शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! जिल्ह्यातील ३२ गावांतील पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात ४३१ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. यामधील एक हजार ८१ गावांतील पाण्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात ४३१ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. यामधील एक हजार ८१ गावांतील पाण्याचे नमुने जूनमध्ये तपासले आहेत. यात तब्बल ३२ गावांतील व पाड्यांमधील पाणी दूषित आढळले असून, ते पिण्याच्या लायक नसल्याचे उघडकीस आले. या पाण्याचा वापर पिण्यासाठी केल्यास गावकऱ्यांना जलजन्य आजारास तोंड द्यावे लागणार असल्याचे वास्तव ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने निदर्शनास आणून दिले.

पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून दरवर्षी मे-जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. यानुसार एप्रिल व जून महिन्यात जिल्ह्यातील तीन हजार २३९ गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले आहेत. यापैकी एप्रिलला दोन हजार १५८ आणि जूनमध्ये एक हजार ८१ महिन्यात पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने घेऊन ते गांभीर्याने तपासले आहेत. यात एप्रिलमध्ये घेतलेल्या ५६ गावांच्या पाणी नमुन्यात २.५९ टक्के पाणी दूषित आढळले आहे, तर जून महिन्याचा गांभीर्याने विचार करता जिल्ह्यातील ३२ गावांमधील पिण्याचे पाणी २.९६ टक्के दूषित आढळले आहे. याकडे ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तेथील रहिवाशांना जलजन्य आजार होणार नाही, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यात भिवंडी तालुक्यातील १३ गावांमधील पिण्याचे पाणी दूषित आहे. या खालोखाल शहापूर तालुक्यातील आठ गावे आणि मुरबाडमधील सात गावांचे पाणी दूषित आढळले आहे. कल्याणच्या एका गावात आणि अंबरनाथ तालुक्यातील तीन गावांतील पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे हिवताप, घटसर्प, डायरिया, अतिसार, उलटी, जुलाब, काविळ, डेंग्यू आदी जीवघेणे पावसाळी साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी गावोगावी अतिसार नियंत्रण पंधरवडा उपक्रम हाती घेतला आहे.

....