शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पाणीकपातीच्या वेळापत्रकाची प्राधिकरणाकडून ऐशीतैशी; बदलापूरकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:17 IST

भोंगळ कारभारामुळे संतापाचे वातावरण

बदलापूर : गेल्या सहा महिन्यांपासून निमूटपणे पाणीकपात सहन करणाऱ्या बदलापूर शहरातील नागरिकांना आता जीवन प्राधिकरणाच्या बेशिस्त कारभाराचा फटका बसत आहे. पाणीकपातीचे वेळापत्रक पाळले जात नसल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.बदलापूर आणि अंबरनाथमध्ये जानेवारीपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यात मार्च महिन्यानंतर जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने कूपनलिका आटल्या आहेत. अशावेळी नागरिकांना फक्त जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा केल्या जाणाºया पाण्यावरच अवलंबून रहावे लागते.मार्च अणि एप्रिल महिन्यात पाणीटंचाईमुळे जीवन प्राधिकरणाने आपले पाण्याचे वेळापत्रक बदलले होते. शहरातील क्षेत्रफळाचे चार भागात विभाजन करून सोमवार आणि शुक्र वारी १५-१५ तासांची पाणीकपात लागू केली होती. त्याचवेळी आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या अतिरिक्त ३ दशलक्ष लिटर पाण्याला मंजुरी मिळाल्याने पाणीकपातीत दिलासा मिळाला होता. मात्र पाऊस लांबल्याने सहा महिन्यांपासून सुरू असलेली पाणी कपात सुरूच आहे. त्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बेशिस्त कारभाराचा फटका आता नागरिकांना बसत असल्याने पाणीकपातीत भर पडत आहे.बदलापूरमधील वीज वितरण व्यवस्था खिळखिळी झाल्याचे सातत्याने समोर येत आहे. भोंगळ कारभाराने ग्राहक त्रस्त झाले आहेत.दहा दिवसांपासून दररोज मध्यरात्री खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. मध्यरात्री तासनतास अंधारात काढावे लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रिमझिम पावसातच ही अवस्था असेल तर चार महिने काय होणार, असा सवाल उपस्थित करत महावितरणच्या अभियंत्यांची उचलबांगडी करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.विजेच्या समस्येत वाढबदलापूरमध्ये यावर्षी विजेची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बदलापूर पश्चिमेतील जवळपास दीड लाख लोकसंख्येला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. बदलापूर पश्चिमेतील बेलवली, मांजर्ली, वडवली, वालीवली, हेंद्रे्रपाडा, बाजारपेठ, रमेशवाडी, सोनिवली आणि बदलापूर गावाला महावितरणच्या भोंगळ कारभाराचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई