शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
4
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
5
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
6
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
7
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
8
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
9
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
10
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
11
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
12
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
13
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
14
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
15
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
16
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
17
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
18
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
19
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
20
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश

कलागोष्ट : भूल देणारी कला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 05:01 IST

विजयराज बोधनकरआज माणसाला नवा विचार ऐकायला आणि वाचायलासुद्धा वेळ नाही. मग याला नवं युग म्हणायचं तरी कसं? स्वत:चा विचार करायलासुद्धा वेळ नाही म्हटल्यावर आजचा माणूस करतो तरी काय? तर आजचा माणूस उत्पादने घेत सुटलाय आणि नवं जग त्या उत्पादनांच्या गराड्यात, वस्तूंच्या गराड्यात अडकत चाललं आहे. कळपाचं धैर्य नेहमीच हत्तीच्या ताकतीच ...

विजयराज बोधनकर

आज माणसाला नवा विचार ऐकायला आणि वाचायलासुद्धा वेळ नाही. मग याला नवं युग म्हणायचं तरी कसं? स्वत:चा विचार करायलासुद्धा वेळ नाही म्हटल्यावर आजचा माणूस करतो तरी काय? तर आजचा माणूस उत्पादने घेत सुटलाय आणि नवं जग त्या उत्पादनांच्या गराड्यात, वस्तूंच्या गराड्यात अडकत चाललं आहे. कळपाचं धैर्य नेहमीच हत्तीच्या ताकतीच असतं. हे आपण टीव्हीवरील वेगवेगळ्या वाहिन्यांवर बघतो. समविचारी फक्त हजार माणसं एकत्रित आलेत आणि त्यांनी ठरवलं की, जगाला फसवायचं तर ते सहज जगाला फसवू शकतात. त्यांनी ठरवलं की, जगाला हसवायचं तर ते हसवू शकतातं. एकत्रितपणाची ही ताकद आहे. त्याचा रेझोनन्स ताकतीचा असतो. एकत्रित विचारांनी एकत्र येणं ही एक कला आहे. मोठमोठ्या उत्पादनशील कंपन्या एकत्रित असल्यामुळेच जग त्यांच्या मुठीत असतं आणि मग ते प्रत्येक एकट्या माणसांवर राज्य करीत सुटतात.

राजकीय पक्षसुद्धा एकत्रित विचारांच्या स्पंदनांनी चार्ज होतात आणि जग मुठीत घेतात, राज्य करतात. एकत्र येण्यासाठी एक उद्देश हवा असतो. उद्देशात एक स्वार्थही लपलेला असतो. स्वार्थात दिवास्वप्न लपलेले असतात, स्वप्नपूर्ती की प्रत्येकाची सुह्यइच्छा असते. स्वार्थ हे असे सॉफ्टवेअर आहे जे हार्डवेअरला हॅण्डल करते, पण ते सॉफ्टवेअर कधीच दिसत नाही. असंच एक अजून सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे जाहिरात कंपन्या. कुठल्याही उत्पादनाला चकचकीत कपडे घालून, घेणाऱ्याला भूल देणारी ही कंपनी असते. चिंध्या पांघरून सोनं विकत बसलो कुणी घेईना, मात्र सोनं पांघरून चिंध्या विकत बसलो तर चिंध्याही लोकांनी विकत घेतल्या, ही रचना गायधनी नावाच्या कवीने जगापुढे मांडली. याच व्याख्येत जाहिरात कंपनी अगदी चपखल बसते. जाहिरात क्षेत्र हे भूलभुलैयाचं क्षेत्र आहे. आपण आज कुठलंही प्रॉडक्ट जाहिरात बघितल्याशिवाय घेत नाही. जाहिरात ही पासष्टावी कला मानली गेली. तिथे चतुर व अत्यंत जागृत माणसे असतात. जगात काय चालू आहे, या वर्तमानाची त्यांना खडान्खडा माहिती असते. समाजमनाचं मानसशास्त्र याचे ते अभ्यासक असतात. भावनेच्या आहारी जाणाºया चंचल मनाला ते नेहमी जाळ्यात ओढतात आणि ते जाळं असतं कलेचं. टर्मरिक क्रीम लावून जसं कुणी आजपर्यंत उजळलं नाही, गोरं झालं नाही. तरी जग आजही त्या क्रीम वापरते आहे. आज रोज नवे कलात्मक प्रॉडक्ट बाजारात येतात आणि त्याची विक्री जाहिरातीच्या माध्यमातून जोरात होते. कारणं ते प्रॉडक्ट खरंच त्या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणेच आहे का, याची खात्री करून घ्यायलाच आपल्याकडे वेळ नाही आणि हाच त्यांच्यासाठी मुख्य मुद्दा आहे. समाजाचं मानसशास्त्र अभ्यासून त्याला सोन्याची झूल घालून तो अभ्यास जगाला मुठीत करून घेण्यासाठी फायद्याचा ठरतो आणि नेमकी ही पासष्टावी कला त्यावर जगते आहे. आजची ती सर्वात प्रभावी कला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.  

टॅग्स :thaneठाणे