शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

अन् शासकीय यंत्रणा झाल्या खडबडून जाग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:51 IST

ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा मुद्दा सध्या भलताच गाजतो आहे. श्रमजीवीच्या हंडामोर्चात मोर्चेकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

अनगाव : ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा मुद्दा सध्या भलताच गाजतो आहे. श्रमजीवीच्या हंडामोर्चात मोर्चेकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी रविवारी सुटी असूनही ग्रामसेवक, पाणीपुरवठा अधिकाºयांची तत्काळ बैठक घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला. तसेच पाणीसमस्या दूर करण्याच्या सूचना दिल्याने ग्रामसेवकासह पाणीपुरवठा अधिकाºयांची तारांबळ उडाली आहे. तर, सुटीच्या दिवसांतही ते गावपाड्यात फिरून पाहणी करत आहेत. गुरुवारी झालेल्या भिवंडी पंचायत समितीच्या मासिक सभेत विरोधी पक्षांनी अधिकाºयांना जाब विचारला.‘भिवंडीतील गावे तहानलेली, प्रशासन म्हणते कुठे आहे टंचाई’ या विशेष वृत्तांतर्गत ग्रामीण भागातील भीषण पाणीटंचाईचे चित्र ‘लोकमत’ने गेल्या रविवारी मांडले. त्यानंतर, तातडीने सोमवार ते शुक्रवारदरम्यान वेगवेगळ्या यंत्रणा कामाला लागल्या. शुक्रवारी श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती कार्यालयावर हंडामोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. तसेच ‘पाणी द्या, कारणे सांगू नका’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तर ८ मे पर्यंत पाणीटंचाई दूर करण्याचा अल्टिमेटम गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा उपअभियंता यांना दिल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.यासाठी गावपाड्यांमधील टंचाईचा अंदाज घेण्यासाठी तेथे पाहणी सुरू असून २७ पाड्यांमध्ये बोअरवेल मारण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा उपअभियंता राऊत यांनी सांगितले. तर, उर्वरित गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करणार असल्याचे आश्वासन तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिले. या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी गटविकास अधिकाºयांनी बैठक घेऊन पाणीसमस्या दूर करण्याच्या सूचना दिल्या असून यामध्ये हलगर्जी करणाºयांवर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.पाणीप्रश्नावर जर या पूर्वीच उपाययोजना केल्या असत्या, तर गटविकास अधिकाºयांना सुटीच्या दिवसांत बैठका घेण्याची गरजच भासली नसती. गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता वेळेत केली नाही, तर त्यांना घेराव घालून त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जातील, असा इशारा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सापटे यांनी दिला आहे .‘लोकमत’ने पाण्याचा प्रश्न सातत्याने लावून धरल्याने त्यावर तोडगा निघाल्याचे संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते ललित शेळके यांनी सांगितले.