शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

ठाणेकर मतदारराजा झाला जागरूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:44 IST

वीकेण्ड असूनही पर्यटनस्थळांकडे फिरवली पाठ : मतदानाच्या जबाबदारीची होतेय जाणीव

ठाणे : विविध उपक्रमांतून गेले काही दिवस मतदानाबाबत सुरू असलेल्या जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळाला. मतदानाच्या दिवसाआधी किंवा नंतर सुट्ट्या आल्या, तर पर्यटनासाठी बाहेर पडणारा ठाणेकर मतदारराजा या वेळी मात्र मतदानाबाबत चांगलाच जागरूक झालेला आहे. यंदा, मतदानाआधी सलग वीकेण्ड येऊनही मतदारांनी कोणत्याही पर्यटनस्थळी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग केलेले नाही. शहरातील ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झालेला असला, तरी मतदानाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली जबाबदारीची जाणीव हेच जनजागृतीपर उपक्रमांचे यश आहे.

मतदानाबाबत वेळोवेळी निवडणूक आयोग, शासन आणि विविध संस्थांकडून उपक्रमांद्वारे जागृती केली जाते. तरीही मतदानाबाबत नागरिकांमध्ये निरुत्साह दिसतो. मतदानासाठी काही खाजगी कंपन्या, संस्था तर सुटी जाहीर करतात. मात्र, मतदार तो मतदानाचा दिवस आणि त्यालाच जोडून सुट्या घेऊन पर्यटनासाठी सहकुटुंब बाहेर पडतात, असे चित्र यापूर्वी पाहायला मिळाले आहे. यंदा, ठाणे, मुंबईत आज (सोमवारी) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवार आणि सोमवार हे तीन दिवस बहुतांशी मतदार हे लोणावळा, महाबळेश्वर, शिर्डी,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, माथेरान अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनास जातील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, यंदा ठाणेकर मतदारांनी आपल्या मतदानाचे मूल्य ओळखलेले दिसते आहे. त्यांनी मतदानाला महत्त्व देऊन पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवली आहे. ठाण्यातील बहुतांशी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे या तीन दिवसांत पर्यटनस्थळी जाण्यासाठी फारसे बुकिंग झालेले नाही. जेमतेम पाच ते सात टक्के लोकच बाहेरगावी गेलेले आहेत, असे दिसते. तर, या आधीच्या टप्प्यात ज्या ठिकाणी मतदान झाले, त्यात्या जिल्ह्णात आपापल्या गावी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेक ठाणे, मुंबईकर आवर्जून गेले होते. त्यांनी त्यासाठी बुकिंग केले होते, अशी माहिती ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी दिली.

यंदा मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती झालेली आहे. आपलं एक मत मोलाचं आहे, हे ओळखून बहुतांश मतदारांनी आपापल्या शहरात राहणं पसंत केलेलं आहे. मतदान असणाऱ्या आठवड्यात बहुतांशी नागरिक बाहेरगावी जातात, असा अनुभव अनेकदा आला आहे. त्यानुसार, यंदाही ठाणेकर नागरिक पर्यटनस्थळी जातील, असा अंदाज होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे बुकिंग झालेले नाही. मतदारांनी पर्यटनाला न जाता मतदान करण्याला प्राधान्य दिलेले दिसते आहे. आमच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला असला, तरी मतदानाबाबत लोकांमध्ये उत्साह आहे, याचे समाधान वाटतं. - संतोष भोर, ट्रॅव्हल कंपनीचे प्रमुख

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthane-pcठाणे