शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

कायदा कसाही मोडू शकतो याच हेतूने अटक; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

By अजित मांडके | Updated: November 12, 2022 18:00 IST

तुम्ही जेल काय फाशी दिली तरी चालेल असेही त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत दाखिवण्यात आलेल्या चुकीच्या विकृतीला विरोध केला होता म्हणूनच आमच्यावर कायद्याचा कोणत्याही प्रकारचा आधार न घेता, चुकीचे कलम लावून महाराष्ट्राला दाखविण्यासाठी आम्ही कायदा कसाही मोडतोड करु शकतो, फेकू शकतो हे उदाहरण सेट करण्यासाठीच ही अटक करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यात पोलिसांचा काहीही संबंध नव्हता, त्यांच्यावर केवळ दबाव होता, म्हणूनच त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण होत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार आणि त्यासाठी आम्हाला ३६५ दिवस जरी जेल मध्ये टाकले तरी त्याचे आम्ही स्वागत करु असे आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगत एक प्रकारे आव्हान दिले. त्यामुळे तुम्ही जेल काय फाशी दिली तरी चालेल असेही त्यांनी सांगितले.

विवियाना मॉल मधील हरहर महादेव चित्रपटाच्या वेळेस मारहाण प्रकरणी आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यांची शनिवारी जामीनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांना हा आरोप केला. कलम ४१ (ए) अन्वये पहिली नोटीस आल्यानंतर सांयकाळी 5 वाजेर्पयत चौकशीला हजर राहावे असे सांगण्यात आले होते. मात्र दोन वाजता नोटीस दिल्यानंतर अडीच वाजता अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता, अटक करण्यापूर्वी नियमानुसार ७२ तासाची संधी देणो अपेक्षित होते. त्यावेळेस माङो म्हणने मांडता आले असते, मात्र तसे न करता केवळ दबावापोटी अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यात शुक्रवारी अटक झाल्यानंतर कोर्टात हजर करता आले असते मात्र सांयकाळ र्पयत वेळ काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ जेलमध्ये कसे ठेवता येईल याची तजवीज करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.

हरहर महादेव या चित्रपटात कशा पध्दतीने चुकीचा इतिहास दाखविण्यात आला, याचा पुरावाच यावेळी त्यांनी सादर केला. या चित्रपटात बाजीप्रभु देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे दाखविण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाच आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चुकीचा इतिहासाला विरोध केला म्हणून जर आम्हाला अटक झाली असेल तर ती आम्हाला मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु चुकीचे कलम लावून आव्हाडांना अटक कशी करता येईल याचा प्रयत्न वरीष्ठ पातळीवर झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. इतिहासाचे विकृतीकरण होऊ नये यासाठी आम्ही हा विरोध केला होता, आणि विरोध करत राहू असेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी विरोध करायला हवा होता

ज्यांचा या चित्रपटात आवाज आहे, त्यांना स्क्रीप्ट माहित नसेल का? त्यांचे हृदय दुखावले नसले का? त्यात एवढे विकृतीकरण होत असतांना राज ठाकरे याच्यावर काहीच बोलत का नाही? असा सवाल त्यांनी केला. ते खुप हुशार आहेत, त्यामुळे त्यांनी अशा चित्रपटांना थांबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही माफी मागावी, तुमचा चित्रपटातील आवाज मागे घ्यावा, असे मी सांगणार नाही, मात्र एखादी चुकीची गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर होत असेल तर याला कुठेतरी विरोध झालाच पाहिजे असेही त्यांनी सांगितले. माराहाणीची तक्रार झाली, मात्र ज्याला मारहाण झाली त्यानेच या प्रकरणात आव्हाड यांचा संबध नसल्याचे सांगितले. तर मॉल चालकाने देखील कुठेही तक्रार केलेली नाही. परंतु मला कसे अडकावयचे यासाठीच प्रयत्न झाल्याचे दिसून आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड