लागू शकतो, असे मत घाणेकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८