शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आरक्षण हस्तांतरित करण्यास केली टाळाटाळ

By admin | Updated: May 2, 2017 02:05 IST

तब्बल १५ आरक्षण असलेल्या भूखंडावर सुरू असलेल्या बांधकामांबाबत विधिमंडळात लक्षवेधी दाखल झाली आहे. त्यामुळे

कल्याण : तब्बल १५ आरक्षण असलेल्या भूखंडावर सुरू असलेल्या बांधकामांबाबत विधिमंडळात लक्षवेधी दाखल झाली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेने त्यास स्थगिती दिली आहे.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या आरक्षणांचा मुद्दा उपस्थित झाला होता. ज्या विभागांची आरक्षणे आहेत, त्यांना ती हस्तांतरित करा. तोपर्यंत तेथील बांधकाम परवानग्या रद्द करून स्थगिती द्या, अशी मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, महापालिकेला स्वत:च्या मालकीच्या आरक्षित भूखंड, जागा यांचाही विसर पडल्याचे त्याचबरोबर उर्वरित आरक्षणांसंबंधित विभागांना हस्तांतरित करण्यास टाळाटाळ सुरू असल्याचे हे एकंदरीत प्रकरण पाहता स्पष्ट होत आहे. पश्चिमेकडील गोल्डन पार्क परिसरातील मे. उषा पेपर मिल लि./ मे. व्हर्टेक्स न्युटॉन को. प्रा.लि. यांच्या भूखंडावर तब्बल १५ आरक्षणे असल्याचे कल्याणमधील जागरूक नागरिक मनोज कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात उघड केले होते. हा मुद्दा विधानपरिषदेचे आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. या भूखंडावर म्हाडा, पोलीस आयुक्तालय, राज्य परिवहन महामंडळ, दूरध्वनी विभाग, न्यायालयीन इमारत, स्वीपर्स कॉलनी, महापालिका कर्मचारी वसाहत, मनोरंजनाचे मैदान, प्राथमिक शाळा, पार्किंग, महापालिकेची प्रशासकीय इमारत, महापालिका पाण्याची टाकी, दुकान केंद्र, वाचनालय आणि महिला कल्याण केंद्र आदी १५ आरक्षणे असल्याकडे अ‍ॅड. परब यांनी लक्ष वेधले होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या राज्यमंत्र्यांना यासंदर्भातील कागदपत्रे प्राप्त करून घ्यावीत आणि प्रधान सचिवांनी यामध्ये लक्ष घालावे, असे निर्देश दिले होते. परंतु, याला बराच कालावधी उलटूनही योग्य कारवाई न झाल्याने परब यांनी २८ फेब्रुवारीला केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांना पत्रव्यवहार करून आरक्षण हस्तांतरित करणे आणि बांधकाम परवानग्या रद्द करून स्थगिती देण्याची मागणी केली होती. १५ आरक्षणांपैकी पोलीस आयुक्त कार्यालयाने त्यांच्यासाठी आरक्षित असलेला भूखंड मागितला होता. मात्र, तो त्यांना हस्तांतरित केला नसल्याकडे परब यांनी लक्ष वेधले होते. उर्वरित आरक्षणेही ‘जैसे थे’ असल्याने संबंधित विभागाला ती हस्तांतरित करण्यास महापालिकेला स्वारस्य नाही. भूखंडावर असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्याचे परब यांनी पत्रात नमूद केले होते. (प्रतिनिधी)बेकायदा बांधकामे तोडावीतआरक्षणांचा विधिमंडळात उपस्थित झालेला मुद्दा आणि अ‍ॅड. परब यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत अखेर केडीएमसीच्या नगररचना विभागाने संबंधित भूखंडावरील बांधकाम परवानगीस स्थगिती दिली आहे. जोपर्यंत आरक्षणे हस्तांतरित होत नाहीत, तोपर्यंत बांधकाम परवानग्या देऊ नये तसेच या भूखंडावरील बेकायदा बांधकामे तोडण्यात यावीत, असे मत जागरूक नागरिक कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.