शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

ठाणे महापालिका प्रशासनाच्या कठोर भुमिकेमुळे घंटागाडी कामगारांचे बंद आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:09 IST

आधी कामावर हजर व्हा अन्यथा दुसरा पर्याय निवडावा लागेल असा इशारा ठाणे महापालिकेने दिल्यानंतर अवघ्या एका दिवसातच घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतले आहे.

ठळक मुद्देबुधवारी होणार कामगारांच्या प्रश्नावर चर्चामागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संपाचा इशारा

ठाणे - विविध मांगण्यासाठी गुरुवार पासून घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. परंतु केवळ एकाच दिवसांत हे कामगार कामावर पुन्हा रु जू झाले आहेत. बेमुदत संपाची हाक देणाऱ्या  कामगारांनी प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे एका दिवसांतच आपला संप मागे घेतला आहे. आधी कामावर रुजू व्हा अन्यथा पर्यायी व्यवस्था केली जाईल अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली असल्याने अखेर हा संप मागे घेण्यात आला. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात बुधवारी पालिका उपयुक्तांकडे एक बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीमध्ये या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीपर्यंत संप मागे घेण्यात आला असल्याचा दावा कामगारांच्या वतीने करण्यात आला आहे.           विविध प्रकारची थकबाकी, पुढील तीन वर्षाच्या कपडय़ांचे आधीच पैसे कापणे, तीन महिन्यापासून सुरु असलेली पगारात कपात यासह विविध मागण्यांसाठी आणि ठेकेदाराच्या अरेरावीच्या विरोधात २४० घंटागाडी कामगारांनी गुरुवारी सकाळ पासून अचानकपणे काम बंद आंदोलन सुरु केले होते. गुरु वारी सकाळी वर्तक नगर, वागळे आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत एकही घंटा गाडी फिरकली नाही. त्यामुळे या भागातील नागरीकांना घंटा गाडी न येण्याचा मुद्दाच समजू शकला नाही. प्रत्यक्षात या भागात फिरणाऱ्या  २४० घटांगाडीवरील कामगारांनी हे काम बंद आंदोलन पुकारले होते. ठेकेदार एम. कुमार यांच्या अरेरावीचा विरोध करीत या कामगारांनी गुरु वारी एकही गाडी बाहेर काढली नाही. या कामागारांच्या म्हणन्यानुसार २०१८-१९ आणि २० या तीन वर्षाचे ठेकेदाराने कपडय़ांचे पैसे आधीच कापूण घेतले आहे. नियमानुसार ते चुकीचे असून या तीन वर्षाचे कपडे देखील त्याने आगाऊ घ्यावेत अशी नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे तीन वर्षाचे पैसे कापूनही हाती पडलेले कपडे केवळ आठ दिवसातच खराब झाले असून त्यांचा दर्जा देखील खालचा आहे. त्यातही तीन वर्षाचे पैसे कापले हे जरी मान्य केले तरी देखील २०१७ मधील देखील पैसे आता का कापले? असा सवाल या कामगारांनी उपस्थित केला आहे. मागील कित्येक वर्षापासूनची थकबाकी अद्यापही देण्यात आलेली नाही, पगार तारखेला होत नाहीत, कमी पगार दिला जातो, काही कामगार कामावर असून सुध्दा त्यांना कामावर नसल्याचे सांगून त्यांना पगारापासून वंचित ठेवले जात आहे. मागील तीन महिन्यापासून ७ हजार २०० रु पये पगारातून कापले जात आहेत, ते कशासाठी कापले जात आहेत, याचे उत्तर देखील मिळत नाही. याबाबत ठेकेदाराकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे.ठाण्यात सफाईसाठी आणि घंटागाडीवर ठेकेदारांच्या माध्यमातून काम करणाऱ्या कामगारांची संख्या १८०० इतकी आहे. यापैकी ४०० कामगार हे घंटागाडीवर काम करतात. सर्व कंत्राटी कामगार तीन ठेकेदारांमध्ये विभागले गेले असून जे कामगार एम कुमार यांच्याकडे काम करत आहेत अशा २४० कामगारांच्या वतीने हा संप पुकारण्यात आला होत. बुधवार पर्यंत पालिका प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाली नाही तर पुन्हा एकदा संप पुकारण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाStrikeसंप