शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाआडून समाजात तेढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:01 IST

कोकण इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

टिटवाळा : इतिहास नीट न समजून घेता त्याआधारे सध्या जातीधर्माच्या भेदाला तोंड फोडले जात आहे. त्यातून समाजात तेढ निर्माण होत आहे. इतिहास समजून घेतल्यास समाजात वाद होणार नाहीत, असे परखड मत कोकण इतिहास परिषदेच्या नवव्या राष्टÑीय अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. मंजिरी भालेराव यांनी व्यक्त केले.

महापुरुषांवरून सुरू असलेल्या सध्याच्या राजकारणावर त्यांनीही अप्रत्यक्ष टिप्पणी केली. कल्याण तालुक्यातील जीवनदीप संस्थेच्या गोवेली महाविद्यालयात शनिवारपासून दोनदिवसीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार रामनाथ मोते, डॉ. धनाजी गुरव, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड, कल्याण शाखाध्यक्ष जितेंद्र भामरे, जीवनदीप संस्थेचे संस्थापक रवींद्र घोडविंदे, उपजिल्हाधिकारी नितीन महाजन, अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक अप्पा परब यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. भालेराव म्हणाल्या की, जुन्यानव्याची सांगड घालून इतिहासातील सत्य शोधून काढणे, हे इतिहास संशोधकांपुढील सध्याचे मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी इतिहास अभ्यासकांसह संशोधकांनी पुढे यायला हवे. इतिहासाबाबत अधिक संशोधन व्हायला हवे. त्यातून खऱ्या इतिहासाची समाजासमोर मांडणी झाली पाहिजे. पूर्वजांनी व आधीच्या इतिहासकारांनी काय इतिहासलेखन केले आहे, हे प्रथम जाणून घेतले पाहिजे. ते समजून घेतल्यावर नवे लेखन होणे अपेक्षित आहे. तसे आपल्याकडे होत नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. इतिहासाची उपयुक्तता सर्वच क्षेत्रांत आहे. शिल्पकला, सिनेमा आणि अगदी कॉम्प्युटर सायन्समध्ये इतिहासाचा वापर होत आहे, असे सांगून या क्षेत्रात बºयाच संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाजन म्हणाले की, इतिहास हा विषय आपल्या जीवनाला कलाटणी देणारा आहे. पण, सद्य:स्थितीत इतिहास हा विषय भूतकाळात जमा होत असल्याचे दिसत आहे. तरुणांना हा विषय किचकट वाटत आहे. इतिहासाची कास धरली तर त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे इतिहास जोपासा, तो समजून घ्या व आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्याचा प्रयत्न करा. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पुस्तकखरेदीसाठीही त्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान छायाचित्रण, रांगोळी स्पर्धा व माहितीपट स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.इतिहास मनात रुजला पाहिजे : परबइतिहास समजून घेण्यासाठी तो मनात रुजवणे आवश्यक आहे. इतिहासाची खोटी माहिती काही कवी व लेखक समाजात पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी खरा इतिहास समाजाला सांगावा, असे आवाहन परब यांनी केले.मी अनेक गड-किल्ले फिरलो. त्यांचा अभ्यास केला. ते नवीन पिढीला समजावून सांगितले. त्यावर, एक नवे पुस्तक लिहीत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी परब यांच्या ‘शिक्के व कट्यारी’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.