शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

बळीराजा पिकवणार आता कडधान्य, भाजीही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:34 IST

आलेल्या संकटाला रडून नाही तर लढून परतवण्यावर भर देण्याचा संकल्प बळीराजाबरोबरच कृषी विभागाने केला आहे.

बदलापूर : अतिवृष्टीचे संकट वरचेवर येत आहे. त्यातून बाहेर येत नाही तर यंदा कोरोनाचे संकट उभे राहिले. सर्वच व्यवहार ठप्प होताना बळीराजा मात्र संकटाचे संधीत रूपांतर करण्याच्या मन:स्थितीत आहे. यासाठी राज्याचा कृषी विभागही सक्रीय झाला आहे. त्यामुळे यंदा बळीराजा भाताबरोबरच कडधान्य आणि भाजीचे पीक घेण्यासाठी तयारीला लागला आहे. आलेल्या संकटाला रडून नाही तर लढून परतवण्यावर भर देण्याचा संकल्प बळीराजाबरोबरच कृषी विभागाने केला आहे.गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या वर्षात ही तूट भरून काढण्यासाठी कोरोनाच्या संकटातही कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे.अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील बहुतेक शेतकरी हे कृतीशील व नवनवीन प्रयोग करणारे आहेत. त्यांना राज्याच्या कृषी विभागाचेही पाठबळ मिळत आहे. आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अधिकाऱ्यांची याबाबत बैठक झाली. यात या विषयवार चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. भातशेतीच्या बांधावर तुरीचे पीक घेण्यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे.शेताच्या बांधावर गवत मोठया प्रमाणात उगवते. या गवतामुळे फायदा होत नाही तर उलट नुकसानच होते. या गवताच्या जागी जर तुरीबरोबरच लाल डांगराचा लागवडीचा प्रयत्न केला तर भाताबरोबर कडधान्य आणि भाजी असे पीक घेता येईल. यंदा पहिल्यांदाच कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात हा प्रयोग करण्याचा विचार कृषी विभागाने केला आहे.शेताच्या बाजूला अनेक ठिकाणी ओसाड पडीक जमीन उपलब्ध आहे. अशा ओसाड जमिनीवर बांबू लागवडीसाठीही चाचपणी सुरू असून त्यासाठी काही भागांची नावे पुढे आली आहेत.>बांबू लागवडीसाठी पोषक जमीनअंबरनाथ तालुक्यात कारंद, येवे, बोराडपाडा अशा भागांत बांबू लागवडीसाठी पोषक जमीन असल्याची माहिती अंबरनाथ पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर.एच. पाटील यांनी दिली. कृषी विभागाच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे अंबरनाथ, कल्याण व मुरबाड तालुक्यांत भाताबरोबरच तूरडाळ, लाल डांगर, बांबू अशा पिकांमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देण्याचा प्रयत्न सुरू आहे.