शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेला गुंड आशीष गुप्ता पुन्हा एकदा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 22:17 IST

ठाणे रेल्वे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून हद्दपार केलेला आशीष बाकेलाल गुप्ता (20) या आरोपीला कोपरी पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले

ठाणे, दि. 6 - ठाणे रेल्वे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून हद्दपार केलेला आशीष बाकेलाल गुप्ता (20) या आरोपीला कोपरी पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. ठाणे जिल्ह्यात येण्याची त्याला मनाई असताना कोपरीतील सिद्धार्थनगर भागात फिरताना त्याला जेरबंद करण्यात आले.त्याच्याविरुद्ध ठाणे, कल्याण या रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाइल चोरी आणि प्रवाशांच्या जिवाला धोका पोहोचवणे, अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. कोपरी पोलीस ठाण्यातही खुनाच्या प्रयत्नासह हाणामारी आणि चोरीच्या गुन्ह्यांची नोंद त्याच्याविरुद्ध आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय पोलीस उपायुक्त समाधान पवार यांनी 24 जुलै 2017 रोजी मुंबईसह चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते.मात्र, या आदेशाला धाब्यावर बसवून तो कोपरी परिसरात बिनधास्तपणे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कोर्डे, निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या पथकातील उपनिरीक्षक अशोक सावंत, जमादार राजा पाटील, हवालदार दत्ता पालांडे आणि तुकाराम डुंबरे यांच्या पथकाने 5 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कोपरीतील महापालिका रुग्णालयासमोरून अटक केली. त्याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती कोर्डे यांनी दिली. ‘‘आशीष गुप्ता याने रेल्वेत प्रवाशांचे मोबाइल चोरण्याबरोबरच प्रवाशांच्या जीवाला धोका पोहोचेल, अशी कृत्ये केली होती. त्यामुळेच त्याला मुंबई, ठाण्यातून हद्दपार केले होते. त्याच्याविरुद्ध रेल्वेसह कोपरीतही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.’’उत्तम सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस, ठाणे