शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

अर्नाळा किनाऱ्यावर होते रात्रभर बेकायदा रेती उत्खनन

By admin | Updated: February 15, 2016 02:54 IST

गेल्या अनेक वर्षांपासून रात्रीच्या वेळी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर रेतीचे बेकायदा उत्खनन केले जात असल्याने किनाऱ्यावर आता मोठाले खड्डे पडले आहेत.

शशी करपे , वसईगेल्या अनेक वर्षांपासून रात्रीच्या वेळी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर रेतीचे बेकायदा उत्खनन केले जात असल्याने किनाऱ्यावर आता मोठाले खड्डे पडले आहेत. तर समुद्राचा नैसर्गिक बंधारा नष्ट होऊ लागल्याने सुुरुची बागही धोक्यात आली आहे. बेकायदा उत्खनन वेळीच रोखले नाही तर नैसर्गिक बंधारा नष्ट होऊन पावसाळ्यात उधाणाचे पाणी गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.अर्नाळा समुद्रकिनारी रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत किमान शंभर मजूर बेकायदा रेती उत्खनन करतात. त्यानंतर ही रेती गाडीतून शहरात विकली जाते. या धंद्यात अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव झाला असून त्यांना महसूल आणि पोलीस यंत्रणेची साथ असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. बेकायदा रेती उत्खननामुळे समुद्रकिनारी मोठे खड्डे पडले आहेत. भरतीच्या वेळी हे खड्डे पाण्याखाली जातात. याचा अंदाज नसल्याने पर्यटक बुडण्याचे प्रकार वाढले आहेत. बेकायदा रेती उत्खननाने अर्नाळ्याचा समुद्रकिनारा आता धोकादायक बनला आहे. गेल्या दहा वर्षांत किमान तीसहून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. सध्या ग्रामपंचायतीने एक गार्ड कायमस्वरुपी तैनात ठेवला असून गार्ड आणि गावकरी पर्यटकांना वारंवार सूचना देऊन धोकादायक ठिकाणापासून दूर पोहण्याचा सल्ला देत असतात. पण, त्यानंतरही वर्षाला किमान दोन-तीन पर्यटक बुडून मरण पावत आहेत. दुसरीकडे, मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन होत असल्याने सुुरुची झाडे कोलमडून पडू लागली आहेत. रेतीमाफियांविरोधात गावकरी अधूनमधून कारवाई करीत असतात. रेती काढणारे मजूर आणि रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडून दिल्या जातात. पण, पोलीस आणि महसूल खात्याशी अर्थपूर्ण संंबंध असल्याने थातूरमातूर कारवाई करून सोडले जाते. मध्यंतरी रेतीमाफियांनी विरोध करणाऱ्या काही गावकऱ्यांवरच खोटे गुन्हे नोंदवून त्यांना अडचणीत आणण्याचे काम केले. उपसरपंच सतीश तांडेल यांच्याविरोधात रेती वाहतूक करणाऱ्या एका गाडीच्या ड्रायव्हरच्या पत्नीने विनयभंगाचा आरोप केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी तांडेल यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवला होता पण, ग्रामपंचायतीच्या प्रत्येक ग्रामसभेत रेती उत्खननाविरोधात ठराव केले जात आहेत. पण, त्यावर काहीच कारवाई होत नसल्याने गावकरी हताश झाले आहेत. ग्रामसभेच्या ठरावाची पोलीस, महसूल आणि जिल्हा परिषदेकडून दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. वसईत चोरीची रेती उत्खनन आणि वाहतूक होत नसल्याचा दावा महूसल खात्याकडून केला जात होता. पण, गेल्याच आठवड्यात रेती चोरीप्रकरणी दंडाची रक्कम कमी करण्यासाठी खानीवली येथील तलाठ्याला मुंबई अँटीकरप्शन विभागाने अटक करून महसूल खात्याल सणसणीत चपराक लगावली आहे.