शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

पाणीकपातीच्या वेळापत्रकाची प्राधिकरणाकडून ऐशीतैशी; बदलापूरकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:17 IST

भोंगळ कारभारामुळे संतापाचे वातावरण

बदलापूर : गेल्या सहा महिन्यांपासून निमूटपणे पाणीकपात सहन करणाऱ्या बदलापूर शहरातील नागरिकांना आता जीवन प्राधिकरणाच्या बेशिस्त कारभाराचा फटका बसत आहे. पाणीकपातीचे वेळापत्रक पाळले जात नसल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.बदलापूर आणि अंबरनाथमध्ये जानेवारीपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यात मार्च महिन्यानंतर जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने कूपनलिका आटल्या आहेत. अशावेळी नागरिकांना फक्त जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा केल्या जाणाºया पाण्यावरच अवलंबून रहावे लागते.मार्च अणि एप्रिल महिन्यात पाणीटंचाईमुळे जीवन प्राधिकरणाने आपले पाण्याचे वेळापत्रक बदलले होते. शहरातील क्षेत्रफळाचे चार भागात विभाजन करून सोमवार आणि शुक्र वारी १५-१५ तासांची पाणीकपात लागू केली होती. त्याचवेळी आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या अतिरिक्त ३ दशलक्ष लिटर पाण्याला मंजुरी मिळाल्याने पाणीकपातीत दिलासा मिळाला होता. मात्र पाऊस लांबल्याने सहा महिन्यांपासून सुरू असलेली पाणी कपात सुरूच आहे. त्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बेशिस्त कारभाराचा फटका आता नागरिकांना बसत असल्याने पाणीकपातीत भर पडत आहे.बदलापूरमधील वीज वितरण व्यवस्था खिळखिळी झाल्याचे सातत्याने समोर येत आहे. भोंगळ कारभाराने ग्राहक त्रस्त झाले आहेत.दहा दिवसांपासून दररोज मध्यरात्री खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. मध्यरात्री तासनतास अंधारात काढावे लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रिमझिम पावसातच ही अवस्था असेल तर चार महिने काय होणार, असा सवाल उपस्थित करत महावितरणच्या अभियंत्यांची उचलबांगडी करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.विजेच्या समस्येत वाढबदलापूरमध्ये यावर्षी विजेची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बदलापूर पश्चिमेतील जवळपास दीड लाख लोकसंख्येला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. बदलापूर पश्चिमेतील बेलवली, मांजर्ली, वडवली, वालीवली, हेंद्रे्रपाडा, बाजारपेठ, रमेशवाडी, सोनिवली आणि बदलापूर गावाला महावितरणच्या भोंगळ कारभाराचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई