शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उल्हासनगर महापालिकेच्या कृत्रिम तलावात तब्बल १३ हजार ८०६ बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन

By सदानंद नाईक | Updated: September 29, 2023 18:00 IST

आयुक्त अजीज शेख यांचा जागता पाहारा

सदानंद नाईक, उल्हासनगर: पर्यावरणापूरक बाप्पाचे विसर्जन होण्यासाठी महापालिकेने विविध भागात एकून ७ कृत्रिम तलावाची निर्मिती केली. नागरिकांनी आयुक्त अजीज शेख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल १३ हजार ८०६ बाप्पांचे विसर्जन कृत्रिम तलावात झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.

 उल्हासनगर महापालिकेने गणेश भक्तांच्या सोयीसाठी व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी शहरातील विविध भागात बाप्पांच्या विसर्जनासाठी ७ कृत्रिम तलावाची निर्मिती केली. तसेच नदी, नाले, तलाव, विहीर आदी नैसर्गिक स्त्रोतात बाप्पांचे विसर्जन करण्या ऐवजी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी गणेशभक्त व नागरिकांना केले होते. नागरिकांनी आयुकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, शहरातील आयडीआय कंपनी, सेंच्युरी क्लब, हिराघाट बोट क्लब, संजय गांधी नगर रेल्वे स्टेशन, जिजामाता उद्यान, लाल चक्की चौक, कैलास कॉलनी चौक या ७ कृत्रिम तलावात एकून १३ हजार ८०६ बाप्पांचे विसर्जन मध्यरात्री पर्यंत झाले आहे.

 महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी जागता पहारा ठेवत, सर्वच कृत्रिम तलावाची सकाळ पर्यंत पाहणी केली. कृत्रिम तलाव परिसरात स्वच्छता, रस्त्यांची व्यवस्था, सुरक्षितता, निर्माल्य व्यवस्था, विद्युत व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी चहा, पाणी व अल्पोपहार आदींची महापालिकेकडून व्यवस्था करण्यात आली होती. आयुक्तांबरोबर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव, सहायक आयुक्त गणेश शिंपी, अनिल खतुरानी, दत्तात्रय जाधव, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे व इतर कर्मचारीही उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर