शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अन् शासकीय यंत्रणा झाल्या खडबडून जाग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:51 IST

ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा मुद्दा सध्या भलताच गाजतो आहे. श्रमजीवीच्या हंडामोर्चात मोर्चेकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

अनगाव : ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा मुद्दा सध्या भलताच गाजतो आहे. श्रमजीवीच्या हंडामोर्चात मोर्चेकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी रविवारी सुटी असूनही ग्रामसेवक, पाणीपुरवठा अधिकाºयांची तत्काळ बैठक घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला. तसेच पाणीसमस्या दूर करण्याच्या सूचना दिल्याने ग्रामसेवकासह पाणीपुरवठा अधिकाºयांची तारांबळ उडाली आहे. तर, सुटीच्या दिवसांतही ते गावपाड्यात फिरून पाहणी करत आहेत. गुरुवारी झालेल्या भिवंडी पंचायत समितीच्या मासिक सभेत विरोधी पक्षांनी अधिकाºयांना जाब विचारला.‘भिवंडीतील गावे तहानलेली, प्रशासन म्हणते कुठे आहे टंचाई’ या विशेष वृत्तांतर्गत ग्रामीण भागातील भीषण पाणीटंचाईचे चित्र ‘लोकमत’ने गेल्या रविवारी मांडले. त्यानंतर, तातडीने सोमवार ते शुक्रवारदरम्यान वेगवेगळ्या यंत्रणा कामाला लागल्या. शुक्रवारी श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती कार्यालयावर हंडामोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. तसेच ‘पाणी द्या, कारणे सांगू नका’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तर ८ मे पर्यंत पाणीटंचाई दूर करण्याचा अल्टिमेटम गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा उपअभियंता यांना दिल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.यासाठी गावपाड्यांमधील टंचाईचा अंदाज घेण्यासाठी तेथे पाहणी सुरू असून २७ पाड्यांमध्ये बोअरवेल मारण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा उपअभियंता राऊत यांनी सांगितले. तर, उर्वरित गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करणार असल्याचे आश्वासन तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिले. या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी गटविकास अधिकाºयांनी बैठक घेऊन पाणीसमस्या दूर करण्याच्या सूचना दिल्या असून यामध्ये हलगर्जी करणाºयांवर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.पाणीप्रश्नावर जर या पूर्वीच उपाययोजना केल्या असत्या, तर गटविकास अधिकाºयांना सुटीच्या दिवसांत बैठका घेण्याची गरजच भासली नसती. गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता वेळेत केली नाही, तर त्यांना घेराव घालून त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जातील, असा इशारा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सापटे यांनी दिला आहे .‘लोकमत’ने पाण्याचा प्रश्न सातत्याने लावून धरल्याने त्यावर तोडगा निघाल्याचे संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते ललित शेळके यांनी सांगितले.