शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

काळू धरण क्षेत्रातील गावांत अधिकाऱ्यांना केली प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 23:45 IST

ग्रामस्थ आक्रमक : फलक लावून दर्शविला तीव्र विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : ठाणे शहराची तहान भागविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या काळू धरणाच्या उभारणीसाठी पुन्हा हालचाली सुरू होताच धरणक्षेत्रातील ग्रामस्थांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. येथील गावांमध्ये आता धरणासंबंधी काम करण्याकरिता येणाऱ्या कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तशा आशयाचे फलक या गावांच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी काळू धरणाच्या कामासंदर्भात गावात येऊ नये, असा थेट धमकीवजा इशाराच ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे काळू धरणविरोधी संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.

शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाच त्यांना पुरेसे पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरत आहेत. ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीप्रश्नावरून गोंधळ झाला. तर पाण्याची गरज भागविण्यासाठी ठाणे महापालिकेने स्टेम प्राधिकरण, भातसा धरण आणि एमआयडीसीकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. तसेच स्वतःच्या मालकीचे धरण व्हावे यासाठी मुरबाड तालुक्यातील ११ वर्षांपासून रखडलेल्या काळू धरणाच्या उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र काळू धरण क्षेत्रात येणाऱ्या ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी हे धरण रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात येथील शेतकऱ्यांनी संयुक्त बैठका घेत या धरणाला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला. 

गावांच्या प्रवेशद्वारांवर फलकnबांगरवाडी, चासोळे, आंबिवली, तळेगाव, जडई, फांगळोशी, दिघेफळ, खुटल या गावांमध्ये प्रवेशद्वारांवर प्रवेशबंदीचे फलक लावले आहेत. शेती हेच आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असून आता विस्थापित झाल्यास आमच्या शेतीचे काय, त्यामुळे आम्ही गाव सोडणार नाही, असे चासोळे गावच्या हरी राऊत यांनी केला आहे. nतर शहरांची तहान भागविण्यासाठी आणखी किती काळ शेतकऱ्यांना विस्थापित करणार आहात? मुंबईला पाणीपुरवठा करण्याचा ठेका घेतला आहे का, असा सवाल किसन आलम यांनी उपस्थित केला आहे. तर  आम्हाला आताच सुगीचे दिवस आले असून तेही हिरावून घेऊ नका, असा सूर येथील तरुणांमध्ये उमटत आहे.

टॅग्स :thaneठाणे