शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण तापले, एकनाथ शिंदे-कपिल पाटील यांच्यातच प्रतिष्ठेची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:49 IST

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे ठाणे विभागीय अध्यक्ष खासदार कपील पाटील यांच्यातच प्रतिष्ठेची लढाई सुरू

भिवंडी : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे ठाणे विभागीय अध्यक्ष खासदार कपील पाटील यांच्यातच प्रतिष्ठेची लढाई सुरू असल्याने भिवंडीतील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणधुमाळीत रंग भरला आहे. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा भिवंडीत घेण्यासाठी भाजपा नेत्यांनी हालचाली सुरू केल्या असून त्यातून वातावरण तापवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून प्रतिष्ठेचा मुद्दा ठरला आहे.भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी विचित्र पध्दतीने आघाडी-युती झाल्याने कार्यकर्ते व पदाधिकाºयांत संभ्रम आहे. भिवंडीत जिल्हा परिषदेचे २१ गट असल्याने अध्यक्षपद भिवंडीकडे असावे, यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व आरपीआय सेक्युलर या राजकीय पक्षांबरोबर महाआघाडी करून भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत. शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्याने खासदार कपील पाटील यांच्यासह भाजपासोबत असलेली श्रमजीवी, रिपब्लिकन पक्ष यांना धक्का बसला आहे. भाजपाच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर शिवसेनेने शनिवारी शाखेत विशेष बैठक घेऊन व्यूहरचना सुरू केली. भाजपानेही सहकारी पक्षांसोबत राजकीय डावपेच मांडले. त्यामुळे तालुक्यातील शिवसेना विरूध्द भाजपाची लढत जोरदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.शिवसेना जिल्हा परिषदेच्या २१ पैकी १८ व पंचायत समितीसाठी ४२ पैकी ३६ जागा लढवित आहे. भाजपा २१ पैकी १९ गट, पंचायत समितीचे ४२ पैकी ३८ गण, काँग्रेस नऊ गट आणि २८ गण, राष्ट्रवादी काँग्रेस तीन गट आणि दोन गण तर मनसे सहा गट आणि १३ गण लढवित आहे. मनसेशी कुणाशीही युती झाली नसल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष देवराज म्हात्रे यांनी दिली. या निवडणुकीत भाजपाविरोधात काही ठिकाणी छुपी तर काही ठिकाणी उघडपणे युती-आघाडी झाली आहे. सोमवारच्या अर्ज माघारीनंतर त्याचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.काँग्रेसने केवळ राष्ट्रवादीशी आघाडी केल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे ग्रामीण विभागीय अध्यक्ष सुरेश टावरे यांनी दिली. २२ वर्षे काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समितीत खाते उघडले नव्हते. मागील पंचायत समितीत केवळ मोतीराम चोरघे हे सदस्य निवडून आले होते. परंतु या वेळी काँग्रेसकडून तिकीट मागण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक असल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष इरफान भुरे यांनी पक्ष जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीच्या दोन जागा लढवित असून शिवसेनेबरोबर युती झाल्याचे सांगितले.शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व तालुका प्रमुख विश्वास थळे यांनी या निवडणुकीत पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व आरपीआय सेक्युलर यांच्याशी आघाडी केल्याचे सांगितले. राष्ट्रवादीसाठी कवाड, खारबाव, महापोली हे जिल्हा परिषद गट व म्हापोली, पायगाव व खोणी हे पंचायत समितीचे गट सोडले आहेत, तर मनसेसाठी पडघ्याचा गण, आरपीआय सेक्युलरसाठी शेलार गण सोडल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना