शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

अर्नाळा किनाऱ्यावर होते रात्रभर बेकायदा रेती उत्खनन

By admin | Updated: February 15, 2016 02:54 IST

गेल्या अनेक वर्षांपासून रात्रीच्या वेळी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर रेतीचे बेकायदा उत्खनन केले जात असल्याने किनाऱ्यावर आता मोठाले खड्डे पडले आहेत.

शशी करपे , वसईगेल्या अनेक वर्षांपासून रात्रीच्या वेळी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर रेतीचे बेकायदा उत्खनन केले जात असल्याने किनाऱ्यावर आता मोठाले खड्डे पडले आहेत. तर समुद्राचा नैसर्गिक बंधारा नष्ट होऊ लागल्याने सुुरुची बागही धोक्यात आली आहे. बेकायदा उत्खनन वेळीच रोखले नाही तर नैसर्गिक बंधारा नष्ट होऊन पावसाळ्यात उधाणाचे पाणी गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.अर्नाळा समुद्रकिनारी रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत किमान शंभर मजूर बेकायदा रेती उत्खनन करतात. त्यानंतर ही रेती गाडीतून शहरात विकली जाते. या धंद्यात अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव झाला असून त्यांना महसूल आणि पोलीस यंत्रणेची साथ असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. बेकायदा रेती उत्खननामुळे समुद्रकिनारी मोठे खड्डे पडले आहेत. भरतीच्या वेळी हे खड्डे पाण्याखाली जातात. याचा अंदाज नसल्याने पर्यटक बुडण्याचे प्रकार वाढले आहेत. बेकायदा रेती उत्खननाने अर्नाळ्याचा समुद्रकिनारा आता धोकादायक बनला आहे. गेल्या दहा वर्षांत किमान तीसहून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. सध्या ग्रामपंचायतीने एक गार्ड कायमस्वरुपी तैनात ठेवला असून गार्ड आणि गावकरी पर्यटकांना वारंवार सूचना देऊन धोकादायक ठिकाणापासून दूर पोहण्याचा सल्ला देत असतात. पण, त्यानंतरही वर्षाला किमान दोन-तीन पर्यटक बुडून मरण पावत आहेत. दुसरीकडे, मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन होत असल्याने सुुरुची झाडे कोलमडून पडू लागली आहेत. रेतीमाफियांविरोधात गावकरी अधूनमधून कारवाई करीत असतात. रेती काढणारे मजूर आणि रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडून दिल्या जातात. पण, पोलीस आणि महसूल खात्याशी अर्थपूर्ण संंबंध असल्याने थातूरमातूर कारवाई करून सोडले जाते. मध्यंतरी रेतीमाफियांनी विरोध करणाऱ्या काही गावकऱ्यांवरच खोटे गुन्हे नोंदवून त्यांना अडचणीत आणण्याचे काम केले. उपसरपंच सतीश तांडेल यांच्याविरोधात रेती वाहतूक करणाऱ्या एका गाडीच्या ड्रायव्हरच्या पत्नीने विनयभंगाचा आरोप केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी तांडेल यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवला होता पण, ग्रामपंचायतीच्या प्रत्येक ग्रामसभेत रेती उत्खननाविरोधात ठराव केले जात आहेत. पण, त्यावर काहीच कारवाई होत नसल्याने गावकरी हताश झाले आहेत. ग्रामसभेच्या ठरावाची पोलीस, महसूल आणि जिल्हा परिषदेकडून दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. वसईत चोरीची रेती उत्खनन आणि वाहतूक होत नसल्याचा दावा महूसल खात्याकडून केला जात होता. पण, गेल्याच आठवड्यात रेती चोरीप्रकरणी दंडाची रक्कम कमी करण्यासाठी खानीवली येथील तलाठ्याला मुंबई अँटीकरप्शन विभागाने अटक करून महसूल खात्याल सणसणीत चपराक लगावली आहे.