शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बदलापूरचे दिवसाचे पाणी ठाण्यात वाया; रोज ४० एमएलडी पाणीगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 03:09 IST

ठाणे शहरात दररोज बदलापूरवासियांची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

- अजित मांडकेठाणे : ठाणे शहरात दररोज बदलापूरवासियांची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.उन्हाळा सुरू झाला की, जिल्ह्यासह ठाणे शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागतो. परंतु, लोकसंख्येचा विचार करून ठाणे शहराला जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत जास्त पाणीपुरवठा होतो. असे असतानाही शहरातील अनेक भागांना आजही पाण्यासाठी झगडावे लागते. मुबलक पाणी असताना केवळ नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेकडून प्रतिदिन ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही नासाडी बदलापूरला रोज लागणाºया ४० एमएलडीपेक्षाही नऊ एमएलडीने जास्त आहे.शहराची आजची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात असून तिला ४३६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना त्यापेक्षा जास्त म्हणजे ४८५ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. असे असतानाही सोमवारी ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या कार्यालयावर पाणीटंचाईची तक्रार करीत महिलांचा मोर्चा आला होता. केवळ याच भागात नाही तर शहरातील इतर भागांतही अनेक वेळा कमी दाबाने किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.अशी होत आहे नासाडी : ठाणे महापालिकेला एमआयडीसी, स्टेम, मुंबई महापालिका आणि स्वत:च्या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरात पाणीपुरवठा करणाºया अनेक जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून जमिनीखाली मोठी पाणीगळती होत आहे. काही ठिकाणी मीटरच्या माध्यमातून बिलांचे वाटप होत आहे, तर काही ठिकाणी ती ठोक दिली जात आहेत. त्यामुळे पाणी वापराचा योग्य अंदाज बांधणे शक्य नसल्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे.गरजेपेक्षा जास्त पाणीपुरवठासेंट्रल पब्लिक हेल्थ अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट इंजिनीअरिंग आॅर्गनायझेशनच्या मानांकनानुसार प्रत्येक व्यक्तीची दैनंदिन पाण्याची गरज १५० लीटर इतकी आहे. ठाण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे २४ लाख २१ हजार इतकी असून तिची पाण्याची गरज ४३६ एमएलडी आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त पाणीपुरवठा होत असूनही अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. २०१५ व २०१६ साली ठाणे शहराला रोज ४८० एमएलडी पाणीपुरवठा होत होता. त्यावर्षी अनुक्र मे पाण्याची गरज ही ४०६ आणि ४२१ एमएलडी इतकी होती. तर, २०१५ साली २१ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी ३९० एमएलडी पाण्याची गरज असताना ४६० एमएलडी पाणीपुरवठा होत होता, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे