शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

बदलापूरचे दिवसाचे पाणी ठाण्यात वाया; रोज ४० एमएलडी पाणीगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 03:09 IST

ठाणे शहरात दररोज बदलापूरवासियांची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

- अजित मांडकेठाणे : ठाणे शहरात दररोज बदलापूरवासियांची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.उन्हाळा सुरू झाला की, जिल्ह्यासह ठाणे शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागतो. परंतु, लोकसंख्येचा विचार करून ठाणे शहराला जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत जास्त पाणीपुरवठा होतो. असे असतानाही शहरातील अनेक भागांना आजही पाण्यासाठी झगडावे लागते. मुबलक पाणी असताना केवळ नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेकडून प्रतिदिन ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही नासाडी बदलापूरला रोज लागणाºया ४० एमएलडीपेक्षाही नऊ एमएलडीने जास्त आहे.शहराची आजची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात असून तिला ४३६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना त्यापेक्षा जास्त म्हणजे ४८५ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. असे असतानाही सोमवारी ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या कार्यालयावर पाणीटंचाईची तक्रार करीत महिलांचा मोर्चा आला होता. केवळ याच भागात नाही तर शहरातील इतर भागांतही अनेक वेळा कमी दाबाने किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.अशी होत आहे नासाडी : ठाणे महापालिकेला एमआयडीसी, स्टेम, मुंबई महापालिका आणि स्वत:च्या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरात पाणीपुरवठा करणाºया अनेक जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून जमिनीखाली मोठी पाणीगळती होत आहे. काही ठिकाणी मीटरच्या माध्यमातून बिलांचे वाटप होत आहे, तर काही ठिकाणी ती ठोक दिली जात आहेत. त्यामुळे पाणी वापराचा योग्य अंदाज बांधणे शक्य नसल्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे.गरजेपेक्षा जास्त पाणीपुरवठासेंट्रल पब्लिक हेल्थ अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट इंजिनीअरिंग आॅर्गनायझेशनच्या मानांकनानुसार प्रत्येक व्यक्तीची दैनंदिन पाण्याची गरज १५० लीटर इतकी आहे. ठाण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे २४ लाख २१ हजार इतकी असून तिची पाण्याची गरज ४३६ एमएलडी आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त पाणीपुरवठा होत असूनही अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. २०१५ व २०१६ साली ठाणे शहराला रोज ४८० एमएलडी पाणीपुरवठा होत होता. त्यावर्षी अनुक्र मे पाण्याची गरज ही ४०६ आणि ४२१ एमएलडी इतकी होती. तर, २०१५ साली २१ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी ३९० एमएलडी पाण्याची गरज असताना ४६० एमएलडी पाणीपुरवठा होत होता, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे