शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

उल्हासनगरमध्ये चार हजार पूरग्रस्तांना मदत; सात हजांरापेक्षा अधिक घरांचा पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 00:34 IST

पूरग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदतीचा हात मिळण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला

उल्हासनगर : वालधुनी नदीच्या महापुराचा फटका बसलेल्या सात हजारापेक्षा जास्त घरांची तहसील कार्यालयाकडून पाहणी व पंचनामा करण्यात आला होता. पूरग्रस्त नागरिकांना तहसील कार्यालयाकडून रोख स्वरूपात ५ हजार तर १० हजार रूपये बँक खात्यात जमा केली जाणार असून आतापर्यंत चार हजारापेक्षा जास्त नागरिकांना मदत दिल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार वाकोडे यांनी दिली.

वालधुनी नदीच्या पुराचा फटका बसलेल्यांना सरकारची मदत मिळावी अशी मागणी झाल्यावर तहसील कार्यालयामार्फत तब्बल ७ हजारापेक्षा जास्त घरांचा पंचनामा करण्यात आला. तहसीलदार वाकोडे यांनी पाच पथकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत पंचनामा केलेल्या नागरिकांना पाच हजार रोख स्वरूपात तर १० हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

तसेच इतर पंचनामा केलेल्या पूरग्रस्तांना मदतीचे वाटप सुरू राहणार असल्याचे वाकोडे यांनी सांगितले. तर दुसरीकडे पुराचा फटका बसूनही घराची पाहणी व पंचनामा झालेला नाही, अशा नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे मदतीसाठी अर्ज केले आहे. त्यांच्या अर्जाचाही सरकारला विचार करावा लागणार आहे.

उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा फटका २५ जुलै रोजी समतानगर, सम्राट अशोकनगर, आशीर्वाद व रेणुका सोसायटी, पंचशीलनगर, मातोश्री मीनाताई ठाकरेनगर, प्रबुध्दनगर, करोतियानगर, हिराघाट, स्मशानभूमी परिसरातील हजारो नागरिकांना बसला. अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य, शैक्षणिक साहित्य वाहून अथवा खराब झाले होते. सामाजिक संघटनेसह शिवसेना, इतर पक्षांनी पूरग्रस्तांना अन्नधान्यासह कपडयाचे वाटप केले. तसेच आरोग्य शिबिर घेऊन तपासणी केली होती.

अनेक घरांचा पंचनामा झालेला नाहीपूरग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदतीचा हात मिळण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. तहसील कार्यालयाने याची दखल घेत पूरग्रस्त घरांची पाहणी व पंचनामा करत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. त्यानुसार पूरग्रस्त नागरिकांना मदत दिली जात आहे. मात्र आजही अनेक पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा झालेला नाही. अशांना मदत मिळावी असी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. वंचित राहिलेल्या शेकडो नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेऊन मदतीसाठी अर्ज केले आहेत.

टॅग्स :thaneठाणेfloodपूर