शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

नेते मंडळींकडून मराठा आणि बहुजनांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 23:34 IST

मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने राज्यभर मराठा जोडो अभियान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई येथून सुरू झालेल्या रॅलीची रविवारी ठाण्यातील माजीवडा पुलाच्या खाली सांगता झाली. मराठा आणि बहुजन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न काही नेते मंडळी करीत असल्याचा आरोप मराठा क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांनी यावेळी ठाण्यात केला.

ठळक मुद्दे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा आरोप राज्यभर मराठा जोडो अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मराठा आणि बहुजन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न काही नेते मंडळी करीत असल्याचा आरोप मराठा क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांनी ठाण्यात केला. राजकीय नेत्यांमुळेच दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने राज्यभर मराठा जोडो अभियान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई येथून सुरू झालेल्या रॅलीची रविवारी ठाण्यातील माजीवडा पुलाच्या खाली सांगता झाली.मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने न्यायालयात योग्य भूमिका न बजावल्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत निर्णय होऊ शकला नाही . या साठी सकल मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने मराठा जोडो अभियानाची सुरु वात रविवारपासून करण्यात आली आहे. मुंबईमधून सुरू झालेल्या या रॅलीची सांगता रविवारी ठाण्यात झाली. माजीवडा येथील उड्डाणपूलाच्या खाली मुंबईमधील क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांचे स्वागत ठाण्यातील समन्वयकानी केले. या वेळी शिवाजी महराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मराठा आरक्षण लागू नसताना सरकारने जी नोकर भरती करण्याचे ठरवले आहे .ते चुकीचं आहे. ज्या राजकीय नेत्यांना त्यांच्याच समाजातही किंमत नाही, ते नेते मराठा आणि बहुजन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होत आहे, असल्याचा आरोप मराठा मोर्चाचे मुंबई समन्वयक रवींद्र पवार यांनी केला.या वेळी सरकारमधील मंत्री आणि सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. भविष्यात समन्वयकांची दुसरी टीम मुंबईहून दहिसरच्या दिशेने तर इतर टीम कल्याणच्या बाजूने जाईल आणि जनजागृती करण्यात येईल, असे मोर्चाचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा