शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

बदलापूर पालिका : २९० विषयांना दिली स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:36 IST

कुळगाव-बदलापूर पालिकेकडे आर्थिक तरतूद नसतानाही २९५ विषयांची तब्बल ३६ कोटींची कामे घेण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदा विषय घेण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

बदलापूर : कुळगाव-बदलापूर पालिकेकडे आर्थिक तरतूद नसतानाही २९५ विषयांची तब्बल ३६ कोटींची कामे घेण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदा विषय घेण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही घेतली. जिल्ह्यातील नेत्यांनी यासंदर्भात नंतर निर्णय घेऊ, असे निर्देश दिल्यावर बुधवारच्या सर्वसाधारण सभेमध्ये हे सर्व आर्थिक विषय स्थगित करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनीच घेतला. त्यांच्या या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही आक्षेप नोंदवला नाही.कुळगाव-बदलापूर पालिकेच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात जी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, त्या तरतुदीपेक्षा चार कोटी रुपये अतिरिक्त खर्च करण्यात आले आहे. आधीच अर्थसंकल्पातील सर्व तरतुदींपेक्षा जास्त खर्च झालेला असतानाही अर्थसंकल्पाला बाजूला सारून कोट्यवधींची कामे करण्याचा घाट घातला जात आहे. पालिकेने अर्थसंकल्पात ज्याज्या विकासकामांसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे, त्यातील ज्या कामांवर खर्च झालेला नाही, तो खर्च सुधारित अर्थसंकल्पात वर्ग करणे शक्य आहे.मात्र, पालिकेने वर्षभरात प्रचंड प्रमाणात कामे केल्याने यंदाच्या अर्थसंकल्पातून या कामांची बिले देणेही शक्य होणार नाही. अशी स्थिती असताना अर्थसंकल्पाला अधीन राहून नव्याने विकासकामांचा समावेश करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाकडून माहिती न घेताच विषयपत्रिका तयार झाल्याने प्रशासन यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.विषयपत्रिका तयार झाल्यावर आता प्रशासनानेही आपली माहिती तयार केली आहे. यात संबंधित विषयांसाठी पालिकेकडे आर्थिक तरतूद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याआधीच्या विषयांचीच बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे नवीन विषय घेणे शक्य नसल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काय निर्णय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर, पालिकेच्या विषयपत्रिकेत आलेल्या विकासकामांना निधी नसल्याने त्यासंदर्भात जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी हस्तक्षेप करून स्थानिक नगरसेवकांना सबुरीने घेण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार, सर्वसाधारण सभेत २९५ विषयांपैकी स्वच्छता अभियानाशी निगडित चार विषयवगळता इतर सर्व विषय तहकूब करण्यात आले.नगरसेवक, प्रशासनामध्ये समन्वयाचा अभावकुळगाव-बदलापूर पालिकेत नगरसेवक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव या सर्वसाधारण सभेत स्पष्ट दिसत होता. प्रशासनाने निधी नसल्याची दिलेली माहिती हीच या सर्वसाधारण सभेच्या मुळावर घाव घालणारी ठरली आहे. त्यामुळे आता भविष्यात तहकूब विषयांची सभा पुन्हा घेतल्यावर त्यावर काय निर्णय होणार आणि जिल्ह्यातील नेते काय निर्णय देणार, हे दिवाळीनंतर स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर