शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

आधारवाडी डम्पिंग वर्षभरात बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 00:53 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात २२ वा व देशात ७७ वा क्रमांक आला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात २२ वा व देशात ७७ वा क्रमांक आला आहे. महापालिकेस मिळालेले हे सांघिक यश असून, पहिल्या १० शहरांत क्रमांक मिळवण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड हे वर्षभरात बंद करण्याचा मानस महापौर विनीता राणे यांनी व्यक्त केला आहे.स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भात माहिती देण्यासाठी राणे यांनी गुरुवारी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, सभागृह नेते श्रेयस समेळ आदी मान्यवर उपस्थित होते.राणे म्हणाल्या, आधारवाडी डम्पिंग बंद करण्यासाठी कंत्राटदाराला कार्यादेश दिला आहे. या डम्पिंगला पर्याय म्हणून बारावे भरावभूमी विकसित केली जात आहे. ही भरावभूमी सुरू झाल्यानंतर आधारवाडी डम्पिंग बंद करून तेथील कचऱ्याच्या डोंगरावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे शक्य होईल. आधारवाडी डम्पिंग वर्षभरात बंद करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. तसेच उंबर्डे व बारावे प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचाही महापालिकेचा मानस आहे. या दोन्ही प्रकल्पांचे कामसुरू झाले आहे. मात्र, त्याला नागरिकांचा विरोध आहे. ही जरी वस्तुस्थिती असली, तरी गोदरेज कंपनीने दिलेल्या १० कोटींच्या सीएसआर फंडातून प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यामुळे महापालिकेचे गुणांकन वाढले आहे.त्या पुढे म्हणाल्या, आधारवाडी डम्पिंगवर कचरा टाकण्यासाठी जाणाºया वाहनांसाठी रस्ता नव्हता. त्याकरिता ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे, स्थायी सभापती म्हात्रे, गटनेते दशरथ घाडीगावकर, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तेथे प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता तयार करण्याचे काम केले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही पहाटेच डोंबिवली शहरातील स्वच्छतेची पाहणी करून माहिती घेतली आहे. शहर स्वच्छतेवर भर द्यावा, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश आहेत, याकडे महापौरांनी लक्ष वेधले.कचरा वर्गीकरणासाठी प्रत्येक प्रभाग क्षेत्रात एक शेड उभारली जाणार आहे. कचरा समस्या सोडवण्यासाठी चार प्रभाग क्षेत्रांत कचºयाचे खाजगीकरण केले आहे. त्यामुळे कचरा उचलणाºया गाड्यांची संख्या वाढेल. कंत्राटदार घरोघरी जाऊन कचरा गोळा करेल. तसेच कचरा वर्गीकरणाची जबाबदारीही त्याची आहे. काही ठिकाणी उघडी गटारे बंदिस्त केली. तसेच काही ठिकाणी बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. प्रत्येक प्रभागात प्रत्येकी १० स्वच्छता मार्शल नेमण्यात येणार आहेत. अनेक नगरसेवकांनी त्यांच्या नगरसेवक निधीतून कचराडबे पुरवले आहेत. याशिवाय, पुनर्प्रक्रिया करण्याजोगा कचरा उचलण्यासाठी काही खाजगी कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. सुका कचरा उचलण्याचे काम त्यांना देण्याचा विचार महापालिका करणार आहे, असे राणे म्हणाल्या.महापालिका हद्दीत सोमवार ते शुक्रवार कचरा गोळा होण्याचे प्रमाण कमी असते. मात्र, शनिवार व रविवारी नोकरदार घरी असल्याने जास्त कचरा जास्त गोळा होतो, असे म्हात्रे म्हणाले. डोंबिवलीतील टिळकनगर येथील सोसायटी त्यांच्या कचºयावर सोसायटीच्या आवारात प्रक्रिया करते. या सोसायटीचा आदर्श अन्य सोसायट्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.>नागरिकांचीही जबाबदारीनागरिकांनी कचराकुंडीत टाकावा. तो रस्त्यावर, गटारात टाकू नये. कचराकुंडीतही चादरी, गाड्या, फर्निचर, असा कचरा टाकला जातो. ही काही चांगली बाब नाही. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेबरोबर नागरिकांचीही आहे. नागरिकांनी कचरामुक्त शहराच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्यास कल्याण-डोंबिवली स्वच्छ शहराच्या टॉप टेन यादीत येईल, असा विश्वास महापौर राणे यांनी व्यक्त केला.