शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

अन् शासकीय यंत्रणा झाल्या खडबडून जाग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:51 IST

ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा मुद्दा सध्या भलताच गाजतो आहे. श्रमजीवीच्या हंडामोर्चात मोर्चेकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

अनगाव : ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा मुद्दा सध्या भलताच गाजतो आहे. श्रमजीवीच्या हंडामोर्चात मोर्चेकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी रविवारी सुटी असूनही ग्रामसेवक, पाणीपुरवठा अधिकाºयांची तत्काळ बैठक घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला. तसेच पाणीसमस्या दूर करण्याच्या सूचना दिल्याने ग्रामसेवकासह पाणीपुरवठा अधिकाºयांची तारांबळ उडाली आहे. तर, सुटीच्या दिवसांतही ते गावपाड्यात फिरून पाहणी करत आहेत. गुरुवारी झालेल्या भिवंडी पंचायत समितीच्या मासिक सभेत विरोधी पक्षांनी अधिकाºयांना जाब विचारला.‘भिवंडीतील गावे तहानलेली, प्रशासन म्हणते कुठे आहे टंचाई’ या विशेष वृत्तांतर्गत ग्रामीण भागातील भीषण पाणीटंचाईचे चित्र ‘लोकमत’ने गेल्या रविवारी मांडले. त्यानंतर, तातडीने सोमवार ते शुक्रवारदरम्यान वेगवेगळ्या यंत्रणा कामाला लागल्या. शुक्रवारी श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती कार्यालयावर हंडामोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. तसेच ‘पाणी द्या, कारणे सांगू नका’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तर ८ मे पर्यंत पाणीटंचाई दूर करण्याचा अल्टिमेटम गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा उपअभियंता यांना दिल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.यासाठी गावपाड्यांमधील टंचाईचा अंदाज घेण्यासाठी तेथे पाहणी सुरू असून २७ पाड्यांमध्ये बोअरवेल मारण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा उपअभियंता राऊत यांनी सांगितले. तर, उर्वरित गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करणार असल्याचे आश्वासन तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिले. या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी गटविकास अधिकाºयांनी बैठक घेऊन पाणीसमस्या दूर करण्याच्या सूचना दिल्या असून यामध्ये हलगर्जी करणाºयांवर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.पाणीप्रश्नावर जर या पूर्वीच उपाययोजना केल्या असत्या, तर गटविकास अधिकाºयांना सुटीच्या दिवसांत बैठका घेण्याची गरजच भासली नसती. गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता वेळेत केली नाही, तर त्यांना घेराव घालून त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जातील, असा इशारा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सापटे यांनी दिला आहे .‘लोकमत’ने पाण्याचा प्रश्न सातत्याने लावून धरल्याने त्यावर तोडगा निघाल्याचे संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते ललित शेळके यांनी सांगितले.