शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

बंदीवरून दोन यंत्रणांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:57 IST

केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मध्यंतरी प्लास्टिक संकलनाची संयुक्त कार्यवाही सुरू करण्यात आली होती.

- प्रशांत माने कल्याण : केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मध्यंतरी प्लास्टिक संकलनाची संयुक्त कार्यवाही सुरू करण्यात आली होती. सद्य:स्थितीला ही मोहीम पूर्णपणे बंद पडली आहे. केडीएमसीकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला असून या मंडळाने नाकर्तेपणाबाबत महापालिकेला नोटीस बजावली आहे. या मुद्यावर दोन्ही यंत्रणांमध्ये जुंपली असून महापालिकेकडून कार्यवाही होत नसल्याने केडीएमसीच्या हद्दीत प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याचा आरोप मंडळाने केला आहे.२३ जूनपासून राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीने स्थानिक पातळीवर प्रारंभी नऊ ठिकाणी प्लास्टिक केंद्रे उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले; परंतु प्रत्यक्षात चारच ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आली. यात कल्याणमधील आधारवाडी आणि सुभाष मैदान, पूर्वेकडील ड प्रभाग कार्यालय आणि डोंबिवलीतील सूतिकागृहाचा परिसर यांचा समावेश होता. सद्य:स्थितीला केवळ आधारवाडी येथीलच संकलन केंद्र सुरू आहे. महापालिकेने काही प्रभागांमध्ये कचरा गोळा करण्याचे कंत्राट दिले असून त्यांच्या माध्यमातूनच ओला आणि सुका कचऱ्यासह प्लास्टिक संकलन केले जाणार आहे. एकीकडे ठोस कृतीअभावी प्लास्टिकबंदीचा बोºया वाजल्याचे चित्र सर्वत्र दिसत असताना केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलन करण्याच्या विशेष मोहिमेलादेखील एक प्रकारे खोडा बसला आहे. केडीएमसीकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. संबंधित विभागाची कारवाई औद्योगिक क्षेत्रात सुरू असताना महापालिका क्षेत्रातील प्रभागस्तरावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून कोणतीही मदत मिळत नसल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी दिली. दोन महिन्यांपूर्वीच प्लास्टिकबंदी मोहिमेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी महापालिकेला शहराच्या विविध भागांमध्ये फलक लावण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. त्याबाबतही कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नसल्याकडे दुर्गुळे यांनी लक्ष वेधले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त, सहायक आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य निरीक्षक यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचेही दुर्गुळे यांचे म्हणणे आहे. आमच्या विभागाकडून कारवाई सुरू आहे, पण केडीएमसीच्या नाकर्तेपणामुळे कल्याण-डोंबिवली शहरांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याचा आरोप दुर्गुळे यांनी केला. याप्रकरणी केडीएमसीला दोनच दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.>नोटीसबाबत माहिती नाहीप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसबाबत मला काहीही माहीत नाही. केडीएमसीची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर यापूर्वी आम्ही संयुक्त कार्यवाही केलेली आहे. यापुढेही आमची सहकार्याचीच भूमिका राहील, असे केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.