शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

सावधान! जिल्ह्यातील ३२ गावांतील पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात ४३१ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. यामधील एक हजार ८१ गावांतील पाण्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात ४३१ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. यामधील एक हजार ८१ गावांतील पाण्याचे नमुने जूनमध्ये तपासले आहेत. यात तब्बल ३२ गावांतील व पाड्यांमधील पाणी दूषित आढळले असून, ते पिण्याच्या लायक नसल्याचे उघडकीस आले. या पाण्याचा वापर पिण्यासाठी केल्यास गावकऱ्यांना जलजन्य आजारास तोंड द्यावे लागणार असल्याचे वास्तव ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने निदर्शनास आणून दिले.

पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून दरवर्षी मे-जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. यानुसार एप्रिल व जून महिन्यात जिल्ह्यातील तीन हजार २३९ गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले आहेत. यापैकी एप्रिलला दोन हजार १५८ आणि जूनमध्ये एक हजार ८१ महिन्यात पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने घेऊन ते गांभीर्याने तपासले आहेत. यात एप्रिलमध्ये घेतलेल्या ५६ गावांच्या पाणी नमुन्यात २.५९ टक्के पाणी दूषित आढळले आहे, तर जून महिन्याचा गांभीर्याने विचार करता जिल्ह्यातील ३२ गावांमधील पिण्याचे पाणी २.९६ टक्के दूषित आढळले आहे. याकडे ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तेथील रहिवाशांना जलजन्य आजार होणार नाही, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यात भिवंडी तालुक्यातील १३ गावांमधील पिण्याचे पाणी दूषित आहे. या खालोखाल शहापूर तालुक्यातील आठ गावे आणि मुरबाडमधील सात गावांचे पाणी दूषित आढळले आहे. कल्याणच्या एका गावात आणि अंबरनाथ तालुक्यातील तीन गावांतील पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे हिवताप, घटसर्प, डायरिया, अतिसार, उलटी, जुलाब, काविळ, डेंग्यू आदी जीवघेणे पावसाळी साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी गावोगावी अतिसार नियंत्रण पंधरवडा उपक्रम हाती घेतला आहे.

....