शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नियोजित भाईंदर पश्चिम ते दहिसर पश्चिम लिंक रोडच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात; पश्चिम महामार्गावरील वाहतूक कोंडीतून होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 19:46 IST

पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व्हाया मीरा रोड पश्चिम रेल्वे स्थानक ते दहिसर पश्चिम लिंक रोडच्या कामाला एमएमआरडीएने मान्यता दिल्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रियेला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.

- राजू काळेभाईंदर - पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व्हाया मीरा रोड पश्चिम रेल्वे स्थानक ते दहिसर पश्चिम लिंक रोडच्या कामाला एमएमआरडीएने मान्यता दिल्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रियेला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. हा लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर पश्चिम महामार्गावरील दहिसर चेकनाका परिसरातील वाहतुकीतून सुटका होणार असल्याचे एमएमआरडीएच्या सूत्राकडून सांगण्यात आले.या लिंक रोडचे नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएचं काम पाहणार असून, एमएमआरडीएकडूनच रोडच्या बांधकामासाठी निधी दिला जाणार आहे. रोडचे काम मात्र मीरा-भाईंदर महापालिकेकडून केले जाणार आहे. हा रस्ता भाईंदर पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गाला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे जोडला जाणार आहे. तेथील राधास्वामी सत्संग व मिठागरापासून पुढे तो मीरा रोड रेल्वे स्थानकाकडे जाऊन दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा येथून निर्गमित होणार आहे. या रोडचे अंतर सुमारे ५ ते ६ किलोमीटर इतके असून, त्याची रुंदी सुमारे ४५ ते ६० मीटर इतकी असणार आहे. त्यासाठी सुमारे ३०० ते ३५० कोटींचा खर्च अंदाजित करण्यात आला आहे. रस्ता पूर्ण होण्यासाठी किमान २ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असला तरी तो भविष्यातील तांत्रिक अडचणींमुळे वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या रोडचे बांधकाम पूर्ण झाल्यास भाईंदर पूर्व व पश्चिमेकडील वाहतुकीला पर्याय उपलब्ध होऊन भाईंदर ते दहिसर दरम्यानचे मोठे अंतर कमी होणार आहे. यामुळे वेळ व इंधनाची मोठी बचत होणार असल्याने हा रोड भविष्यात महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र या नियोजित रोडच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात तिवरक्षेत्र असल्याने त्याच्या बांधकामात अडसर निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा अडसर पर्यावरण विभागाच्या परवानगीनेच दूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या रोडच्या लगतच भाईंदर पश्चिमेला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते वसई येथे खाडीमार्गे जाणारा आणखी एक लिंक रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रस्तावित लिंक रोडला नियोजित भाईंदर पश्चिम ते दहिसर पश्चिम लिंक रोड जोडला जाणार असल्याने वसई-विरार येथील वाहतुकीला देखील मुंबईकडे जाण्यासाठी हा रोड महत्वाचा पर्याय ठरू शकणार आहे. याखेरीज भाईंदर पश्चिम ते वसई किल्ल्यादरम्यान रो-रो सेवेच्या जेट्टीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने वसई-विरार ते मुंबईचे अंतर खूपच कमी होऊन मुंबई-अहमदाबाद महामार्गासह पश्चिम महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात सुसह्य होणार आहे.तसेच पश्चिम महामार्गावरील दहिसर चेकनाका परिसरातील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होऊन ती जलद होणार आहे. नियोजित भाईंदर ते दहिसर लिंक रोडवर टोलच्या धाडीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील टोलधाडीतून सुटका करुन घेण्यासाठी नियोजित लिंक रोडच्या वापरात सतत वाढ होणार आहे. हा रोड ६ ते ८ पदरी बांधण्यात येणार असल्याने यावरील वाहतूक कोंडी नगण्य ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. महत्वाकांक्षी ठरणाऱ्या या लिंक रोडला एमएमआरडीए प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रियेला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. या लिंक रोडचा वापर मीरा रोड येथील लोकांना करता यावा, यासाठी मीरा रोड पूर्व व पश्चिम बाजू जोडणाऱ्या उड्डाणपुलाची मागणी आ. नरेंद्र मेहता यांनी एमएमआरडीएकडे केली होती. मात्र तेथे लोकवस्ती नसल्याच्या कारणास्तव सध्या त्या पुलाला एमएमआरडीएने तत्कालीन बैठकीत लाल दिवा दाखविला आहे.