शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये चार हजार पूरग्रस्तांना मदत; सात हजांरापेक्षा अधिक घरांचा पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 00:34 IST

पूरग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदतीचा हात मिळण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला

उल्हासनगर : वालधुनी नदीच्या महापुराचा फटका बसलेल्या सात हजारापेक्षा जास्त घरांची तहसील कार्यालयाकडून पाहणी व पंचनामा करण्यात आला होता. पूरग्रस्त नागरिकांना तहसील कार्यालयाकडून रोख स्वरूपात ५ हजार तर १० हजार रूपये बँक खात्यात जमा केली जाणार असून आतापर्यंत चार हजारापेक्षा जास्त नागरिकांना मदत दिल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार वाकोडे यांनी दिली.

वालधुनी नदीच्या पुराचा फटका बसलेल्यांना सरकारची मदत मिळावी अशी मागणी झाल्यावर तहसील कार्यालयामार्फत तब्बल ७ हजारापेक्षा जास्त घरांचा पंचनामा करण्यात आला. तहसीलदार वाकोडे यांनी पाच पथकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत पंचनामा केलेल्या नागरिकांना पाच हजार रोख स्वरूपात तर १० हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

तसेच इतर पंचनामा केलेल्या पूरग्रस्तांना मदतीचे वाटप सुरू राहणार असल्याचे वाकोडे यांनी सांगितले. तर दुसरीकडे पुराचा फटका बसूनही घराची पाहणी व पंचनामा झालेला नाही, अशा नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे मदतीसाठी अर्ज केले आहे. त्यांच्या अर्जाचाही सरकारला विचार करावा लागणार आहे.

उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा फटका २५ जुलै रोजी समतानगर, सम्राट अशोकनगर, आशीर्वाद व रेणुका सोसायटी, पंचशीलनगर, मातोश्री मीनाताई ठाकरेनगर, प्रबुध्दनगर, करोतियानगर, हिराघाट, स्मशानभूमी परिसरातील हजारो नागरिकांना बसला. अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य, शैक्षणिक साहित्य वाहून अथवा खराब झाले होते. सामाजिक संघटनेसह शिवसेना, इतर पक्षांनी पूरग्रस्तांना अन्नधान्यासह कपडयाचे वाटप केले. तसेच आरोग्य शिबिर घेऊन तपासणी केली होती.

अनेक घरांचा पंचनामा झालेला नाहीपूरग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदतीचा हात मिळण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. तहसील कार्यालयाने याची दखल घेत पूरग्रस्त घरांची पाहणी व पंचनामा करत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. त्यानुसार पूरग्रस्त नागरिकांना मदत दिली जात आहे. मात्र आजही अनेक पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा झालेला नाही. अशांना मदत मिळावी असी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. वंचित राहिलेल्या शेकडो नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेऊन मदतीसाठी अर्ज केले आहेत.

टॅग्स :thaneठाणेfloodपूर