शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

इतिहासाआडून समाजात तेढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:01 IST

कोकण इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

टिटवाळा : इतिहास नीट न समजून घेता त्याआधारे सध्या जातीधर्माच्या भेदाला तोंड फोडले जात आहे. त्यातून समाजात तेढ निर्माण होत आहे. इतिहास समजून घेतल्यास समाजात वाद होणार नाहीत, असे परखड मत कोकण इतिहास परिषदेच्या नवव्या राष्टÑीय अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. मंजिरी भालेराव यांनी व्यक्त केले.

महापुरुषांवरून सुरू असलेल्या सध्याच्या राजकारणावर त्यांनीही अप्रत्यक्ष टिप्पणी केली. कल्याण तालुक्यातील जीवनदीप संस्थेच्या गोवेली महाविद्यालयात शनिवारपासून दोनदिवसीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार रामनाथ मोते, डॉ. धनाजी गुरव, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड, कल्याण शाखाध्यक्ष जितेंद्र भामरे, जीवनदीप संस्थेचे संस्थापक रवींद्र घोडविंदे, उपजिल्हाधिकारी नितीन महाजन, अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक अप्पा परब यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. भालेराव म्हणाल्या की, जुन्यानव्याची सांगड घालून इतिहासातील सत्य शोधून काढणे, हे इतिहास संशोधकांपुढील सध्याचे मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी इतिहास अभ्यासकांसह संशोधकांनी पुढे यायला हवे. इतिहासाबाबत अधिक संशोधन व्हायला हवे. त्यातून खऱ्या इतिहासाची समाजासमोर मांडणी झाली पाहिजे. पूर्वजांनी व आधीच्या इतिहासकारांनी काय इतिहासलेखन केले आहे, हे प्रथम जाणून घेतले पाहिजे. ते समजून घेतल्यावर नवे लेखन होणे अपेक्षित आहे. तसे आपल्याकडे होत नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. इतिहासाची उपयुक्तता सर्वच क्षेत्रांत आहे. शिल्पकला, सिनेमा आणि अगदी कॉम्प्युटर सायन्समध्ये इतिहासाचा वापर होत आहे, असे सांगून या क्षेत्रात बºयाच संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाजन म्हणाले की, इतिहास हा विषय आपल्या जीवनाला कलाटणी देणारा आहे. पण, सद्य:स्थितीत इतिहास हा विषय भूतकाळात जमा होत असल्याचे दिसत आहे. तरुणांना हा विषय किचकट वाटत आहे. इतिहासाची कास धरली तर त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे इतिहास जोपासा, तो समजून घ्या व आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्याचा प्रयत्न करा. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पुस्तकखरेदीसाठीही त्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान छायाचित्रण, रांगोळी स्पर्धा व माहितीपट स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.इतिहास मनात रुजला पाहिजे : परबइतिहास समजून घेण्यासाठी तो मनात रुजवणे आवश्यक आहे. इतिहासाची खोटी माहिती काही कवी व लेखक समाजात पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी खरा इतिहास समाजाला सांगावा, असे आवाहन परब यांनी केले.मी अनेक गड-किल्ले फिरलो. त्यांचा अभ्यास केला. ते नवीन पिढीला समजावून सांगितले. त्यावर, एक नवे पुस्तक लिहीत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी परब यांच्या ‘शिक्के व कट्यारी’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.