शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

उल्हासनगर महापालिकेच्या कृत्रिम तलावात तब्बल १३ हजार ८०६ बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन

By सदानंद नाईक | Updated: September 29, 2023 18:00 IST

आयुक्त अजीज शेख यांचा जागता पाहारा

सदानंद नाईक, उल्हासनगर: पर्यावरणापूरक बाप्पाचे विसर्जन होण्यासाठी महापालिकेने विविध भागात एकून ७ कृत्रिम तलावाची निर्मिती केली. नागरिकांनी आयुक्त अजीज शेख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल १३ हजार ८०६ बाप्पांचे विसर्जन कृत्रिम तलावात झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.

 उल्हासनगर महापालिकेने गणेश भक्तांच्या सोयीसाठी व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी शहरातील विविध भागात बाप्पांच्या विसर्जनासाठी ७ कृत्रिम तलावाची निर्मिती केली. तसेच नदी, नाले, तलाव, विहीर आदी नैसर्गिक स्त्रोतात बाप्पांचे विसर्जन करण्या ऐवजी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी गणेशभक्त व नागरिकांना केले होते. नागरिकांनी आयुकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, शहरातील आयडीआय कंपनी, सेंच्युरी क्लब, हिराघाट बोट क्लब, संजय गांधी नगर रेल्वे स्टेशन, जिजामाता उद्यान, लाल चक्की चौक, कैलास कॉलनी चौक या ७ कृत्रिम तलावात एकून १३ हजार ८०६ बाप्पांचे विसर्जन मध्यरात्री पर्यंत झाले आहे.

 महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी जागता पहारा ठेवत, सर्वच कृत्रिम तलावाची सकाळ पर्यंत पाहणी केली. कृत्रिम तलाव परिसरात स्वच्छता, रस्त्यांची व्यवस्था, सुरक्षितता, निर्माल्य व्यवस्था, विद्युत व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी चहा, पाणी व अल्पोपहार आदींची महापालिकेकडून व्यवस्था करण्यात आली होती. आयुक्तांबरोबर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव, सहायक आयुक्त गणेश शिंपी, अनिल खतुरानी, दत्तात्रय जाधव, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे व इतर कर्मचारीही उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर