शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

बदलापूर पालिका : २९० विषयांना दिली स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:36 IST

कुळगाव-बदलापूर पालिकेकडे आर्थिक तरतूद नसतानाही २९५ विषयांची तब्बल ३६ कोटींची कामे घेण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदा विषय घेण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

बदलापूर : कुळगाव-बदलापूर पालिकेकडे आर्थिक तरतूद नसतानाही २९५ विषयांची तब्बल ३६ कोटींची कामे घेण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदा विषय घेण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही घेतली. जिल्ह्यातील नेत्यांनी यासंदर्भात नंतर निर्णय घेऊ, असे निर्देश दिल्यावर बुधवारच्या सर्वसाधारण सभेमध्ये हे सर्व आर्थिक विषय स्थगित करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनीच घेतला. त्यांच्या या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही आक्षेप नोंदवला नाही.कुळगाव-बदलापूर पालिकेच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात जी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, त्या तरतुदीपेक्षा चार कोटी रुपये अतिरिक्त खर्च करण्यात आले आहे. आधीच अर्थसंकल्पातील सर्व तरतुदींपेक्षा जास्त खर्च झालेला असतानाही अर्थसंकल्पाला बाजूला सारून कोट्यवधींची कामे करण्याचा घाट घातला जात आहे. पालिकेने अर्थसंकल्पात ज्याज्या विकासकामांसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे, त्यातील ज्या कामांवर खर्च झालेला नाही, तो खर्च सुधारित अर्थसंकल्पात वर्ग करणे शक्य आहे.मात्र, पालिकेने वर्षभरात प्रचंड प्रमाणात कामे केल्याने यंदाच्या अर्थसंकल्पातून या कामांची बिले देणेही शक्य होणार नाही. अशी स्थिती असताना अर्थसंकल्पाला अधीन राहून नव्याने विकासकामांचा समावेश करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाकडून माहिती न घेताच विषयपत्रिका तयार झाल्याने प्रशासन यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.विषयपत्रिका तयार झाल्यावर आता प्रशासनानेही आपली माहिती तयार केली आहे. यात संबंधित विषयांसाठी पालिकेकडे आर्थिक तरतूद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याआधीच्या विषयांचीच बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे नवीन विषय घेणे शक्य नसल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काय निर्णय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर, पालिकेच्या विषयपत्रिकेत आलेल्या विकासकामांना निधी नसल्याने त्यासंदर्भात जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी हस्तक्षेप करून स्थानिक नगरसेवकांना सबुरीने घेण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार, सर्वसाधारण सभेत २९५ विषयांपैकी स्वच्छता अभियानाशी निगडित चार विषयवगळता इतर सर्व विषय तहकूब करण्यात आले.नगरसेवक, प्रशासनामध्ये समन्वयाचा अभावकुळगाव-बदलापूर पालिकेत नगरसेवक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव या सर्वसाधारण सभेत स्पष्ट दिसत होता. प्रशासनाने निधी नसल्याची दिलेली माहिती हीच या सर्वसाधारण सभेच्या मुळावर घाव घालणारी ठरली आहे. त्यामुळे आता भविष्यात तहकूब विषयांची सभा पुन्हा घेतल्यावर त्यावर काय निर्णय होणार आणि जिल्ह्यातील नेते काय निर्णय देणार, हे दिवाळीनंतर स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर