शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

कलागोष्ट : भूल देणारी कला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 05:01 IST

विजयराज बोधनकरआज माणसाला नवा विचार ऐकायला आणि वाचायलासुद्धा वेळ नाही. मग याला नवं युग म्हणायचं तरी कसं? स्वत:चा विचार करायलासुद्धा वेळ नाही म्हटल्यावर आजचा माणूस करतो तरी काय? तर आजचा माणूस उत्पादने घेत सुटलाय आणि नवं जग त्या उत्पादनांच्या गराड्यात, वस्तूंच्या गराड्यात अडकत चाललं आहे. कळपाचं धैर्य नेहमीच हत्तीच्या ताकतीच ...

विजयराज बोधनकर

आज माणसाला नवा विचार ऐकायला आणि वाचायलासुद्धा वेळ नाही. मग याला नवं युग म्हणायचं तरी कसं? स्वत:चा विचार करायलासुद्धा वेळ नाही म्हटल्यावर आजचा माणूस करतो तरी काय? तर आजचा माणूस उत्पादने घेत सुटलाय आणि नवं जग त्या उत्पादनांच्या गराड्यात, वस्तूंच्या गराड्यात अडकत चाललं आहे. कळपाचं धैर्य नेहमीच हत्तीच्या ताकतीच असतं. हे आपण टीव्हीवरील वेगवेगळ्या वाहिन्यांवर बघतो. समविचारी फक्त हजार माणसं एकत्रित आलेत आणि त्यांनी ठरवलं की, जगाला फसवायचं तर ते सहज जगाला फसवू शकतात. त्यांनी ठरवलं की, जगाला हसवायचं तर ते हसवू शकतातं. एकत्रितपणाची ही ताकद आहे. त्याचा रेझोनन्स ताकतीचा असतो. एकत्रित विचारांनी एकत्र येणं ही एक कला आहे. मोठमोठ्या उत्पादनशील कंपन्या एकत्रित असल्यामुळेच जग त्यांच्या मुठीत असतं आणि मग ते प्रत्येक एकट्या माणसांवर राज्य करीत सुटतात.

राजकीय पक्षसुद्धा एकत्रित विचारांच्या स्पंदनांनी चार्ज होतात आणि जग मुठीत घेतात, राज्य करतात. एकत्र येण्यासाठी एक उद्देश हवा असतो. उद्देशात एक स्वार्थही लपलेला असतो. स्वार्थात दिवास्वप्न लपलेले असतात, स्वप्नपूर्ती की प्रत्येकाची सुह्यइच्छा असते. स्वार्थ हे असे सॉफ्टवेअर आहे जे हार्डवेअरला हॅण्डल करते, पण ते सॉफ्टवेअर कधीच दिसत नाही. असंच एक अजून सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे जाहिरात कंपन्या. कुठल्याही उत्पादनाला चकचकीत कपडे घालून, घेणाऱ्याला भूल देणारी ही कंपनी असते. चिंध्या पांघरून सोनं विकत बसलो कुणी घेईना, मात्र सोनं पांघरून चिंध्या विकत बसलो तर चिंध्याही लोकांनी विकत घेतल्या, ही रचना गायधनी नावाच्या कवीने जगापुढे मांडली. याच व्याख्येत जाहिरात कंपनी अगदी चपखल बसते. जाहिरात क्षेत्र हे भूलभुलैयाचं क्षेत्र आहे. आपण आज कुठलंही प्रॉडक्ट जाहिरात बघितल्याशिवाय घेत नाही. जाहिरात ही पासष्टावी कला मानली गेली. तिथे चतुर व अत्यंत जागृत माणसे असतात. जगात काय चालू आहे, या वर्तमानाची त्यांना खडान्खडा माहिती असते. समाजमनाचं मानसशास्त्र याचे ते अभ्यासक असतात. भावनेच्या आहारी जाणाºया चंचल मनाला ते नेहमी जाळ्यात ओढतात आणि ते जाळं असतं कलेचं. टर्मरिक क्रीम लावून जसं कुणी आजपर्यंत उजळलं नाही, गोरं झालं नाही. तरी जग आजही त्या क्रीम वापरते आहे. आज रोज नवे कलात्मक प्रॉडक्ट बाजारात येतात आणि त्याची विक्री जाहिरातीच्या माध्यमातून जोरात होते. कारणं ते प्रॉडक्ट खरंच त्या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणेच आहे का, याची खात्री करून घ्यायलाच आपल्याकडे वेळ नाही आणि हाच त्यांच्यासाठी मुख्य मुद्दा आहे. समाजाचं मानसशास्त्र अभ्यासून त्याला सोन्याची झूल घालून तो अभ्यास जगाला मुठीत करून घेण्यासाठी फायद्याचा ठरतो आणि नेमकी ही पासष्टावी कला त्यावर जगते आहे. आजची ती सर्वात प्रभावी कला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.  

टॅग्स :thaneठाणे