शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी पिकनिकवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:05 IST

गेल्या वर्षीही जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावर ओरड झाल्यावर मागे घेण्यात आला होता.

वासिंद / बदलापूर : पावसाळा सुरू झाला की, जिल्ह्यातील पर्यटन म्हणा किंवा धबधब्याच्या ठिकाणी चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जातात. मात्र, अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघात होऊन प्रसंगी मृत्यू होतात. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. त्यामुळे पर्यटक नाराज झाले आहेत. जेथे धबधबे आहेत, तेथे पोलीस बंदोबस्त, जीवरक्षक ठेवावे म्हणजे अपघात होणार नाही किंवा झाल्यास तत्काळ मदत मिळेल, असे मत पर्यटकांनी व्यक्त केले. मूठभर अतिउत्साही पर्यटकांमुळे निखळ आनंद घेण्यासाठी जाणाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फिरले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षीही जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावर ओरड झाल्यावर मागे घेण्यात आला होता. परदेशात अनेक ठिकाणी पर्यटनस्थळी सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या गेल्या आहेत. मग, आपल्याकडे तशा का राबवल्या जात नाही, असा सवाल पर्यटकांनी विचारला आहे. उपाययोजना, तेथील देखभालीसाठी शुल्क आकारा, आम्ही देऊ, असेही पर्यटकांचे म्हणणे आहे.कोंडेश्वर व कुंडी धबधब्यांत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील इतर धबधब्यांत अशा अनेक दुर्दैवी घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक, तरुण मुले व इतर नागरिकांना धबधब्यांची ओढ लागते. शहरी, ग्रामीण भागातील काही अतिउत्साही पर्यटक व काही मद्यपी तरु ण हे पोहण्यासाठी पाण्यात उतरतात. पाण्याचा अंदाज येत नसल्याने तसेच काही नागरिक पाय घसरून, तोल जाऊन आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक उपाययोजना करून अथवा धोक्याची सूचना देऊनही असे दुर्दैवी प्रकार होतात.

जिल्ह्यातील येऊर, कळवा-मुंब्रा, घोडबंदर, रेतीबंदर, धबधबे, उत्तन सागरी किनारा, कल्याण तालुक्यातील कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, चौपाटी, गणेशघाट, मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट, पाडाळे, सिद्धगड, सोनावळे लेण्या, डोंगरन्हावे, गोरखगड, नाणेघाट, धसई डॅम, आंबेटेंबे, नाणेघाट आदी पर्यटनस्थळावरील धबधबे. शहापूरमधील भातसा धरणस्थळ, अशोका धबधबा, कुंडन, दहागाव, कळंबे, सापगाव चेरवली, खराडे नदीकिनारा, माहुली किल्ला पायथा, आजा पर्वत, अंबरनाथमधील कोंडेश्वर, धामणवाडी, सारवाडी, दहिवली, मळीचीवाडी आदी धबधब्यांच्या ठिकाणी खबरदारी म्हणून जिल्हाधिकाºयांनी बंदी घातली आहे.

माळशेजघाटात दरडी कोसळण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रशासनाने धबधब्यांच्या दोन किमी परिघांत पर्यटकांना जाण्यास मनाई केली आहे. यामुळे धबधब्याखाली चिंब भिजण्यास पर्यटकांना मुकावे लागणार आहे. बंदीपेक्षा प्रशासनाने पोलिसांकरवी कडेकोट बंदोबस्त लावून वाहनांची कडक तपासणीसह मद्यपींचा बंदोबस्त केला अनुचित प्रकार घडणार नाहीत. मात्र, सरसकट पर्यटकांना बंदी म्हणजे त्यांच्या आनंदावर विजरण टाकणारी आहेच शिवाय स्थानिकांच्या तात्पुरत्या रोजगणारावर गदा आणणारी आहे.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी काही कालावधीसाठी जिल्हाधिकारी यांचा बंदीआदेश योग्य आहे. तसेच पर्यटकांनीही निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना मनमोकळा आनंद घेतला पाहिजे. परंतु, त्या ठिकाणच्या धोक्यांचा काळजीपूर्वक विचार करून पाऊल टाकले पाहिजे.- सुजाण वडके, सदस्य, माहुली निसर्गसेवा न्यासनिसर्गाला हानी पोहोचेल अथवा स्वत:बरोबर इतरांना त्रास होईल, असे न करता धबधबे व पावसाचा आनंद घेत सुरक्षितता पाहणे गरजेचे आहे.- सचिन पाटील, पर्यटक

कोंडेश्वर येथे जाण्यास पर्यटकांना मनाईबदलापूर : बदलापूर शहराला लागून असलेल्या कोंडेश्वरसह तालुक्यातील लहानमोठ्या धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे. काही बेजबाबदार पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे धबधब्यांवर बुÞडून मृत्यू होण्याचे प्रकार घडत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. धबधब्यांच्या ठिकाणी सुरक्षा देण्याऐवजी त्यावर बंदी घातल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे.