शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात जनावरांची ने-आण करण्यास बंदी

By सुरेश लोखंडे | Updated: September 13, 2022 22:14 IST

जिल्ह्यातील लम्पी चर्म रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

ठाणे : जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने ठाणे जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. याक्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील गो-जातीय गुरे व म्हशी आणि अन्य कोणतीही जनावरे कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय प्राण्यांचे बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा व प्रदर्शन आयोजित करणे आदी कोणताही कार्यक्रम करण्यास आता जिल्ह्यात मनाई आहे.

जिल्ह्यातील लम्पी चर्म रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यात शहापूर, भिवंडी व अंबरनाथ तालुक्यात या रोगाची साथ पसरली असून बाधीत क्षेत्राच्या पाच किमी परिघातील पाच हजार १७ पशुधनास आजपर्यंत लसीकरण करण्यात आलेले आहे. उर्वरीत बाधीत पशुधनावर उपचार सुरू आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याप्रमाणेच ठाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ठाणे जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

नियंत्रित क्षेत्रातील व त्या क्षेत्राबाहेरील गो-जातीय गुरे व म्हशी अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. गो-जातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतेही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, संपर्कात आलेली वैरण व अन्य साहित्य आणि प्राण्यांचे उत्पादन नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्राण्यांचे बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा व प्रदर्शन आयोजित करणे किंवा अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम पार पाडण्यास मनाई करण्यात आले आहे, असे पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे.

टॅग्स :thaneठाणेLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग