शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

बदलापूर : वीज ग्राहकाला ८२ हजाराचे बिल, महावितरणची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:38 IST

वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिल वाढवून दिले जात आहे. हजार, दोन हजार रुपये वाढवून बिल देणा-या महावितरणने बदलापूरमध्ये एका ग्राहकाची चांगलीच थट्टा केली आहे. महिन्याला हजार ते दीड हजार रुपये बिल येणा-या ग्राहकाला महिन्याचे बिल तब्बल ८२ हजार रुपये पाठवले आहे. मीटर सदोष असल्याने हा प्रकार घडल्याचे माहित असतानाही महावितरण ग्राहकाला नाहक त्रास देत आहे.

बदलापूर : वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिल वाढवून दिले जात आहे. हजार, दोन हजार रुपये वाढवून बिल देणा-या महावितरणने बदलापूरमध्ये एका ग्राहकाची चांगलीच थट्टा केली आहे. महिन्याला हजार ते दीड हजार रुपये बिल येणा-या ग्राहकाला महिन्याचे बिल तब्बल ८२ हजार रुपये पाठवले आहे. मीटर सदोष असल्याने हा प्रकार घडल्याचे माहित असतानाही महावितरण ग्राहकाला नाहक त्रास देत आहे.बदलापूरच्या जाधव कॉलनीत राहणा-या निलीमा चिंदरकर यांना दर महिन्याला दीड हजाराच्या आतच वीज बिल येत होते. मात्र त्यांच्या मीटरमध्ये दोष आल्याने गेल्या महिन्याचे त्यांचे बिल तब्बल ८२ हजार आले आहे. विजेचा वापर हा घरगुती असतानाही त्यांना एका महिन्याचे विजेचे युनिट ५ हजार ६९३ दाखवले आहे. एवढे युनीट वापरलेच नाही तर मग इतके पडलेच कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे. हा प्रकार येथेच थांबलेला नाही. त्यांना एका महिन्याचे विजेचे बिलही ८२ हजार दाखवण्यात आले आहे. या बिलावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांच्या विजेच्या मीटरमध्ये बिघाड झालेला आहे. मात्र त्याची तपासणी न करता सरसकट बिल पाठवण्याचे काम महावितरणने केले आहे.या प्रकरणी अधिका-यांना जाब विचारल्यावर त्यांनी लागलीच निम्मे बिल कमी करून ४० हजार बिल दिले. मात्र इतकी रक्कम भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे चिंदरकर यांनी स्पष्ट केले.महावितरण विभागाच्या चुकीच्या यंत्रणेचा फटका हा नाहक ग्राहकांना बसत आहे. असे असताना त्यांनी यंत्रणेत सुधारणा न करता थेट ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महावितरणाच्या कारभाराचा अनेकदा फटका ग्राहकांना बसत असून सदोष मीटरमुळे बदलापूर, अंबरनाथ शहरांमध्ये ग्राहक त्रस्त आहेत. त्यात बदलापूर आणि अंबरनाथसारख्या शहरात तब्बल २० हजाराहून अधिक वीज मीटर सदोष असल्याचे नुकतेच समोर आले होते.त्यानंतर नवे मीटर मिळावे म्हणून लाच घेतली जात असल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यामुळे मीटरच्या संदर्भातील महावितरणाच्या चुकांमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.चूक महावितरणची, फटका ग्राहकालामहावितरणाची चूक असतानाही अशा तक्र ारींमध्ये ग्राहकांनाच १८० रूपये भरून आपले सुस्थितीत असलेले मीटर तपासून घ्यावे लागते. त्यामुळे ग्राहकात संतापाचे वातावरण आहे. अशा अव्वाच्यासव्वा बिलांची संख्या शहरात मोठी असून सदोष मीटर युनिट तपासणी यंत्रणा आणि मीटरमुळे हा प्रकार होत असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनीच स्पष्ट केले आहे. मात्र या प्रकरणात अधिकृत प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.

टॅग्स :badlapurबदलापूर