शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश

By अजित मांडके | Updated: April 20, 2024 15:42 IST

वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई  करण्यात आली.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छता अभियान शनिवारी महापालिकेच्या वर्तकनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले. या ठिकाणी असलेल्या तानसा पाईप लाईनच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवाव्यात तसेच कचरा न टाकण्याचे फलक लावावेत व परिसरात मार्शलची नेमणूक करावी , तसेच शहरात रस्त्यांच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तानसा पाईप लाईन परिसर, उपवन तलाव परिसरात कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत, तसेच सुरक्षारक्षक नेमावेत, तसेच ज्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्या कुंड्यांमधील कचरा दिवसातून दोन वेळा उचलला जाईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. तसेच शहरात ज्या ज्या रस्त्याच्या बाजूला पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी उपवन तलाव परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून येथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई  करण्यात आली.  उपवन तलाव येथील पालायदेवी मंदिर, ते उपवन तलाव परिसर, बनारस घट परिसर, माजिवडा नाका ते गांधीनगर पाण्याची टाकी (दुभाजक), येऊर फॉरेस्ट ते रिक्षास्टॅण्ड, वर्तकनगर नाका (तानसा), वसंतविहार शाळा ते महावीर मिलेनियम, सिद्धांचल क्लब हाऊस ते एचडीएफसी बँक  आदी परिसरातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. यावेळी या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवशांती प्रतिष्ठान संस्थेसह महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांनी शहर स्वच्छ ठेवणेबाबतची शपथ घेतली.तसेच उपवन येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणा-या झिरो डंपिंग ग्राउंड या वाहनाची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली.

आयुक्तांनी साधला नागरिकांशी संवादरस्त्यावर कचरा टाकणा-या नागरिकांना दंड लावावा जेणेकरून नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत तसेच उपवन तलाव येथे जे नागरिक तलावात निर्माल्य टाकतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली. तसेच उपवन तलाव येथे असलेला परिवहनचा थांबा रस्ता रूंदीकरणाच्या कामात काढण्यात आला होता मात्र तो अद्याप बसविण्यात न आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, थांबा नसल्यामुळे बसेस थांबत नाहीत, त्यामुळे हा थांबा बसविण्याची मागणी नागरिकांनी केली, याबाबत कार्यवाही केली जाईल असे आयुक्तांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका