शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

खासदार होताच बाळ्या मामा ॲक्शन मोडमध्ये; काल्हेर येथील शासकीय जमिनींवर केलेल्या अनधिकृत बांधकामांची केली पाहणी

By नितीन पंडित | Updated: June 5, 2024 20:04 IST

जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. त्यामुळे येथील शेतकरी व जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर आली आहे.

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी ॲक्शन मोडवर आले आहेत. बाळ्या मामा यांनी बुधवारी काल्हेर येथील शासकीय जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांची बाळ्या मामा यांनी पाहणी केली.

जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. त्यामुळे येथील शेतकरी व जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर आली आहे. काल्हेर येथे सुमारे २६ एकर शासकीय जागेवर शासकीय तसेच वन विभाग व स्थानिक नागरिकांच्या जागेवर नागरिकांना दमदाटी करून व अतिक्रमण करून येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर पाटील ,भरत पाटील,नितीन पाटील या बांधकाम व्यावसायिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे.या अनधिकृत बांधकामासाठी माजी खासदार कपिल पाटील व त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिक येथील शेतकरी व नागरिकांना धमकावत जमिनींवर अतिक्रमण केले असून येथील स्थानिक गुंडांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिक जनतेची फसवणूक करत आहेत असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी यावेळी केला आहे.या प्रकरणी आपण स्वतः एमएमआरडीए,तहसीलदार व प्रांत तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून या प्रकाराची सर्व कागदपत्र आपण शासकीय यंत्रणेला सोपविणार आहोत असेही बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले.

येथील बांधकाम व्यावसायिक जमिनीचे खोटे कागदपत्र दाखवून इन्व्हेस्टर लोकांना व सामान्य घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना फसवत असून दादागिरी व दहशत वाढवली आऊन आज शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर मी इथे येऊन पाहणी केली असून मी शेतकऱ्यांना शब्द डिंक होता की मी निवडून आलो की दुसऱ्याच दिवशी या जागेची पाहणी करणार व तिसऱ्या दिवशी तक्रार करून जनतेला न्याय देणार असल्याचे सांगितले असल्याने आज व्यस्त कार्यक्रम आटोपते घेऊन आज मी या ठिकाणी अनधिकृत बांधकामांची पाहणी केली असल्याचेही खासदार सुरेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले असून केवळ केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने शासकीय यंत्रणा या अनधिकृत बांधकामांवर दुर्लक्ष करत आले आहेत मात्र आता असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देखील बाळ्या मामा यांनी दिला आहे.