शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

काळू धरण क्षेत्रातील गावांत अधिकाऱ्यांना केली प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 23:45 IST

ग्रामस्थ आक्रमक : फलक लावून दर्शविला तीव्र विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : ठाणे शहराची तहान भागविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या काळू धरणाच्या उभारणीसाठी पुन्हा हालचाली सुरू होताच धरणक्षेत्रातील ग्रामस्थांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. येथील गावांमध्ये आता धरणासंबंधी काम करण्याकरिता येणाऱ्या कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तशा आशयाचे फलक या गावांच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी काळू धरणाच्या कामासंदर्भात गावात येऊ नये, असा थेट धमकीवजा इशाराच ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे काळू धरणविरोधी संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.

शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाच त्यांना पुरेसे पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरत आहेत. ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीप्रश्नावरून गोंधळ झाला. तर पाण्याची गरज भागविण्यासाठी ठाणे महापालिकेने स्टेम प्राधिकरण, भातसा धरण आणि एमआयडीसीकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. तसेच स्वतःच्या मालकीचे धरण व्हावे यासाठी मुरबाड तालुक्यातील ११ वर्षांपासून रखडलेल्या काळू धरणाच्या उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र काळू धरण क्षेत्रात येणाऱ्या ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी हे धरण रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात येथील शेतकऱ्यांनी संयुक्त बैठका घेत या धरणाला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला. 

गावांच्या प्रवेशद्वारांवर फलकnबांगरवाडी, चासोळे, आंबिवली, तळेगाव, जडई, फांगळोशी, दिघेफळ, खुटल या गावांमध्ये प्रवेशद्वारांवर प्रवेशबंदीचे फलक लावले आहेत. शेती हेच आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असून आता विस्थापित झाल्यास आमच्या शेतीचे काय, त्यामुळे आम्ही गाव सोडणार नाही, असे चासोळे गावच्या हरी राऊत यांनी केला आहे. nतर शहरांची तहान भागविण्यासाठी आणखी किती काळ शेतकऱ्यांना विस्थापित करणार आहात? मुंबईला पाणीपुरवठा करण्याचा ठेका घेतला आहे का, असा सवाल किसन आलम यांनी उपस्थित केला आहे. तर  आम्हाला आताच सुगीचे दिवस आले असून तेही हिरावून घेऊ नका, असा सूर येथील तरुणांमध्ये उमटत आहे.

टॅग्स :thaneठाणे