शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बंदीवरून दोन यंत्रणांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:57 IST

केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मध्यंतरी प्लास्टिक संकलनाची संयुक्त कार्यवाही सुरू करण्यात आली होती.

- प्रशांत माने कल्याण : केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मध्यंतरी प्लास्टिक संकलनाची संयुक्त कार्यवाही सुरू करण्यात आली होती. सद्य:स्थितीला ही मोहीम पूर्णपणे बंद पडली आहे. केडीएमसीकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला असून या मंडळाने नाकर्तेपणाबाबत महापालिकेला नोटीस बजावली आहे. या मुद्यावर दोन्ही यंत्रणांमध्ये जुंपली असून महापालिकेकडून कार्यवाही होत नसल्याने केडीएमसीच्या हद्दीत प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याचा आरोप मंडळाने केला आहे.२३ जूनपासून राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीने स्थानिक पातळीवर प्रारंभी नऊ ठिकाणी प्लास्टिक केंद्रे उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले; परंतु प्रत्यक्षात चारच ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आली. यात कल्याणमधील आधारवाडी आणि सुभाष मैदान, पूर्वेकडील ड प्रभाग कार्यालय आणि डोंबिवलीतील सूतिकागृहाचा परिसर यांचा समावेश होता. सद्य:स्थितीला केवळ आधारवाडी येथीलच संकलन केंद्र सुरू आहे. महापालिकेने काही प्रभागांमध्ये कचरा गोळा करण्याचे कंत्राट दिले असून त्यांच्या माध्यमातूनच ओला आणि सुका कचऱ्यासह प्लास्टिक संकलन केले जाणार आहे. एकीकडे ठोस कृतीअभावी प्लास्टिकबंदीचा बोºया वाजल्याचे चित्र सर्वत्र दिसत असताना केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलन करण्याच्या विशेष मोहिमेलादेखील एक प्रकारे खोडा बसला आहे. केडीएमसीकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. संबंधित विभागाची कारवाई औद्योगिक क्षेत्रात सुरू असताना महापालिका क्षेत्रातील प्रभागस्तरावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून कोणतीही मदत मिळत नसल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी दिली. दोन महिन्यांपूर्वीच प्लास्टिकबंदी मोहिमेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी महापालिकेला शहराच्या विविध भागांमध्ये फलक लावण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. त्याबाबतही कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नसल्याकडे दुर्गुळे यांनी लक्ष वेधले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त, सहायक आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य निरीक्षक यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचेही दुर्गुळे यांचे म्हणणे आहे. आमच्या विभागाकडून कारवाई सुरू आहे, पण केडीएमसीच्या नाकर्तेपणामुळे कल्याण-डोंबिवली शहरांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याचा आरोप दुर्गुळे यांनी केला. याप्रकरणी केडीएमसीला दोनच दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.>नोटीसबाबत माहिती नाहीप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसबाबत मला काहीही माहीत नाही. केडीएमसीची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर यापूर्वी आम्ही संयुक्त कार्यवाही केलेली आहे. यापुढेही आमची सहकार्याचीच भूमिका राहील, असे केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.