शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

आव्हाड गट आणि नाईक गट पुन्हा आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 06:40 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील राष्टÑवादीत पुन्हा दुफळी माजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी आता पुन्हा गणेश नाईक गट सक्रिय झाला असून शहराध्यक्ष हटाव मोहिमेपासून ते कळव्यातून त्यांना हद्दपार करण्यासाठी व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील राष्टÑवादीत पुन्हा दुफळी माजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी आता पुन्हा गणेश नाईक गट सक्रिय झाला असून शहराध्यक्ष हटाव मोहिमेपासून ते कळव्यातून त्यांना हद्दपार करण्यासाठी व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे.त्यानुसार, येत्या विधानसभा निवडणुकीत कळव्यातून आगरीकार्ड चालवण्याच्या हालचाली नाईक गटाने सुरू केल्या आहेत. तसेच एमआयएमला हाताशी घेऊन आव्हाडांना त्यांच्याच मतदारसंघात पक्षातील मंडळींनी सुरुंग लावण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.ठाण्यात यापूर्वी राष्टÑवादीमध्ये तीन गट सक्रिय असल्याचे दिसून आले होते. परंतु, आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राष्टÑवादीत दोन गट पडल्याचे दिसून आले आहे. मागील चार वर्षे राजकारणात फारशी सक्रिय नसलेली नाईक फॅमिली पुन्हा एकदा सक्रिय झाली असून त्यांनी आव्हाडांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. यातूनच त्यांनी पहिला निशाणा थेट शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यावर साधून आधी शहराध्यक्ष बदला, असा नारा देण्यास सुरुवात केली आहे.परांजपेंचा काटा काढला, तर आव्हाडांना हा मोठा धक्का असू शकतो, अशी चर्चादेखील आता ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परांजपे हटाव मोहीम मागील काही दिवसांपासून अधिक तीव्र झाली असून पक्षश्रेष्ठींकडे परांजपे यांच्या कामाविरोधात तक्रारी सुरू झाल्या आहेत.आव्हाडांना पुन्हा त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी केणी कुटुंब सर्वात आघाडीवर असल्याची चर्चा आहे. केणी हे गणेश नाईक गटाचे असल्याचे बोलले जात आहे. ठाणे महापालिका निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपदावरही त्यांचा दावा असताना त्यांना बाजूला सारून आव्हाड समर्थक मिलिंद पाटील यांची त्याठिकाणी वर्णी लावण्यात आली होती. त्यामुळे केणी फॅमिली तेव्हापासून नाराज झाली आहे. त्यामुळे आता बदला घेण्यासाठी नाईक फॅमिलीने केणींकरवी या भागात आगरीकार्ड चालवण्याच्या हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे. यातूनच काही दिवसांपूर्वी कळव्यात अजय-अतुल यांचा कार्यक्रम घेऊन केणी कुटुंबातील मंदार यांना हायलाइट करण्यात आले.कळवा, विटावा, पारसिकनगर, रेतीबंदर आदी भागांत आगरी समाजबांधव अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे आता केणींकरवी त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू झाल्याचेही बोलले जात आहे.येत्या काळात कदाचित मंदार केणी हे आव्हाडांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. परंतु, त्यांचा पक्ष कोणता असेल, हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. असे असले तरी ते शिवसेनेच्या जवळ असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे पक्षातील इतर मंडळींना डावलून शिवसेनादेखील याच आगरीकार्डचा वापर येत्या निवडणुकीत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एमआयएम हाताशी धरून आव्हाडांना घेरणारआव्हाडांना कळव्यापेक्षाही मुंब्य्रातून अधिक पसंतीची मते मिळाली होती. एमआयएमचा शिरकाव झाल्याने आणि त्यांचा वापर करून शिवसेनेने यापूर्वीदेखील ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत आव्हाडांविरोधात गणिते मांडली.त्याचे फासे काहीअंशी योग्य पडल्याने आता पुन्हा एमआयएमला हाताशी धरून आव्हाडांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्याचे मनसुबे त्यांच्या पक्षातील काही मंडळींसह शिवसेनेनेदेखील आखले आहेत. परंतु, यात कोणाचे फासे कसे पडतात, हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र