शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

सावधान! जिल्ह्यातील ३२ गावांतील पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात ४३१ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. यामधील एक हजार ८१ गावांतील पाण्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात ४३१ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. यामधील एक हजार ८१ गावांतील पाण्याचे नमुने जूनमध्ये तपासले आहेत. यात तब्बल ३२ गावांतील व पाड्यांमधील पाणी दूषित आढळले असून, ते पिण्याच्या लायक नसल्याचे उघडकीस आले. या पाण्याचा वापर पिण्यासाठी केल्यास गावकऱ्यांना जलजन्य आजारास तोंड द्यावे लागणार असल्याचे वास्तव ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने निदर्शनास आणून दिले.

पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून दरवर्षी मे-जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. यानुसार एप्रिल व जून महिन्यात जिल्ह्यातील तीन हजार २३९ गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले आहेत. यापैकी एप्रिलला दोन हजार १५८ आणि जूनमध्ये एक हजार ८१ महिन्यात पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने घेऊन ते गांभीर्याने तपासले आहेत. यात एप्रिलमध्ये घेतलेल्या ५६ गावांच्या पाणी नमुन्यात २.५९ टक्के पाणी दूषित आढळले आहे, तर जून महिन्याचा गांभीर्याने विचार करता जिल्ह्यातील ३२ गावांमधील पिण्याचे पाणी २.९६ टक्के दूषित आढळले आहे. याकडे ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तेथील रहिवाशांना जलजन्य आजार होणार नाही, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यात भिवंडी तालुक्यातील १३ गावांमधील पिण्याचे पाणी दूषित आहे. या खालोखाल शहापूर तालुक्यातील आठ गावे आणि मुरबाडमधील सात गावांचे पाणी दूषित आढळले आहे. कल्याणच्या एका गावात आणि अंबरनाथ तालुक्यातील तीन गावांतील पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे हिवताप, घटसर्प, डायरिया, अतिसार, उलटी, जुलाब, काविळ, डेंग्यू आदी जीवघेणे पावसाळी साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी गावोगावी अतिसार नियंत्रण पंधरवडा उपक्रम हाती घेतला आहे.

....