शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

संमेलनाचा निधी लटकला

By admin | Updated: February 22, 2017 06:27 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊन १५ दिवस उलटले तरी संमेलनासाठी निधी देण्याचे कबूल

जान्हवी मोर्ये / डोंबिवलीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊन १५ दिवस उलटले तरी संमेलनासाठी निधी देण्याचे कबूल करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अजूनही आयोजक संस्था आगरी यूथ फोरमला निधीचा धनादेश दिलेला नाही. निधी मिळावा, यासाठी फोरमचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधींचे उंबरे झिझवत आहेत. मात्र, मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेचा त्यात अडसर येत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर तरी हा निधी मिळणार की नाही, याविषयी फोरम साशंक आहे. साहित्य संमेलनासाठी आर्थिक सहकार्य म्हणून आमदार निधीतील काही निधी मिळावा, यासाठी फोरमने राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांशी पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी १२ आमदारांनी निधी देण्याची तयारी दर्शविली होती. प्रत्येक आमदार किमान पाच लाख रुपये देणार होते. मात्र, संमेलनाच्या नियोजित तारखेच्या वेळीच महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. त्यामुळे हा निधी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकला. पण आता हा निधी मिळावा, यासाठी फोरम त्यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. १२ आमदारांचे जवळपास ६० लाख रुपये फोरमला मिळणे अद्याप बाकी आहेत. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिकेने संमेलनासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. परंतु, संमेलनाच्या आधी महापालिकेने २५ लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फोरमकडे सुपूर्द केला होता. उर्वरित २५ लाखांचा निधी मिळलेला नाही. या निधीलाही कोकण शिक्षक आमदार मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला. महापालिकांचे मतदान बुधवारी झाले. २३ तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. त्यानंतर अपेक्षित ८५ लाखांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आचारसंहिता संपल्यावरही हा निधी वेळेत मिळेल का, याविषयी फोरम साशंक आहे. संमेलनासाठी एक कोटी ५८ लाख रुपयांचा निधी जमा झाल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, अपेक्षित निधी धरून ही रक्कम होती की नाही, याविषयी त्यांनी काहीच स्पष्ट केलेले नव्हते. संमेलनासाठी उभारेलल्या पु. भा. भावे नगरीसाठी एक कोटी १३ लाख रुपये खर्च आला. संमेलनाचा ताळेबंद ५ मार्चपर्यंत सादर केला जाणार आहे. अपेक्षित निधी हाती न फोरमने आल्याने खर्च कसा फेडला, हा प्रश्नही अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे संमेलन संपल्यावरही संमेलनाच्या निधीचा प्रश्न अद्याप गाजतच आहे. संमेलनाचा खर्चात नेमकी कुठे व कशी काटकसर केली, हे फोरमने महामंडळास ताळेबंद सादर केल्यावरच स्पष्ट होईल. दरम्यान, आमदार त्यांचा शब्द पाळतात की नाही, याकडे आयोजकांसह महामंडळाचे लक्ष लागले आहे.मराठी भाषा दिन साजरा करणारआगरी युथ फोरमने नवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर आता २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. या दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा अद्याप ठरलेली नाही. असे असले तरी दर्जेदार कार्यक्रम केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. च्सर्वसाधारणपणे संमेलन झाल्यानंतर आयोजक संस्थेकडून उपक्रम राबवणे शिथिल होते. मात्र, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी केवळ एक संमेलन घेऊन आगरी युथ फोरम थांबणार नाही, अशी ग्वाही दिली होती. दुसरीकडे, आयोजन समितीने साहित्य, संस्कृती आणि भाषासंवर्धनाचे कार्य सुरू ठेवावे. त्यासाठी पोषक कार्यक्रम घ्यावेत, असा सल्ला साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी दिला होता.  २७ फेब्रुवारी हा कविवर्य वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन आगरी युथ फोरमने उत्साहात साजरा करण्याचे ठरवले आहे. त्याची रूपरेषा लवकर ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ताळेबंद ५ मार्चपर्यंत देणारसाहित्य संमेलनाच्या खर्चाचे लेखापरीक्षण सुरू आहे. किती खर्च झाला, किती पैसे जमा झाले, याचा लेखाजोखा सुरू आहे. येत्या ५ मार्चपर्यंत साहित्य संमेलनाच्या खर्चाचा तपशील साहित्य महामंडळास सादर केला जाणार आहे. च्साहित्यिकांना दिलेले मानधन, त्यांचा प्रवास खर्च याचाही हिशेब सुरू असून चारपाच साहित्यिकांचे धनादेश देणे बाकी आहे. ते लवकरच दिले जातील. किती साहित्यिकांनी प्रवास खर्च व मानधन नाकारले, याची माहिती काढण्यात येत आहे, असे आयोजन समितीने स्पष्ट केले.