शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

समन्वयाअभावी रेल्वे प्रकल्पांना खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:14 IST

ठाणे जिल्ह्यात मध्य रेल्वेमार्गावर स्थानकांमधील पादचारी पूल, होम प्लॅटफॉर्म असे विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत.

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात मध्य रेल्वेमार्गावर स्थानकांमधील पादचारी पूल, होम प्लॅटफॉर्म असे विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे असहकार्य, रेल्वे आणि विविध सरकारी यंत्रणांमधील समन्वयाअभावी त्यांना खीळ बसत आहे. यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याची खंत ठाणे रेल्वे प्रवासी संघ, वांगणी रेल्वे प्रवासी संघटना आदींनी केली आहे.ठाणे रेल्वेचा नुकताच १६६ वा वाढदिवस झाला. या पार्श्वभूमीवर सध्याच्या रेल्वे प्रकल्पांची स्थिती आणि प्रवाशांची गैरसोय याबाबत गुरुवारी प्रवासी संघटनांनी ‘लोकमत’कडे नाराजी व्यक्त केली.या संघटनांचे अध्यक्ष मनोहर शेलार, नंदकुमार देशमुख म्हणाले की, टिटवाळा रेल्वेस्थानकातील पादचारी पूल, शहाड-आंबिवली दरम्यानचा उड्डाणपूल, वांगणी स्थानकातील पादचारी पूल तसेच बदलापूर स्थानकातील होम प्लॅटफॉर्म ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनला स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहकार्य मिळत नाही.देशमुख यांनी ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, तर शेलार यांनी वांगणी, बदलापूर नगर परिषद आदींकडे रेल्वे प्रकल्पांसंदर्भात सहकार्याबाबत चर्चा, पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. मात्र, अनेकदा टोलवाटोलवी झाल्याने हे प्रकल्प कागदावरच राहिल्याची टीका देशमुख यांनी केली.देशमुख म्हणाले की, अनेक प्रस्तावित प्रकल्प कागदावरच आहेत. कसारा मार्गावर तिसरी, चौथी रेल्वेलाइन हा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१४ पासून केवळ कागदावर आहे. तिसऱ्या मार्गाचे सर्वेक्षण झाल्याचे सांगण्यात येते, मात्र त्यापलीकडे काहीच झालेले नाही. टिटवाळा-गुरवली स्थानकांदरम्यान गावामध्ये येजा करण्यासाठी उड्डाणपुलाची मंजुरी आहे, पण ते सगळे हवेत असल्याचे देशमुख म्हणाले. आंबिवली-शहाडदरम्यान वडवली सेक्शनमध्ये अनेक वर्षे अर्धवट बांधकाम झालेला उड्डाणपूल, टिटवाळा रेल्वेस्थानकात काम सुरू असलेला पादचारी पूल, कागदावरच असलेला ठामपाच्या हद्दीतील दिव्याचा उड्डाणपूल याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारी यंत्रणांनी सहकार्य करून हे प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची अपेक्षा प्रवासी संघटनांनी व्यक्त केली.>रेल्वे प्रशासनाला त्यांच्या हद्दीत विकासकामे करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसते. ज्यावेळेस त्यांचे प्रकल्प आपल्या हद्दींशी संबंधित असतात, तेव्हा केडीएमसी प्रशासनाकडून सहकार्य केलेच जाते.- तरुण जुनेजा,प्रकल्प अभियंता, केडीएमसी>रेल्वे प्रशासनाला हवे ते सहकार्य केले जाते. ठामपांतर्गत येणारे उड्डाणपूल, पादचारी पूल याबाबतीत जे आराखडे आम्ही रेल्वे प्रशासनाला देणे अपेक्षित असते, ते तातडीने देतो. काही वेळेस तांत्रिक अडचण येते. अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. प्रवासी संघटनांना सर्व माहिती दिली जाईल.- संदीप माळवी, उपायुक्त,जनसंपर्क अधिकारी, ठामपा