शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

केडीएमसीतील अंतर्गत बदल्यांचा प्रस्ताव बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 11:58 PM

तपशील देण्यात टाळाटाळ? : राज्य सरकारच्या वेबपोर्टलवर केली तक्रार

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अनेक अधिकारी एकाच विभागात वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. संबंधित विभागातील अर्थकारणामुळे त्यांच्या बदल्यांना फाटा दिला जातो. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांनीही अंतर्गत बदल्या करण्याचे दिलेले आश्वासन कागदावरच राहिले आहे.

महापालिका मुख्यालयात एकाच कार्यलयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ अधिकारी कार्यरत आहेत. याप्रकरणी कोणता अधिकारी किती काळ कोणत्या कार्यालयात कार्यरत आहे, याची माहिती राजेश पाटील यांनी माहिती अधिकारात महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, त्यांना ही माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. त्यामुळे पाटील यांनी राज्य सरकारच्या वेबपोर्टलवर याविरोधात तक्रार केली आहे.

अधिकारी बदली हा विषय प्रशासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. बदलीसंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यावर आयुक्तांकडून कार्यवाही अपेक्षित आहे. महापालिकेत नागरिकांचा जाहीरनामा लावण्यात आला आहे. एखादा अर्ज दिल्यावर तो किती दिवसात निकाली निघाला पाहिजे. त्या अर्जावर कार्यवाही होत नसल्यास ६० दिवसांनंतर संबंधित तक्रारदार अपिलात जाऊ शकतो किंवा त्याला डीम्ड परवानगी मिळाली, असे समजून त्याने ज्यासाठी परवानगी मागितली आहे. ते काम तो परवानगी मिळाली, असे समजून सुरू करू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. पदे रिक्त झाली तसेच अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी सरकारकडून भरती केली जात नाही. तसेच ज्यांना बढती दिली आहे, त्यांनाही चांगले विभाग दिले जात नाहीत. विभागनिहाय बदल्या होणे गरजेचे आहे, त्याकडे सामान्य प्रशासनासह आयुक्तांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.सात अधिकारी १० वर्षांपासून एकाच ठिकाणीमहापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादी मोठी आहे. अतिरिक्त आयुक्तांपासून लिपिकांपर्यंत लाच घेण्याची प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून पकडण्यात आलेली आहेत.आस्थापना, लेखा विभाग, करवसुली, नगररचना, पाणीपुरवठा विभागात सात अधिकारी १० वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. बेकायदा बांधकाम नियंत्रण विभाग, तर भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका