शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कायदा कसाही मोडू शकतो याच हेतूने अटक; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

By अजित मांडके | Updated: November 12, 2022 18:00 IST

तुम्ही जेल काय फाशी दिली तरी चालेल असेही त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत दाखिवण्यात आलेल्या चुकीच्या विकृतीला विरोध केला होता म्हणूनच आमच्यावर कायद्याचा कोणत्याही प्रकारचा आधार न घेता, चुकीचे कलम लावून महाराष्ट्राला दाखविण्यासाठी आम्ही कायदा कसाही मोडतोड करु शकतो, फेकू शकतो हे उदाहरण सेट करण्यासाठीच ही अटक करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यात पोलिसांचा काहीही संबंध नव्हता, त्यांच्यावर केवळ दबाव होता, म्हणूनच त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण होत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार आणि त्यासाठी आम्हाला ३६५ दिवस जरी जेल मध्ये टाकले तरी त्याचे आम्ही स्वागत करु असे आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगत एक प्रकारे आव्हान दिले. त्यामुळे तुम्ही जेल काय फाशी दिली तरी चालेल असेही त्यांनी सांगितले.

विवियाना मॉल मधील हरहर महादेव चित्रपटाच्या वेळेस मारहाण प्रकरणी आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यांची शनिवारी जामीनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांना हा आरोप केला. कलम ४१ (ए) अन्वये पहिली नोटीस आल्यानंतर सांयकाळी 5 वाजेर्पयत चौकशीला हजर राहावे असे सांगण्यात आले होते. मात्र दोन वाजता नोटीस दिल्यानंतर अडीच वाजता अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता, अटक करण्यापूर्वी नियमानुसार ७२ तासाची संधी देणो अपेक्षित होते. त्यावेळेस माङो म्हणने मांडता आले असते, मात्र तसे न करता केवळ दबावापोटी अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यात शुक्रवारी अटक झाल्यानंतर कोर्टात हजर करता आले असते मात्र सांयकाळ र्पयत वेळ काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ जेलमध्ये कसे ठेवता येईल याची तजवीज करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.

हरहर महादेव या चित्रपटात कशा पध्दतीने चुकीचा इतिहास दाखविण्यात आला, याचा पुरावाच यावेळी त्यांनी सादर केला. या चित्रपटात बाजीप्रभु देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे दाखविण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाच आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चुकीचा इतिहासाला विरोध केला म्हणून जर आम्हाला अटक झाली असेल तर ती आम्हाला मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु चुकीचे कलम लावून आव्हाडांना अटक कशी करता येईल याचा प्रयत्न वरीष्ठ पातळीवर झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. इतिहासाचे विकृतीकरण होऊ नये यासाठी आम्ही हा विरोध केला होता, आणि विरोध करत राहू असेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी विरोध करायला हवा होता

ज्यांचा या चित्रपटात आवाज आहे, त्यांना स्क्रीप्ट माहित नसेल का? त्यांचे हृदय दुखावले नसले का? त्यात एवढे विकृतीकरण होत असतांना राज ठाकरे याच्यावर काहीच बोलत का नाही? असा सवाल त्यांनी केला. ते खुप हुशार आहेत, त्यामुळे त्यांनी अशा चित्रपटांना थांबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही माफी मागावी, तुमचा चित्रपटातील आवाज मागे घ्यावा, असे मी सांगणार नाही, मात्र एखादी चुकीची गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर होत असेल तर याला कुठेतरी विरोध झालाच पाहिजे असेही त्यांनी सांगितले. माराहाणीची तक्रार झाली, मात्र ज्याला मारहाण झाली त्यानेच या प्रकरणात आव्हाड यांचा संबध नसल्याचे सांगितले. तर मॉल चालकाने देखील कुठेही तक्रार केलेली नाही. परंतु मला कसे अडकावयचे यासाठीच प्रयत्न झाल्याचे दिसून आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड