शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कट्ट्याच्या पुनर्उभारणीसाठी कलाकारांचे मदतीचे आवाहन, रवी जाधव, विजू माने, अभिजित पानसे, मंगेश देसार्इंसह कलाकारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:10 IST

शेकडो कलाकार घडवून ठाण्यात सांस्कृतिक चळवळ उभी केलेल्या अभिनय कट्ट्याची २९ आॅगस्टच्या पावसात वाताहत झाली. कट्टा सावरण्याच्या, उभा करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी ठाण्यातील काही मराठी कलाकार कट्ट्यावर एकत्र आले.

ठाणे : शेकडो कलाकार घडवून ठाण्यात सांस्कृतिक चळवळ उभी केलेल्या अभिनय कट्ट्याची २९ आॅगस्टच्या पावसात वाताहत झाली. कट्टा सावरण्याच्या, उभा करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी ठाण्यातील काही मराठी कलाकार कट्ट्यावर एकत्र आले. कट्ट्याची अवस्था पाहिल्यावर सुन्न झालेल्या कलाकारांनी स्वत: मदत करण्याचे आश्वासन देऊन उपस्थितांना शक्य ती मदत करण्याचे आवाहन केले.जिजामाता उद्यान येथे भरणाºया अभिनय कट्ट्याचे तुफान पावसात प्रचंड नुकसान झाले. नेपथ्य, ध्वनियंत्रणा, आसनव्यवस्था, पुस्तके आणि कार्यालयातील संगणक व इतर वस्तूंचे नुकसान झाले. परिणामी, या आठवड्यात कट्ट्यावर सादरीकरण होऊ शकले नाही. या कट्ट्याला शुक्रवारी प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव, विजू माने, निर्माते अभिजित पानसे, अभिनेते मंगेश देसाई, उदय सबनीस, टॅग संस्थेच्या सोनाली लोहार, वासंती वर्तक, शशी करंदीकर आदी कलाकारांनी भेट दिली. कट्ट्याचे सर्वेसर्वा किरण नाकतीही उपस्थित होते. या वेळी कलाकारांनी कट्ट्यावर उपस्थित प्रेक्षकांना कट्ट्याला मदत करण्याचे आवाहन केले. गेली २२ वर्षे आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाकती हे स्वत: नवोदित कलावंतांना घडवण्यासाठी मेहनत घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कट्ट्याने दिव्यांग मुलांसाठीही वर्ग सुरू केले आहेत. अशी ही सांस्कृतिक चळवळ संपू नये, यासाठी ठाणेकरांनी मदत करावी, असे आवाहन पानसे यांनी या वेळी केले. ठाणे महापालिकेनेही कट्ट्याच्या पुनर्उभारणीस मदत करावी. महापालिकेने अभिनय कट्ट्याच्या जागेत कलाभवनच्या धर्तीवर वास्तू उभारावी, अशी सूचनाही त्यांनी केली. सामान्य माणसांनी सामान्य माणसांच्या मदतीने उभी केलेली चळवळ पुढे नेण्यासाठी ठाणेकरांनी पुढे यावे, असे आवाहन सबनीस यांनी केले. या वेळी उपस्थित कलाकारांनी मदत करण्याचे, तर कोणी पुस्तके देण्याचे आश्वासन दिले.