शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

बदलापूर पालिका : २९० विषयांना दिली स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:36 IST

कुळगाव-बदलापूर पालिकेकडे आर्थिक तरतूद नसतानाही २९५ विषयांची तब्बल ३६ कोटींची कामे घेण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदा विषय घेण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

बदलापूर : कुळगाव-बदलापूर पालिकेकडे आर्थिक तरतूद नसतानाही २९५ विषयांची तब्बल ३६ कोटींची कामे घेण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदा विषय घेण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही घेतली. जिल्ह्यातील नेत्यांनी यासंदर्भात नंतर निर्णय घेऊ, असे निर्देश दिल्यावर बुधवारच्या सर्वसाधारण सभेमध्ये हे सर्व आर्थिक विषय स्थगित करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनीच घेतला. त्यांच्या या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही आक्षेप नोंदवला नाही.कुळगाव-बदलापूर पालिकेच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात जी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, त्या तरतुदीपेक्षा चार कोटी रुपये अतिरिक्त खर्च करण्यात आले आहे. आधीच अर्थसंकल्पातील सर्व तरतुदींपेक्षा जास्त खर्च झालेला असतानाही अर्थसंकल्पाला बाजूला सारून कोट्यवधींची कामे करण्याचा घाट घातला जात आहे. पालिकेने अर्थसंकल्पात ज्याज्या विकासकामांसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे, त्यातील ज्या कामांवर खर्च झालेला नाही, तो खर्च सुधारित अर्थसंकल्पात वर्ग करणे शक्य आहे.मात्र, पालिकेने वर्षभरात प्रचंड प्रमाणात कामे केल्याने यंदाच्या अर्थसंकल्पातून या कामांची बिले देणेही शक्य होणार नाही. अशी स्थिती असताना अर्थसंकल्पाला अधीन राहून नव्याने विकासकामांचा समावेश करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाकडून माहिती न घेताच विषयपत्रिका तयार झाल्याने प्रशासन यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.विषयपत्रिका तयार झाल्यावर आता प्रशासनानेही आपली माहिती तयार केली आहे. यात संबंधित विषयांसाठी पालिकेकडे आर्थिक तरतूद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याआधीच्या विषयांचीच बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे नवीन विषय घेणे शक्य नसल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काय निर्णय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर, पालिकेच्या विषयपत्रिकेत आलेल्या विकासकामांना निधी नसल्याने त्यासंदर्भात जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी हस्तक्षेप करून स्थानिक नगरसेवकांना सबुरीने घेण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार, सर्वसाधारण सभेत २९५ विषयांपैकी स्वच्छता अभियानाशी निगडित चार विषयवगळता इतर सर्व विषय तहकूब करण्यात आले.नगरसेवक, प्रशासनामध्ये समन्वयाचा अभावकुळगाव-बदलापूर पालिकेत नगरसेवक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव या सर्वसाधारण सभेत स्पष्ट दिसत होता. प्रशासनाने निधी नसल्याची दिलेली माहिती हीच या सर्वसाधारण सभेच्या मुळावर घाव घालणारी ठरली आहे. त्यामुळे आता भविष्यात तहकूब विषयांची सभा पुन्हा घेतल्यावर त्यावर काय निर्णय होणार आणि जिल्ह्यातील नेते काय निर्णय देणार, हे दिवाळीनंतर स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर