शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बदलापूर : वीज ग्राहकाला ८२ हजाराचे बिल, महावितरणची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:38 IST

वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिल वाढवून दिले जात आहे. हजार, दोन हजार रुपये वाढवून बिल देणा-या महावितरणने बदलापूरमध्ये एका ग्राहकाची चांगलीच थट्टा केली आहे. महिन्याला हजार ते दीड हजार रुपये बिल येणा-या ग्राहकाला महिन्याचे बिल तब्बल ८२ हजार रुपये पाठवले आहे. मीटर सदोष असल्याने हा प्रकार घडल्याचे माहित असतानाही महावितरण ग्राहकाला नाहक त्रास देत आहे.

बदलापूर : वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिल वाढवून दिले जात आहे. हजार, दोन हजार रुपये वाढवून बिल देणा-या महावितरणने बदलापूरमध्ये एका ग्राहकाची चांगलीच थट्टा केली आहे. महिन्याला हजार ते दीड हजार रुपये बिल येणा-या ग्राहकाला महिन्याचे बिल तब्बल ८२ हजार रुपये पाठवले आहे. मीटर सदोष असल्याने हा प्रकार घडल्याचे माहित असतानाही महावितरण ग्राहकाला नाहक त्रास देत आहे.बदलापूरच्या जाधव कॉलनीत राहणा-या निलीमा चिंदरकर यांना दर महिन्याला दीड हजाराच्या आतच वीज बिल येत होते. मात्र त्यांच्या मीटरमध्ये दोष आल्याने गेल्या महिन्याचे त्यांचे बिल तब्बल ८२ हजार आले आहे. विजेचा वापर हा घरगुती असतानाही त्यांना एका महिन्याचे विजेचे युनिट ५ हजार ६९३ दाखवले आहे. एवढे युनीट वापरलेच नाही तर मग इतके पडलेच कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे. हा प्रकार येथेच थांबलेला नाही. त्यांना एका महिन्याचे विजेचे बिलही ८२ हजार दाखवण्यात आले आहे. या बिलावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांच्या विजेच्या मीटरमध्ये बिघाड झालेला आहे. मात्र त्याची तपासणी न करता सरसकट बिल पाठवण्याचे काम महावितरणने केले आहे.या प्रकरणी अधिका-यांना जाब विचारल्यावर त्यांनी लागलीच निम्मे बिल कमी करून ४० हजार बिल दिले. मात्र इतकी रक्कम भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे चिंदरकर यांनी स्पष्ट केले.महावितरण विभागाच्या चुकीच्या यंत्रणेचा फटका हा नाहक ग्राहकांना बसत आहे. असे असताना त्यांनी यंत्रणेत सुधारणा न करता थेट ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महावितरणाच्या कारभाराचा अनेकदा फटका ग्राहकांना बसत असून सदोष मीटरमुळे बदलापूर, अंबरनाथ शहरांमध्ये ग्राहक त्रस्त आहेत. त्यात बदलापूर आणि अंबरनाथसारख्या शहरात तब्बल २० हजाराहून अधिक वीज मीटर सदोष असल्याचे नुकतेच समोर आले होते.त्यानंतर नवे मीटर मिळावे म्हणून लाच घेतली जात असल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यामुळे मीटरच्या संदर्भातील महावितरणाच्या चुकांमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.चूक महावितरणची, फटका ग्राहकालामहावितरणाची चूक असतानाही अशा तक्र ारींमध्ये ग्राहकांनाच १८० रूपये भरून आपले सुस्थितीत असलेले मीटर तपासून घ्यावे लागते. त्यामुळे ग्राहकात संतापाचे वातावरण आहे. अशा अव्वाच्यासव्वा बिलांची संख्या शहरात मोठी असून सदोष मीटर युनिट तपासणी यंत्रणा आणि मीटरमुळे हा प्रकार होत असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनीच स्पष्ट केले आहे. मात्र या प्रकरणात अधिकृत प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.

टॅग्स :badlapurबदलापूर