शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नेते मंडळींकडून मराठा आणि बहुजनांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 23:34 IST

मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने राज्यभर मराठा जोडो अभियान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई येथून सुरू झालेल्या रॅलीची रविवारी ठाण्यातील माजीवडा पुलाच्या खाली सांगता झाली. मराठा आणि बहुजन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न काही नेते मंडळी करीत असल्याचा आरोप मराठा क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांनी यावेळी ठाण्यात केला.

ठळक मुद्दे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा आरोप राज्यभर मराठा जोडो अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मराठा आणि बहुजन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न काही नेते मंडळी करीत असल्याचा आरोप मराठा क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांनी ठाण्यात केला. राजकीय नेत्यांमुळेच दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने राज्यभर मराठा जोडो अभियान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई येथून सुरू झालेल्या रॅलीची रविवारी ठाण्यातील माजीवडा पुलाच्या खाली सांगता झाली.मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने न्यायालयात योग्य भूमिका न बजावल्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत निर्णय होऊ शकला नाही . या साठी सकल मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने मराठा जोडो अभियानाची सुरु वात रविवारपासून करण्यात आली आहे. मुंबईमधून सुरू झालेल्या या रॅलीची सांगता रविवारी ठाण्यात झाली. माजीवडा येथील उड्डाणपूलाच्या खाली मुंबईमधील क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांचे स्वागत ठाण्यातील समन्वयकानी केले. या वेळी शिवाजी महराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मराठा आरक्षण लागू नसताना सरकारने जी नोकर भरती करण्याचे ठरवले आहे .ते चुकीचं आहे. ज्या राजकीय नेत्यांना त्यांच्याच समाजातही किंमत नाही, ते नेते मराठा आणि बहुजन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होत आहे, असल्याचा आरोप मराठा मोर्चाचे मुंबई समन्वयक रवींद्र पवार यांनी केला.या वेळी सरकारमधील मंत्री आणि सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. भविष्यात समन्वयकांची दुसरी टीम मुंबईहून दहिसरच्या दिशेने तर इतर टीम कल्याणच्या बाजूने जाईल आणि जनजागृती करण्यात येईल, असे मोर्चाचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा