शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

स्वत: अनाथ असून अनेक मुलांना आधार देत ‘त्यांनी’ केले सक्षम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:32 IST

संस्थेत राहून मोठे झालेल्यांपैकी सुमारे २०-२५ मुले स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत.

स्नेहा पावसकर ठाणे : स्वत: अनाथ असूनही कधी त्या गोष्टीचे भांडवल न करता उलट त्यातूनच प्रेरणा घेऊन समाजातील इतर अनाथ मुलांसाठी काम करण्यास पुढे सरसावून त्यांना सक्षम केले आहे, ते विरार येथील विजय सराटे यांनी. निराधार मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याच्या कामात त्यांची पत्नी त्यांना पूर्ण सहकार्य करते. आज त्यांच्या संस्थेत ५६ हून अधिक निराधार मुले राहत आहेत. नारायण चंद्र ट्रस्टच्या माध्यमातून विरार येथे अनाथाश्रम चालवला जातो. विजय सराटे हे त्याचे डायरेक्टर आहेत. १४ वर्षे ते निराधार मुलांचे सर्वतोपरी पुनर्वसन करत आहेत. आज त्यांच्याकडे ६ ते १८ वयोगटांतील मुले-मुली आहेत. त्यांच्या पुढील शिक्षणासाठीही ते इतर संस्थांशी त्यांना जोडून देतात. संस्थेत राहून मोठे झालेल्यांपैकी सुमारे २०-२५ मुले स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत.विजय यांनी उच्च शिक्षण घेऊन मास्टर्स आॅफ सोशल वर्क पदवी मिळवलेली आहे. मीना या अनाथ मुलीशीच त्यांनी विवाह केला आणि आज ते दोघेही अनाथ मुलांचे नाथ झाले आहेत. त्यांना दोन मुले असून तीसुद्धा अनाथाश्रमातील इतर मुलांमध्ये मिसळून राहतात. ट्रस्टच्या माध्यमातून महिलांचे वसतिगृह आणि वृद्धाश्रमही चालवला जात आहे. यातून येणाऱ्या मदतीतून मुलांसाठी अनाथाश्रम चालवल जातो. कोरोनाचे संकट उभे ठाकले असताना या सर्व मुलांची काळजी वाटते. परंतु, शाळा नसल्याने मुले अनाथाश्रमाच्या इमारतीतच असतात.बाहेरील व्यक्ती कोणीही तिथे जात नसल्याने मुलांना कोरोनाचा धोका नाही. तरीही, आम्ही वारंवार महापालिकेच्या माध्यमातून तसेच संस्थेच्या खर्चातून आश्रमाच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करून घेतो. तसेच कोरोनाबाबतची मुलांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी विविध खेळ, मनोरंजनात्मक छोटे कार्यक्रम मुलांसाठी तिथेच आयोजित करतो, असे विजय सराटे यांनी सांगितले.>मी स्वत: अनाथ असल्याने देवरूख येथील इंदिराबाई हळबे स्थापित मातृमंदिर या संस्थेतून माझे शिक्षण आणि पुनर्वसन झाले. उच्च शिक्षण घेऊन नोकरी करत असतानाही अनाथ मुलांसाठी काम करण्याचा विचार माझ्या डोक्यात होता. ट्रस्टच्या माध्यमातून मी हे काम करत असून या सर्व मुलांना मी आधार देऊ शकलो, याचे मला आत्मिक समाधान आहे.- विजय सराटे