शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

बदलापूरचे दिवसाचे पाणी ठाण्यात वाया; रोज ४० एमएलडी पाणीगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 03:09 IST

ठाणे शहरात दररोज बदलापूरवासियांची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

- अजित मांडकेठाणे : ठाणे शहरात दररोज बदलापूरवासियांची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.उन्हाळा सुरू झाला की, जिल्ह्यासह ठाणे शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागतो. परंतु, लोकसंख्येचा विचार करून ठाणे शहराला जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत जास्त पाणीपुरवठा होतो. असे असतानाही शहरातील अनेक भागांना आजही पाण्यासाठी झगडावे लागते. मुबलक पाणी असताना केवळ नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेकडून प्रतिदिन ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही नासाडी बदलापूरला रोज लागणाºया ४० एमएलडीपेक्षाही नऊ एमएलडीने जास्त आहे.शहराची आजची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात असून तिला ४३६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना त्यापेक्षा जास्त म्हणजे ४८५ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. असे असतानाही सोमवारी ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या कार्यालयावर पाणीटंचाईची तक्रार करीत महिलांचा मोर्चा आला होता. केवळ याच भागात नाही तर शहरातील इतर भागांतही अनेक वेळा कमी दाबाने किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.अशी होत आहे नासाडी : ठाणे महापालिकेला एमआयडीसी, स्टेम, मुंबई महापालिका आणि स्वत:च्या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरात पाणीपुरवठा करणाºया अनेक जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून जमिनीखाली मोठी पाणीगळती होत आहे. काही ठिकाणी मीटरच्या माध्यमातून बिलांचे वाटप होत आहे, तर काही ठिकाणी ती ठोक दिली जात आहेत. त्यामुळे पाणी वापराचा योग्य अंदाज बांधणे शक्य नसल्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे.गरजेपेक्षा जास्त पाणीपुरवठासेंट्रल पब्लिक हेल्थ अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट इंजिनीअरिंग आॅर्गनायझेशनच्या मानांकनानुसार प्रत्येक व्यक्तीची दैनंदिन पाण्याची गरज १५० लीटर इतकी आहे. ठाण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे २४ लाख २१ हजार इतकी असून तिची पाण्याची गरज ४३६ एमएलडी आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त पाणीपुरवठा होत असूनही अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. २०१५ व २०१६ साली ठाणे शहराला रोज ४८० एमएलडी पाणीपुरवठा होत होता. त्यावर्षी अनुक्र मे पाण्याची गरज ही ४०६ आणि ४२१ एमएलडी इतकी होती. तर, २०१५ साली २१ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी ३९० एमएलडी पाण्याची गरज असताना ४६० एमएलडी पाणीपुरवठा होत होता, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे