शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

बदलापूर : वीज ग्राहकाला ८२ हजाराचे बिल, महावितरणची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:38 IST

वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिल वाढवून दिले जात आहे. हजार, दोन हजार रुपये वाढवून बिल देणा-या महावितरणने बदलापूरमध्ये एका ग्राहकाची चांगलीच थट्टा केली आहे. महिन्याला हजार ते दीड हजार रुपये बिल येणा-या ग्राहकाला महिन्याचे बिल तब्बल ८२ हजार रुपये पाठवले आहे. मीटर सदोष असल्याने हा प्रकार घडल्याचे माहित असतानाही महावितरण ग्राहकाला नाहक त्रास देत आहे.

बदलापूर : वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिल वाढवून दिले जात आहे. हजार, दोन हजार रुपये वाढवून बिल देणा-या महावितरणने बदलापूरमध्ये एका ग्राहकाची चांगलीच थट्टा केली आहे. महिन्याला हजार ते दीड हजार रुपये बिल येणा-या ग्राहकाला महिन्याचे बिल तब्बल ८२ हजार रुपये पाठवले आहे. मीटर सदोष असल्याने हा प्रकार घडल्याचे माहित असतानाही महावितरण ग्राहकाला नाहक त्रास देत आहे.बदलापूरच्या जाधव कॉलनीत राहणा-या निलीमा चिंदरकर यांना दर महिन्याला दीड हजाराच्या आतच वीज बिल येत होते. मात्र त्यांच्या मीटरमध्ये दोष आल्याने गेल्या महिन्याचे त्यांचे बिल तब्बल ८२ हजार आले आहे. विजेचा वापर हा घरगुती असतानाही त्यांना एका महिन्याचे विजेचे युनिट ५ हजार ६९३ दाखवले आहे. एवढे युनीट वापरलेच नाही तर मग इतके पडलेच कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे. हा प्रकार येथेच थांबलेला नाही. त्यांना एका महिन्याचे विजेचे बिलही ८२ हजार दाखवण्यात आले आहे. या बिलावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांच्या विजेच्या मीटरमध्ये बिघाड झालेला आहे. मात्र त्याची तपासणी न करता सरसकट बिल पाठवण्याचे काम महावितरणने केले आहे.या प्रकरणी अधिका-यांना जाब विचारल्यावर त्यांनी लागलीच निम्मे बिल कमी करून ४० हजार बिल दिले. मात्र इतकी रक्कम भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे चिंदरकर यांनी स्पष्ट केले.महावितरण विभागाच्या चुकीच्या यंत्रणेचा फटका हा नाहक ग्राहकांना बसत आहे. असे असताना त्यांनी यंत्रणेत सुधारणा न करता थेट ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महावितरणाच्या कारभाराचा अनेकदा फटका ग्राहकांना बसत असून सदोष मीटरमुळे बदलापूर, अंबरनाथ शहरांमध्ये ग्राहक त्रस्त आहेत. त्यात बदलापूर आणि अंबरनाथसारख्या शहरात तब्बल २० हजाराहून अधिक वीज मीटर सदोष असल्याचे नुकतेच समोर आले होते.त्यानंतर नवे मीटर मिळावे म्हणून लाच घेतली जात असल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यामुळे मीटरच्या संदर्भातील महावितरणाच्या चुकांमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.चूक महावितरणची, फटका ग्राहकालामहावितरणाची चूक असतानाही अशा तक्र ारींमध्ये ग्राहकांनाच १८० रूपये भरून आपले सुस्थितीत असलेले मीटर तपासून घ्यावे लागते. त्यामुळे ग्राहकात संतापाचे वातावरण आहे. अशा अव्वाच्यासव्वा बिलांची संख्या शहरात मोठी असून सदोष मीटर युनिट तपासणी यंत्रणा आणि मीटरमुळे हा प्रकार होत असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनीच स्पष्ट केले आहे. मात्र या प्रकरणात अधिकृत प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.

टॅग्स :badlapurबदलापूर