शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

भिवंडी मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था, मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात

By नितीन पंडित | Updated: February 21, 2023 18:57 IST

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असताना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी पालिका कार्यक्रम राबविते.

भिवंडी - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असताना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी पालिका कार्यक्रम राबविते.परंतु पालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी अत्यावश्यक असलेली स्वच्छतागृह सुस्थितीत ठेवण्याकडे पालिका प्रशासन सोयीस्कर पणे दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे .

 पालिकेच्या दगडी शाळा येथील शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शाळा इमारती मध्ये शाळा क्रमांक १ भरविली जाते.या इमरती मध्ये असलेल्या स्वच्छतागृहाची पूर्णतः दुर्दशा झाली आहे.गलिच्छ व तुटके शौचालय ,सडके पत्र्याचे गंजलेले दरवाजे अशा स्वच्छता होत नसलेल्या स्वच्छतागृहाचा वापर येथील विद्यार्थ्यांना नाक मुठीत धरून करावा लागत आहे.

ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी शहराध्यक्ष जय नाईक,उपजिल्हा अध्यक्ष योगेश धुळे,जिल्हा सचिव हर्शल भोईर,विभाग अध्यक्ष कुणाल अहिरे,कायदेशीर सल्लागार अँड सुनिल देवरे या शिष्टमंडळासह पालिका शिक्षण विभागाचे प्रभारी प्रशासना अधिकारी थोरात यांची भेट घेऊन निवेदन देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. येत्या आठ दिवसात या स्वच्छता गृहांची दुरुस्ती व स्वच्छता न झाल्यास विद्यार्थ्यांना पालिका मुख्यालयाच्या दालनात स्वच्छतागृहा साठी घेऊन येऊ असा इशारा परेश चौधरी यांनी निवेदन देऊन दिला आहे .

टॅग्स :thaneठाणे